शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

आयुष्यात पश्चात्ताप टाळायचा असेल तर 'या' तीन गोष्टींपासून स्वतःला नेहमी दूरच ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 12:52 IST

देशातला युवा वर्ग सक्षम व्हावा आणि त्याने स्वतः बरोबर समाजाचा विकास करावा यासाठी आचार्य चाणक्य यांनी तरुणांना संबोधून या तीन सूचना केल्या आहेत. 

आचार्य चाणक्य म्हणतात की तारुण्य हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा असतो. याकाळात जर तरुणांनी आपली प्रतिभा समजून घेतली आणि आपली सर्व शक्ती योग्य दिशेने लावली तर तो काहीही साध्य करू शकतो. एवढेच नाही तर त्यांनी कोणतेही ध्येय ठरवले तरी ते साध्य होण्याची शक्यता खूप जास्त असते, कारण ते ध्येय गाठण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ, ताकद, आरोग्य इ. पण हा वेळ त्यांनी अनावश्यक गोष्टींमध्ये वाया घालवला तर त्यांना आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे त्यांनी यशाच्या आड येणाऱ्या या गोष्टींपासून नेहमी दूर राहिले पाहिजे.

व्यसनाधीनता: नशा सर्व काही उध्वस्त करते, परंतु तारुण्यात व्यसनाधीन होण्याने व्यक्तीचे करिअर, आरोग्य, कौटुंबिक जीवन, आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टींचा नाश होतो. तो निराशेच्या, नैराश्याच्या गर्तेत सापडतो. अशा परिस्थितीत, इच्छा असूनही, त्याचे आयुष्य पुन्हा रुळावर येऊ शकत नाही. त्याचे असे नुकसान होते, जे भरून काढणे शक्य नसते.

आळस: आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळशी व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीही काहीही साध्य करू शकत नाही. जर त्याच्या तारुण्यात आळसाने त्याला घेरले तर तो त्याच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान वेळ गमावतो. त्याऐवजी, त्याने आपल्या आयुष्यातील या सर्वात उत्साही वेळेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.

वाईट संगत : माणूस कितीही सुसंस्कृत, सद्गुणी, कष्टाळू, हुशार असला तरी वाईट संगतीत पडल्यास त्याचा नाश नक्कीच होतो. आयुष्याच्या कोणत्यातरी टप्प्यावर तो मोठ्या संकटात सापडतो आणि त्याचे भविष्य गमावतो. म्हणून आपण कोणाच्या सान्निध्यात राहतोय याची पारख आपण वरचेवर केली पाहिजे. स्वार्थी, खोटारड्या आणि अहंकारी माणसांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. तर स्वतःचा आणि इतरांचा विकास, प्रगती करणाऱ्या, दुसऱ्यांना मदत करणाऱ्या, खरे बोलणाऱ्या लोकांशी मैत्री केली पाहिजे. तरच प्रगती होत राहील. 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य