शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

कोणतेही नाते टिकवून ठेवायचे असेल तर दोन ओळींचा मंत्र लक्षात ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 08:00 IST

आयुष्य खूप छोटेसे आहे. रागा लोभात ते वाया घालवू नका. मरताना आपल्याला एकट्यालाच जायचे आहे, पण जोवर जिवंत आहोत तोवर एकटे राहू नका. सगळ्यांशी मिळून मिसळून राहा. आनंदाने राहा.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले म्हणावे की दुरावले, हा संभ्रम निर्माण होतो. क्षणार्धात आपण परदेशातल्या नातेवाईकांना बघू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. पण ही बोलायची उर्मीच टिकून राहत नसेल, तर तंत्रज्ञान हाताशी असून काय उपयोग? यावर आध्यात्मिक गुरु आणि प्रख्यात व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू दोन ओळींचा मंत्र सांगतात-

'भांडण जेव्हा स्वत:शी असेल तर जिंकायला शिका आणि भांडण जेव्हा आपल्या माणसांशी असेल तेव्हा हरायला शिका!' 

आपण सगळेच जण छोट्या छोट्या गोष्टींवरून राग लोभ धरून एकमेकांशी भांडत राहतो. भांडताना दोन्ही बाजूचे तावातावाने अंगावर येतात, पण माघार घेताना दोघांचा अहंकार आडवा येतो. भांडण संपवण्याऐवजी भिजत घोंगडे तसेच ठेवले जाते. त्यामुळे नात्यात दरी निर्माण होते आणि नाते दुरावते. 

अशा वेळी वरील मंत्र कायम लक्षात ठेवा. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे आणि किती काळ राग ठेवायचा, यावर आपण बंधन घालून घेतले पाहिजे. नात्यात रबरासारखी लवचिकता हवी. एका बाजूने कोणी ताणले, तर दुसऱ्या बाजूने ते सैल सोडले पाहिजे. दोघांनी दोन्ही बाजूंनी ते ताणून ठेवले, तर रबरासारखेच नातेही क्षणार्धात तुटून जाईल. 

म्हणून छोट्या गोष्टींसाठी राग राग करणे सोडून द्या. मोठे ध्येय ठेवा. ते मिळवण्यासाठी स्वत:शी लढाई करा. ध्येय पूर्ण होत नसेल तर स्वत:शी भांडा, पण इतरांशी नाही! दुसऱ्यांशी भांडताना तुम्हाला माघार घ्यावी लागली, तरी मनाची तयारी ठेवा. त्यामुळे तुम्हाला कमीपणा येणार नाही, पण नाते टिकवण्यासाठी आणि झालेल्या वादावर विचार करण्यासाठी वेळ नक्कीच मिळू शकेल. 

आयुष्य खूप छोटेसे आहे. रागा लोभात ते वाया घालवू नका. मरताना आपल्याला एकट्यालाच जायचे आहे, पण जोवर जिवंत आहोत तोवर एकटे राहू नका. सगळ्यांशी मिळून मिसळून राहा. आनंदाने राहा. प्रसंगी हार पत्करली तरी चालेल, कारण तोच तुमचा विजय असेल. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप