शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

मोक्ष हवा असेल तर मांजर पाळू नका; काय आहे यामागील तथ्य? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 16:21 IST

मांजरप्रेमींनो नाराज होऊ नका, साधू महाराजांना नक्की काय सांगायचे आहे ते जाणून घ्या!

शीर्षक वाचून असंख्य मांजर प्रेमी गोंधळले असतील. मोक्षही हवा आणि मांजरही अशी त्यांची द्विधा मनःस्थिती झाली असेल. कोणाही एकाला निवडायचे तर दुसऱ्याचा त्याग करावा लागणार, या विचाराने नाराज होऊ नका. ओशो सांगताहेत या वचनामागील तर्कवाद, तेही एका गोष्टीच्या स्वरूपात... 

एक साधू होते. त्यांच्याकडे शंका निरसन करण्यासाठी अनेक लोक येत असत. त्यातल्याच एकाने दुःखाचे कारण विचारले. त्यावर साधू म्हणाले, 'तुझ्या घरातली मांजर हे तुझ्या दुःखाचे मूळ आहे. तिला सोडून दे!' व्यक्ती गोंधळली. ती म्हणाली, 'पण महाराज, तिची बिचारीची काहीच चूक नाही की तिचा काहीच त्रासही नाही. पण तुम्ही तिलाच सोडून द्यायला सांगत आहात. 

साधू म्हणाले, 'माझ्या गुरुंनी मला सांगितले ते मी तुला सांगितले. मी माझ्या गुरुंना तसे सांगण्यामागचे कारण विचारले नाही, मात्र आता तू विचारलेच आहेस तर सांगतो. मी साधू संन्यासी! एकटा जीव सदाशिव! तरी रोजच्या उदर भरणासाठी मला गावात जाऊन माधुकरी मागावी लागे. मी तसे करायचो. घरी आलो की थोडं धान्य वापरून उरलेलं धान्य सायंकाळ साठी ठेवून द्यायचो. धान्य साठा होऊ लागल्याने माझ्या झोपडीत उंदीर आले. धान्य संपले म्हणून ते माझी लंगोट कुरतडू लागले. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गावकऱ्यांनी मला एक मांजर दिले.

मांजर उंदीर खाऊन झाल्यावरही भुकेपोटी गुरकावुन बघू लागले. मांजरीला दूध लागणार म्हणून गावकऱ्यांनी एक गाय भेट दिली. म्हणाले, 'मांजरीला दूध द्या आणि तुम्हीसुद्धा गायीचे दूध पिऊन धष्ट पुष्ट व्हा!' म्हणून मी गाय पाळली. पण आता गायीलाही वेळच्या वेळी चारा पाणी देण्याची सोय करावी लागली. मग गावकरी म्हणाले, तुम्हाला एक सेविका देतो ती घराची स्वच्छता करेल आणि पाळीव प्राण्याची देखभाल करून तुम्हाला जेवूसुद्धा घालेल. सेविका तिथे राहू लागली. ती हळू हळू आमच्या संसाराची स्वप्नं पाहू लागली. पण मी बैरागी. तिला सन्मानपूर्वक निरोप देण्याआधी मी पहिले काम काही केले असेल, तर ते म्हणजे मांजर सोडून दिले. त्या पाठोपाठ असलेले व्याप संपले आणि माझी सुटका अर्थात मला भवतापातून मोक्ष मिळाला. 

तात्पर्य हेच, की आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गोष्टींना ओशो मांजर संबोधतात. दुःखाचे मूळ नष्ट करा अर्थात मोहाच्या गोष्टी बाजूला सारा तर आणि तरच तुमची प्रगती होऊ शकेल असे ओशो सुचवतात.