शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

भविष्यातल्या अडचणी टाळायच्या असतील तर बोलताना 'हे' नियम पाळा- आचार्य चाणक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 15:48 IST

आर्थिक अडचणीचे प्रसंग प्रत्येकावर येतात. परंतु अडचणीच्या काळात घेतलेली मदत आयुष्यभराचे ओझे होते. त्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा आणि अडचणीतून मार्ग काढा. 

बोलून मन मोकळं होतं, हे जरी सत्य असले, तरी बऱ्याचदा बोलण्याच्या नादात आपण अतिरिक्त माहिती देत जातो. त्याची आवश्यकताही नसते. ऐकणारी व्यक्ती आपली हितचिंतक आहे की हितशत्रू याची खातरजमा न करता माहितीचे वाटप आपल्याच अंगाशी येऊ शकते. म्हणून चाणक्यांनी काय बोलावे, कुठे बोलावे आणि काय बोलू नये, याचे नियम सांगितले आहे. बोलताना हे भान ठेवले, तर भविष्यात अडचणी येणार नाहीत. चाणक्यनीती काय म्हणते ते पाहू... 

अर्थनाश मनस्तापं गृहिण्याश्चरितानि च। नीचं वाक्यं चापमानं मतिमान्न प्रकाशयेत॥

जेव्हा आर्थिक अडचणी येतात, मन अस्वस्थ असते, पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत असे कळते, कोणाकडून तुमचा अपमान झालेला असतो, तेव्हा या गोष्टी स्वतः जवळ ठेवा. थोडा काळ जाऊ द्या. आपोआप त्यातून मार्ग निघेल आणि सगळे प्रश्न सुटतील. परंतु अविवेकाने या गोष्टी कोणाजवळही बोलू नका. कारण, लोक आपले दुःख ऐकून घेतात आणि आपण दिलेल्या माहितीचा गैरवापर करून आपल्याला बदनाम करतात. 

चाणक्यांनी श्लोकात दिलेल्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात घडत असतात. म्हणून दुःखाचे भांडवल करू नका. परिस्थिती स्वतः हाताळायला शिका. 

आर्थिक अडचणीचे प्रसंग प्रत्येकावर येतात. परंतु अडचणीच्या काळात घेतलेली मदत आयुष्यभराचे ओझे होते. त्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा आणि अडचणीतून मार्ग काढा. 

काही कारणाने मन दुखावले गेले असेल आणि तुम्ही मन हलके करण्यासाठी आपली समस्या कोणाला सांगायला गेलात, तर लोक तुमचे प्रश्न तुमच्या भूमिकेतून समजून घेतील याची शाश्वती नाही. उलट सल्ले देऊन किंवा तुम्हाला चुकीचे ठरवून तुमचा मनःस्ताप वाढवतील. 

वैयक्तिक नाते संबंधांबाबत कायम गोपनीयता राखावी. झाकली मूठ सव्वा लाखाची, अशी म्हण आहे. त्यानुसार आपल्या जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध असल्याचे तुम्हाला कळले, तर त्याला त्या नात्यातून परावृत्त होण्याची संधी द्या. चूक कोणाकडूनही होऊ शकते. त्याच्याकडून चूक का घडली, हे समजून घ्या. सुधारण्याची एक संधी द्या.

कोणाकडून कोणाबद्दल काही बरे वाईट ऐकले असेल, तर त्याची शहानिशा न करता त्याबद्दल चर्चा करू नका. ही माहिती कुठून मिळाली याचा विचार न करता, संबधित माहिती पसरवण्यासाठी लोक तुम्हाला जबाबदार धरतील. म्हणून एकवेळ कान आणि डोळे उघडे ठेवा पण तोंड बंद ठेवा. 

आपला अपमान आपल्याजवळ राहू द्या. लोकांना थट्टा मस्करी करायला विषय देऊ नका. झालेल्या अपमानातून बोध घ्या. स्वतःमध्ये उचित बदल करा, परंतु सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका.