शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवायचे असतील तर सुरुवात कुठून करावी? वाचा भगवान बुद्धांची शिकवण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 16:43 IST

भगवान बुद्धांची ही प्रेरक कथा तुम्हाला आयुष्यातील महत्त्वाचे बदल घडवण्यासाठी निश्चितच प्रेरणा देईल. 

आजच्या जगात सर्व काही मिळेल, नाही मिळत ती फक्त मन:शांती. त्या शोधात मनुष्य धडपडत असतो. त्यासाठी भौतिक सुखांचा त्याग करावा लागतो. विषयात गुंतलेले मन विरक्त करावे लागते. या गोष्टी सहजसाध्य होत नाहीत. त्या केवळ संतांच्या सान्निध्यात शक्य होतात, म्हणून सत्संग केला जातो. असाच एक धनिक मन:शांतीच्या शोधात भगवान गौतम बुद्ध यांच्या धर्मसभेत पोहोचला. तिथे भगवान बुद्धांकडून त्याला कोणती शिकवण मिळाली, ते पाहू. 

एक धनिक अतिशय रागीट होता. छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्याचे लोकांशी वाद होत असत. वादातून मन:स्ताप होत असे आणि मन:स्तापामुळे कोणत्याही गोष्टीत लक्ष लागत नसे. कोणीतरी त्याला भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. धनिकाने ता ऐकला. धर्मसभेत रोज भगवान बुद्ध यांची प्रवचने होत असत. धनिकाने थेट जाऊन बोलण्याचे धाडस न करता रोजची हजेरी लावायची, असे ठरवले. त्याप्रमाणे तो रोज गौतम बुद्धांची प्रवचने ऐकायला जाऊ लागला.

मात्र, मनात असंख्य विचार सुरू असल्यामुळे त्याच्यावर प्रवचनाचा कोणताही प्रभाव पडत नसे. उलट डोक्यात सतत घुमणाऱ्या वैचारिक वादळामुळे तो आणखीनच उद्विग्न होऊ लागला. बुद्ध वारंवार समजावून सांगत असत, `लोभ, द्वेष, मोह हेच पापाचे मूळ आहे. त्यांचा त्याग करा.' मात्र धनिकाला नेमके तेच करणे जमत नव्हते. बुद्ध सांगत, 'संतापणाऱ्यावर जो संतापतो, त्याचे नुकसान होते आणि जो संतापाचे उत्तर शांततेत देतो, तो मोठे युद्ध जिंकतो.'

त्रासलेल्या धनिकाने एक दिवस बुद्धांना एकट गाठले आणि धीर करून सांगितले, `भगवान, गेले महिनाभर मी आपले प्रवचन ऐकत आहे, परंतु माझ्यावर त्याचा कणभरही परिणाम झाला नाही. असे का होत असेल?'

बुद्धांनी त्याच्याकडे स्मित करून पाहिले आणि म्हणाले, `हरकत नाही. आपण कुठे राहता?'

`इथून खूप दूर. फक्त प्रवचन ऐकण्यासाठी मी रोज एवढा प्रवास करून येत होतो.'

`अच्छा. तरी साधारण किती लांब आहे?' - बुद्धांनी विचारले.

`तासभर तरी लागतोच.'- धनिक उत्तरला.

`तिकडे कसे जाता', असे विचारत बुद्धांनी संवाद वाढवला.

`वाहनाने!'

त्या माणसान हिशोब करून वेळ सांगितला. त्यावर बुद्धांनी आणखी एक प्रश्न विचारला-

`इथे बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या निवास स्थळी पोहोचू शकता का?'

धनिक म्हणाला, `हे कसे शक्य आहे? तिथे जायला पाहिले ना?' 

बुद्ध प्रेमाने म्हणाले, `तुमचे म्हणणे योग्य आहे. चालल्याशिवाय आपण इच्छिात स्थळी पोहोचू शकत नाही. चालल्यावरच पोहोचू शकतो...त्याप्रमाणे चांगल्या गोष्टी जीवनात प्रत्यक्ष अंमलात आणल्या तरच त्याचा परिणाम दिसून येतो. मिळवलेल्या ज्ञानाचे रूपांतर कर्मात होत नसेल, तर ते ज्ञान व्यर्थ आहे. म्हणून आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे, असे नुसते म्हणून भागणार नाही, तर ती आचरणातही आणावी लागेल.'

धनिक वरमला. बुद्धांच्या पायाशी आपल्या क्रोधाचा त्याग करून शांतिमार्गाला लागला. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी