शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सुखी व्हायचे असेल तर या साधूबाबांनी सांगितलेला मार्ग जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 15:23 IST

यशस्वी व्यक्ती सुखी असेलच असे नाही, मग यशस्वी आणि सुखी कसे व्हायचे ते या गोष्टीतून जाणून घ्या. 

कुठे थांबावं, हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे चितेवर ठेवेपर्यंत चिंता मिटत नाही. यासर्वांचा परिणाम असा, की आपण संतुष्ट कधीच होत नाही आणि जो समाधानी नसतो, तो कधीच सुखी होत नाही. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी काय करायला हवे, यासाठी वाचा ही बोधकथा. 

एकदा एका संन्याशाजवळ एक शेठजी आला. शेठजीपाशी अपार संपत्ती होती. परंतु शांती नव्हती. तो संन्याशाला म्हणाला, `महाराज, मी फार दु:खी आहे. मला आपण असा मंत्र द्या, की ज्यामुळे माझे सारे दु:ख नाहीसे होईल.'

संन्याशी म्हणाला, शेठजी, प्रथम मला थोडे दूध द्या. मला फार भूक लागली आहे. नंतर मी मंत्र देईन.' शेठजीला हे विचित्र वाटले. परंतु तो पेचात पडला होता. म्हणून त्याने संन्याशासाठी दूध आणवले. 

संन्याशी म्हणाला, तुमच्या पेल्यातून मी दूध पिणार नाही. या माझ्या पेल्यात ते ओता.' संन्याशाने आपल्या थैलीतून बाहेर काढलेल्या पेल्याला तळाशी अनेक छिद्रे होती.  हे पाहून शेठजी म्हणाला, `महाराज, या पेल्यातून दूध ओतले तर ते तुम्ही पिणार की खालची जमीन?' यात दुधाचा एक थेंबही राहणार नाही. तुम्ही तुमच्या थैलीतून दुसरा न गळणार पेला काढा.'

यावर संन्याशी म्हणाला, `शेठजी, तुम्ही अगदी बरोबर बोललात. माझ्या छिद्रे असलेल्या पेल्यात तुम्ही दिलेले दूध राहणार नाही, तर मग तुमच्या छिद्रमय मनात माझा मंत्र कसा बरे टिकेल छिद्रे बुझवलेले मन आणा, मन मी मंत्र देईन!'

राग, द्वेष, मोह यांच्यामुळे आपले मन अशुद्ध बनते. वरील बोधकथेत यांनाच मनाची छिद्रे म्हटले आहे. जोपर्यंत मन रागरंजित, द्वेषदूषित व मोहविमूढ असते, तोपर्यंत ते व्याकुळच राहणार. ते सुखी कसे होणार? मनाला या अशुद्धीपासून मुक्त करण्याचा मार्ग म्हणजे भगवान कृष्णाने गीतेमध्ये वर्णन केलेला अनासक्ती योग किंवा भगवान बुद्धांनी सांगितलेला अष्टांग मार्ग. मन शुद्ध होण्यानेच आपल्या मूळ सच्चिदानंद स्वरूपाचा अनुभव येऊ शकतो. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी