शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर रोज सकाळी उठल्यावर आणि झोपताना फक्त 'हे' सुविचार वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 15:09 IST

हे सुविचार भिंतीवर मोठ्या अक्षरात चिकटवा आणि स्वतःसकट मुलांना मोठी स्वप्नं 'बघायला' आणि 'जगायला' शिकवा!

आजच्या तरुणांचे प्रेरणास्थान, व्याख्याता संदीप महेश्वरी यांनी एका व्हिडीओमध्ये २५ सुविचार सांगितले आहेत. ते सांगतात, हे सुविचार रोज सकाळी आणि उठल्यावर व झोपताना वाचा आणि त्यावर कृती सुरू करा, तुमचे आयुष्य अंतर्बाह्य बदलून जाईल असे तो म्हणतो. सुविचार लिहिण्याची आणि वाचण्याची सवय आपल्याला बालपणापासून आहे, पण ते अमलात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. सुविचाराचे पालन आपण व्यक्तिगत जीवनात न केल्याची मोठी किंमत चुकवत आहोत. निदान पुढच्या पिढीकडे योग्य आदर्श राहावा आणि त्यांनी आयुष्याचे सोने करावे असे वाटत असेल, तर पुढील सुविचार रोज त्यांच्याकडून श्लोक, पाढे म्हणवून घेता तसे म्हणवून घ्या. नक्की बदल घडेल. 

  • कामात एवढी गोपनीयता ठेवा, की जेव्हा यश मिळेल ते जगाला ओरडून सांगावे लागणार नाही, ते आपोआप सर्वांना कळेल!
  • ज्यांच्यामध्ये एकट्यांने चालण्याची क्षमता असते, एक दिवस जग त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालू लागते. 
  • यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात, तर अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. 
  • ज्यांच्याकडून कोणालाच यशाची अपेक्षा नसते, असेच लोक अनपेक्षितपणे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचून दाखवतात. 
  • यश आणि अपयश आपल्या मानण्यावर आहे. अपयश पत्करले तर तुम्ही हरता आणि यश मिळवायचे ठरवले तर तुम्ही जिंकता!
  • जोपर्यंत तुम्ही स्वतःचे अपयश स्वीकारत नाही तोवर कोणीही तुम्हाला अपयशी ठरवू शकत नाही. 
  • तुम्ही जर सूर्यासारखे यशाने तळपत राहू इच्छित असाल तर आधी सूर्यासारखे जळायलाही शिका. 
  • स्वप्नं साकार करण्यासाठी शहाणपण नाही तर झपाटलेपण आवश्यक आहे. 
  • कोणतेही लक्ष्य निश्चयापेक्षा मोठे नाही. कोणतीही लढाई न लढताच सोडू नका. 
  • बाहेरच्या स्पर्धेला नाही तर मनुष्य स्वतःशी असलेल्या स्पर्धेला जास्त घाबरतो. 
  • पानगळती झाल्याशिवाय जशी नवपल्लवी येत नाही, तशी अपयश आणि संघर्षाशिवाय संधी येत नाही. 
  • वेळ कितीही वाईट असू द्या, पण एक ना एक दिवस आपलीही वेळ येतेच!
  • अपयशाचा, कडेलोटाचा क्षण सावरता आला, तर तुम्हाला जगात कोणीही तोडू शकत नाही एवढे तुम्ही कणखर बनता. 
  • इच्छेने काहीच बदलत नाही, मात्र निश्चयाने सर्व काही बदलू शकता. 
  • जेवढा मार्ग दिसतोय तेवढा प्रवास सुरू ठेवा, तिथे पोहोचल्यावर पुढचाही मार्ग आपोआप दिसू लागेल. 
  • प्रत्येक छोटा बदल मोठ्या बदलाची सुरुवात असते. 
  • बदल घडवण्याची सुरुवात तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना सोडून स्वतःमध्ये बदल घडवू लागता. 
  • सुविचार वाचून बदल घडत नसतात, सुविचार अनुसरले, आचरणात आणले की बदल घडू लागतात. 
  • आयुष्यात पश्चात्ताप करणे सोडून द्या आणि असे ध्येय गाठा जिथे पाहून तुम्हाला सोडून दिलेल्यांना पश्चात्ताप होईल. 
  • जो चुकला नाही तो काहीच शिकला नाही. 
  • चुका होणे वाईट नाही, पण वारंवार एकच चूक करत राहणे वाईट आहे. 
  • सुंदर दिसणे महत्त्वाचे नाही, सुंदर बनणे महत्त्वाचे आहे. 
  • मान आणि कौतुक मागून मिळवण्याच्या गोष्टी नाहीत, त्या कमवण्याच्या गोष्टी आहेत. 
  • स्वप्नं ती नाहीत जी आपण झोपेत पाहतो, स्वप्नं ती आहेत जी आपली झोप उडवतात. 
  • आयुष्य समजून घ्यायचे असेल तर आयुष्यात मागे वळून बघा आणि आयुष्य जगायला शिकायचे असेल तर पुढे बघा.