शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मोक्ष हवा असेल तर मांजर पाळू नका; काय आहे यामागील तथ्य? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 16:21 IST

मांजरप्रेमींनो नाराज होऊ नका, साधू महाराजांना नक्की काय सांगायचे आहे ते जाणून घ्या!

शीर्षक वाचून असंख्य मांजर प्रेमी गोंधळले असतील. मोक्षही हवा आणि मांजरही अशी त्यांची द्विधा मनःस्थिती झाली असेल. कोणाही एकाला निवडायचे तर दुसऱ्याचा त्याग करावा लागणार, या विचाराने नाराज होऊ नका. ओशो सांगताहेत या वचनामागील तर्कवाद, तेही एका गोष्टीच्या स्वरूपात... 

एक साधू होते. त्यांच्याकडे शंका निरसन करण्यासाठी अनेक लोक येत असत. त्यातल्याच एकाने दुःखाचे कारण विचारले. त्यावर साधू म्हणाले, 'तुझ्या घरातली मांजर हे तुझ्या दुःखाचे मूळ आहे. तिला सोडून दे!' व्यक्ती गोंधळली. ती म्हणाली, 'पण महाराज, तिची बिचारीची काहीच चूक नाही की तिचा काहीच त्रासही नाही. पण तुम्ही तिलाच सोडून द्यायला सांगत आहात. 

साधू म्हणाले, 'माझ्या गुरुंनी मला सांगितले ते मी तुला सांगितले. मी माझ्या गुरुंना तसे सांगण्यामागचे कारण विचारले नाही, मात्र आता तू विचारलेच आहेस तर सांगतो. मी साधू संन्यासी! एकटा जीव सदाशिव! तरी रोजच्या उदर भरणासाठी मला गावात जाऊन माधुकरी मागावी लागे. मी तसे करायचो. घरी आलो की थोडं धान्य वापरून उरलेलं धान्य सायंकाळ साठी ठेवून द्यायचो. धान्य साठा होऊ लागल्याने माझ्या झोपडीत उंदीर आले. धान्य संपले म्हणून ते माझी लंगोट कुरतडू लागले. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गावकऱ्यांनी मला एक मांजर दिले.

मांजर उंदीर खाऊन झाल्यावरही भुकेपोटी गुरकावुन बघू लागले. मांजरीला दूध लागणार म्हणून गावकऱ्यांनी एक गाय भेट दिली. म्हणाले, 'मांजरीला दूध द्या आणि तुम्हीसुद्धा गायीचे दूध पिऊन धष्ट पुष्ट व्हा!' म्हणून मी गाय पाळली. पण आता गायीलाही वेळच्या वेळी चारा पाणी देण्याची सोय करावी लागली. मग गावकरी म्हणाले, तुम्हाला एक सेविका देतो ती घराची स्वच्छता करेल आणि पाळीव प्राण्याची देखभाल करून तुम्हाला जेवूसुद्धा घालेल. सेविका तिथे राहू लागली. ती हळू हळू आमच्या संसाराची स्वप्नं पाहू लागली. पण मी बैरागी. तिला सन्मानपूर्वक निरोप देण्याआधी मी पहिले काम काही केले असेल, तर ते म्हणजे मांजर सोडून दिले. त्या पाठोपाठ असलेले व्याप संपले आणि माझी सुटका अर्थात मला भवतापातून मोक्ष मिळाला. 

तात्पर्य हेच, की आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गोष्टींना ओशो मांजर संबोधतात. दुःखाचे मूळ नष्ट करा अर्थात मोहाच्या गोष्टी बाजूला सारा तर आणि तरच तुमची प्रगती होऊ शकेल असे ओशो सुचवतात.