शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

'पीसफुल' आयुष्य जगायचे असेल तर एकदा ही पिसाची छोटीशी गोष्ट नक्की वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 15:53 IST

आपल्या चुका आपल्याला लक्षात येत नाहीत, त्या निदर्शनास आणून देणारा गुरु आयुष्यात भेटावाच लागतो!

आपल्यापैकी अनेकांना पटकन व्यक्त होण्याची खोड असते. परंतु समोरच्याचे पूर्ण ऐकून घेतल्याशिवाय बोलू नये, हा नियम आहे. मात्र आपल्या एका वाईट सवयीमुळे अनेक गैरसमज, वाद, अपमान होतात. परिस्थिती वेगळीच असते आणि आपण चुकीचे व्यक्त होतो. नंतर मागितलेल्या माफीला किंमत उरत नाही. कारण शब्दांमुळे झालेले घाव सहसा भरून निघत नाहीत. यासाठीच शब्द जपून वापरा आणि वापरण्याआधी विचार करा, वापरून झाल्यावर नाही. 

एका आश्रमात काही शिष्य अध्ययनन करत होते. गुरुदेव त्यांना विविध विषय शिकवत असत. शिष्यांना सर्व विद्या व कला अवगत व्हाव्यात यादृष्टीने ते सतत प्रयत्नशील असत. त्या शिष्यांमध्ये शामल नावाचा एक शिष्य होता. तो कोणालाही उद्धटपणे बोलून जात असे. दुसऱ्याला काय वाटेल, कुणाचे अंत:करण दुखावले जाणार नाही ना, याची त्याला पर्वा नसे. गुरुदेवांनाही त्याची काळजी वाटू लागली. परंतु ते त्याच्यावर कधी रागावले नाहीत.

गुरुदेवांनी एकदा त्याला आपल्या जवळ बोलावून सांगितले, 'शामल, बेटा एक काम करशील का?'तो हो म्हणाला.

मऊमऊ पिसांची गच्च भरलेली एक पिशवी त्याच्या हाती देत गुरुदेव म्हणाले, 'बाळ ही पिशवी मोकळ्या मैदानात जाऊन रिकामी करून ये.'गुरुदेवांच्या आज्ञेनुसार शामलने मैदानात जाऊन पिसांची पिशवी रिकामी केली नि तो परत गुरुदेवांकडे आला. दुसऱ्या दिवशी गुरुदेवांनी त्याला सांगितले, 'शामल, ही पिशवी घे आणि सगळी पिसं पुन्हा यात भरून आण.' 

शामल मैदानात गेला. तिथे ढिगारा नव्हता. सगळी पिसं वाऱ्याने दूरवर इतरत्र उडून गेलेली आढळली. रिकामी पिशवी घेऊन तो परत आला. म्हणाला,` गुरुदेव, क्षमा करा. एकही पिस मैदानात नाही. सगळी पिसं वाऱ्याने विखुरली गेली.'

गुरुदेव त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले, `बाळा, एकदा उडून गेलेली पिसं जशी पुन्हा आणणे कठीण आहे, तसे बोलून गेलेले शब्द परत येत नाहीत. आपण उच्चारलेला शब्द कोणाच्या जिव्हारी लागू नये यासाठी आपण नेहमी विचार करूनच बोलावे. बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलणे चांगले. शामलला आपली चूक समजली. पुढे तो नम्र शिष्य म्हणून गणला जाऊ लागला.

म्हणूनच कविवर्य मंगेश पाडगावकर लिहितात, 'शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी..!'