शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य हवे असेल, तर जेवणानंतर 'या' दोन सवयी लावून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 12:06 IST

दीर्घायुष्याच्या मागे वामशायीप्रमाणे शतपदगामी होण्याचे रहस्य दडलेले आहे. यासाठी जेवल्यावर शतपावली करणे गरजेचे आहे.

आपली जिवनपद्धती गेल्या काही काळात एवढी बदलली आहे, की यम नियमांचा विचार आपण करणे सोडून दिले आहे. पथ्य पाणी आपण सांभाळत नाही. जेवणाच्या, झोपेच्या, आहाराच्या वेळा पाळत नाही. परिणामी आपले शरीर नानाव्याधींचे माहेरघर होऊन बसते. याउलट आपले आजी आजोबा प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करत असत. त्यांच्या आचार विचारांचे अनुकरण केले तर आजच्या धावळीच्या जगात आपले जीवनही अनुकूल होऊ शकते.  त्याची सुरुवात आहार विहारापासून करायला हवी. 

आयुर्वेद सांगते, तुम्हाला उत्तम आरोग्य हवे असेल, तर २ सवयी रोजच्या जिवनशैलीत सहभागी करून घ्या. १. शतपावली २. वामकुक्षी

शतपावली केल्याचे फायदे 

'भुक्तां शतपदं गच्छेत' असे शास्त्रवचन आहे. या संदर्भात आयुर्वेदात एक वचन आहे, ते असे-

भक्तोपविशत: स्थौल्यं शयानस्य रुजस्तथा,आयुश्चक्रमाणस्य मृत्यूर्धावति धावत:।।

भोजन होताच जो मनुष्य एका ठिकाणी बसून राहतो, तो प्रकृतीने स्थूल होतो. जो लगेच झोपतो त्याच्या देहात अनेक प्रकारच्या व्याधी उत्पन्न होतात. भोजनानंतर जो चालतो त्याचे आयुष्य वाढते व जो धावतो तो मृत्यू जवळ घेतो. सुभाषितात केलेले भाष्य आपण पाहिले व अनुभवले असेल. या विधानांची सत्यता पटण्याजोगी आहे. म्हणून दीर्घायुष्याच्या मागे वामशायीप्रमाणे शतपदगामी होण्याचे रहस्य दडलेले आहे. यासाठी जेवल्यावर शतपावली करणे गरजेचे आहे. पोटातील अन्नाचे पचन होण्याची एकमेव क्रिया म्हणजे मंदगतीने पावले टाकत किमान शंभर पावले चालणे.

शतपावलीप्रमाणेच भोजनानंतर काही वेळाने वामकुक्षी घेतल्याचेही अनेक फायदे होतात. 

वामपाश्र्वेण संविशेत् असे शास्त्रवचन आहे. भोजन झाल्यावर डाव्या कुशीवर काही वेळ पडून राहावे, यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे जठरातील अन्न काही काळ जठरात राहणे प्रकृतीला पथ्यकर असते. जठराच्या आवुंâचन प्रसरणामुळे अन्नाची घुसळण होऊन ते पुढील मार्गात चांगले पचते. 

दुसरे कारण म्हणजे आपल्या उजव्या नासिकेतून सूर्यनाडी (पिंगला) व डाव्या नाकपुडीतून चंद्रनाडी (इडा) वाहत असते. अन्नपचनासाठी सूर्यनाडीचा स्वर चालणे अत्यावश्यक असते. यासाठी भोजनोत्तर डाव्या कुशीवर किमान अर्धा तास पडून रहावे, यालाच वामकुक्षी असे म्हणतात.