शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत भारतीय विद्यार्थी सरकारच्या टार्गेटवर, व्हिसा रद्द झालेल्या जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये ५० टक्के भारतीय
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२५: आजचा दिवस आनंदात जाईल, प्रत्येक कामात यश मिळेल
3
भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार!
4
राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?
5
टॅरिफ युद्धात सोन्याचा निर्विवाद विजय! मौल्यवान धातूचा भाव एक लाखाच्या उंबरठ्यावर, सोन्याची आयात तब्बल १९२ टक्क्यांनी वाढली
6
ठाणे: 'पार्टीत चूक झाल्यास अप्पा मुलांना द्यायचा विजेचा शॉक'; खडवली बालआश्रमातून सुटका केलेल्या मुलांनी सांगितली आपबीती
7
सोयाबीन खरेदीचा ‘एमपी पॅटर्न’, २४ तासांत हातात पैसे; अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन
8
‘भगवद्गीता’ची हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश
9
टॅरिफने अर्थव्यवस्था कमकुवत, महागाई वाढेल, पण मंदी नाही : जॉर्जीव्हा
10
नाशिक दर्ग्याचे पाडकाम प्रकरण : महापालिकेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
11
छत्रपती संभाजीनगर: एम.फिल. धारक प्राध्यापक रडारवर, पात्रता कागदपत्रांची होणार तपासणी
12
छत्रपती संभाजीनगरात डिफेन्स पार्कसाठी  संरक्षणमंत्री अनुकूल, दिल्लीत बैठक घेणार
13
मुंबई: स्वस्त सोन्याच्या मोहाने घात केला; सराफा व्यापाऱ्याला विकली हातात २.३० कोटींची नकली नाणी
14
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
15
Tim David नं मोडला किंग कोहलीचा विक्रम; अर्धशतकी खेळीसह असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
17
RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!
18
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
19
Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली
20
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर रोज सकाळी उठल्यावर आणि झोपताना फक्त 'हे' सुविचार वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 15:09 IST

हे सुविचार भिंतीवर मोठ्या अक्षरात चिकटवा आणि स्वतःसकट मुलांना मोठी स्वप्नं 'बघायला' आणि 'जगायला' शिकवा!

आजच्या तरुणांचे प्रेरणास्थान, व्याख्याता संदीप महेश्वरी यांनी एका व्हिडीओमध्ये २५ सुविचार सांगितले आहेत. ते सांगतात, हे सुविचार रोज सकाळी आणि उठल्यावर व झोपताना वाचा आणि त्यावर कृती सुरू करा, तुमचे आयुष्य अंतर्बाह्य बदलून जाईल असे तो म्हणतो. सुविचार लिहिण्याची आणि वाचण्याची सवय आपल्याला बालपणापासून आहे, पण ते अमलात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. सुविचाराचे पालन आपण व्यक्तिगत जीवनात न केल्याची मोठी किंमत चुकवत आहोत. निदान पुढच्या पिढीकडे योग्य आदर्श राहावा आणि त्यांनी आयुष्याचे सोने करावे असे वाटत असेल, तर पुढील सुविचार रोज त्यांच्याकडून श्लोक, पाढे म्हणवून घेता तसे म्हणवून घ्या. नक्की बदल घडेल. 

  • कामात एवढी गोपनीयता ठेवा, की जेव्हा यश मिळेल ते जगाला ओरडून सांगावे लागणार नाही, ते आपोआप सर्वांना कळेल!
  • ज्यांच्यामध्ये एकट्यांने चालण्याची क्षमता असते, एक दिवस जग त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालू लागते. 
  • यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात, तर अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. 
  • ज्यांच्याकडून कोणालाच यशाची अपेक्षा नसते, असेच लोक अनपेक्षितपणे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचून दाखवतात. 
  • यश आणि अपयश आपल्या मानण्यावर आहे. अपयश पत्करले तर तुम्ही हरता आणि यश मिळवायचे ठरवले तर तुम्ही जिंकता!
  • जोपर्यंत तुम्ही स्वतःचे अपयश स्वीकारत नाही तोवर कोणीही तुम्हाला अपयशी ठरवू शकत नाही. 
  • तुम्ही जर सूर्यासारखे यशाने तळपत राहू इच्छित असाल तर आधी सूर्यासारखे जळायलाही शिका. 
  • स्वप्नं साकार करण्यासाठी शहाणपण नाही तर झपाटलेपण आवश्यक आहे. 
  • कोणतेही लक्ष्य निश्चयापेक्षा मोठे नाही. कोणतीही लढाई न लढताच सोडू नका. 
  • बाहेरच्या स्पर्धेला नाही तर मनुष्य स्वतःशी असलेल्या स्पर्धेला जास्त घाबरतो. 
  • पानगळती झाल्याशिवाय जशी नवपल्लवी येत नाही, तशी अपयश आणि संघर्षाशिवाय संधी येत नाही. 
  • वेळ कितीही वाईट असू द्या, पण एक ना एक दिवस आपलीही वेळ येतेच!
  • अपयशाचा, कडेलोटाचा क्षण सावरता आला, तर तुम्हाला जगात कोणीही तोडू शकत नाही एवढे तुम्ही कणखर बनता. 
  • इच्छेने काहीच बदलत नाही, मात्र निश्चयाने सर्व काही बदलू शकता. 
  • जेवढा मार्ग दिसतोय तेवढा प्रवास सुरू ठेवा, तिथे पोहोचल्यावर पुढचाही मार्ग आपोआप दिसू लागेल. 
  • प्रत्येक छोटा बदल मोठ्या बदलाची सुरुवात असते. 
  • बदल घडवण्याची सुरुवात तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना सोडून स्वतःमध्ये बदल घडवू लागता. 
  • सुविचार वाचून बदल घडत नसतात, सुविचार अनुसरले, आचरणात आणले की बदल घडू लागतात. 
  • आयुष्यात पश्चात्ताप करणे सोडून द्या आणि असे ध्येय गाठा जिथे पाहून तुम्हाला सोडून दिलेल्यांना पश्चात्ताप होईल. 
  • जो चुकला नाही तो काहीच शिकला नाही. 
  • चुका होणे वाईट नाही, पण वारंवार एकच चूक करत राहणे वाईट आहे. 
  • सुंदर दिसणे महत्त्वाचे नाही, सुंदर बनणे महत्त्वाचे आहे. 
  • मान आणि कौतुक मागून मिळवण्याच्या गोष्टी नाहीत, त्या कमवण्याच्या गोष्टी आहेत. 
  • स्वप्नं ती नाहीत जी आपण झोपेत पाहतो, स्वप्नं ती आहेत जी आपली झोप उडवतात. 
  • आयुष्य समजून घ्यायचे असेल तर आयुष्यात मागे वळून बघा आणि आयुष्य जगायला शिकायचे असेल तर पुढे बघा.