शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवायचे असतील तर सुरुवात कुठून करावी? वाचा भगवान बुद्धांची शिकवण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 16:43 IST

भगवान बुद्धांची ही प्रेरक कथा तुम्हाला आयुष्यातील महत्त्वाचे बदल घडवण्यासाठी निश्चितच प्रेरणा देईल. 

आजच्या जगात सर्व काही मिळेल, नाही मिळत ती फक्त मन:शांती. त्या शोधात मनुष्य धडपडत असतो. त्यासाठी भौतिक सुखांचा त्याग करावा लागतो. विषयात गुंतलेले मन विरक्त करावे लागते. या गोष्टी सहजसाध्य होत नाहीत. त्या केवळ संतांच्या सान्निध्यात शक्य होतात, म्हणून सत्संग केला जातो. असाच एक धनिक मन:शांतीच्या शोधात भगवान गौतम बुद्ध यांच्या धर्मसभेत पोहोचला. तिथे भगवान बुद्धांकडून त्याला कोणती शिकवण मिळाली, ते पाहू. 

एक धनिक अतिशय रागीट होता. छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्याचे लोकांशी वाद होत असत. वादातून मन:स्ताप होत असे आणि मन:स्तापामुळे कोणत्याही गोष्टीत लक्ष लागत नसे. कोणीतरी त्याला भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. धनिकाने ता ऐकला. धर्मसभेत रोज भगवान बुद्ध यांची प्रवचने होत असत. धनिकाने थेट जाऊन बोलण्याचे धाडस न करता रोजची हजेरी लावायची, असे ठरवले. त्याप्रमाणे तो रोज गौतम बुद्धांची प्रवचने ऐकायला जाऊ लागला.

मात्र, मनात असंख्य विचार सुरू असल्यामुळे त्याच्यावर प्रवचनाचा कोणताही प्रभाव पडत नसे. उलट डोक्यात सतत घुमणाऱ्या वैचारिक वादळामुळे तो आणखीनच उद्विग्न होऊ लागला. बुद्ध वारंवार समजावून सांगत असत, `लोभ, द्वेष, मोह हेच पापाचे मूळ आहे. त्यांचा त्याग करा.' मात्र धनिकाला नेमके तेच करणे जमत नव्हते. बुद्ध सांगत, 'संतापणाऱ्यावर जो संतापतो, त्याचे नुकसान होते आणि जो संतापाचे उत्तर शांततेत देतो, तो मोठे युद्ध जिंकतो.'

त्रासलेल्या धनिकाने एक दिवस बुद्धांना एकट गाठले आणि धीर करून सांगितले, `भगवान, गेले महिनाभर मी आपले प्रवचन ऐकत आहे, परंतु माझ्यावर त्याचा कणभरही परिणाम झाला नाही. असे का होत असेल?'

बुद्धांनी त्याच्याकडे स्मित करून पाहिले आणि म्हणाले, `हरकत नाही. आपण कुठे राहता?'

`इथून खूप दूर. फक्त प्रवचन ऐकण्यासाठी मी रोज एवढा प्रवास करून येत होतो.'

`अच्छा. तरी साधारण किती लांब आहे?' - बुद्धांनी विचारले.

`तासभर तरी लागतोच.'- धनिक उत्तरला.

`तिकडे कसे जाता', असे विचारत बुद्धांनी संवाद वाढवला.

`वाहनाने!'

त्या माणसान हिशोब करून वेळ सांगितला. त्यावर बुद्धांनी आणखी एक प्रश्न विचारला-

`इथे बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या निवास स्थळी पोहोचू शकता का?'

धनिक म्हणाला, `हे कसे शक्य आहे? तिथे जायला पाहिले ना?' 

बुद्ध प्रेमाने म्हणाले, `तुमचे म्हणणे योग्य आहे. चालल्याशिवाय आपण इच्छिात स्थळी पोहोचू शकत नाही. चालल्यावरच पोहोचू शकतो...त्याप्रमाणे चांगल्या गोष्टी जीवनात प्रत्यक्ष अंमलात आणल्या तरच त्याचा परिणाम दिसून येतो. मिळवलेल्या ज्ञानाचे रूपांतर कर्मात होत नसेल, तर ते ज्ञान व्यर्थ आहे. म्हणून आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे, असे नुसते म्हणून भागणार नाही, तर ती आचरणातही आणावी लागेल.'

धनिक वरमला. बुद्धांच्या पायाशी आपल्या क्रोधाचा त्याग करून शांतिमार्गाला लागला. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी