शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य हवे असेल, तर जेवणानंतर 'या' दोन सवयी लावून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 12:06 IST

दीर्घायुष्याच्या मागे वामशायीप्रमाणे शतपदगामी होण्याचे रहस्य दडलेले आहे. यासाठी जेवल्यावर शतपावली करणे गरजेचे आहे.

आपली जिवनपद्धती गेल्या काही काळात एवढी बदलली आहे, की यम नियमांचा विचार आपण करणे सोडून दिले आहे. पथ्य पाणी आपण सांभाळत नाही. जेवणाच्या, झोपेच्या, आहाराच्या वेळा पाळत नाही. परिणामी आपले शरीर नानाव्याधींचे माहेरघर होऊन बसते. याउलट आपले आजी आजोबा प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करत असत. त्यांच्या आचार विचारांचे अनुकरण केले तर आजच्या धावळीच्या जगात आपले जीवनही अनुकूल होऊ शकते.  त्याची सुरुवात आहार विहारापासून करायला हवी. 

आयुर्वेद सांगते, तुम्हाला उत्तम आरोग्य हवे असेल, तर २ सवयी रोजच्या जिवनशैलीत सहभागी करून घ्या. १. शतपावली २. वामकुक्षी

शतपावली केल्याचे फायदे 

'भुक्तां शतपदं गच्छेत' असे शास्त्रवचन आहे. या संदर्भात आयुर्वेदात एक वचन आहे, ते असे-

भक्तोपविशत: स्थौल्यं शयानस्य रुजस्तथा,आयुश्चक्रमाणस्य मृत्यूर्धावति धावत:।।

भोजन होताच जो मनुष्य एका ठिकाणी बसून राहतो, तो प्रकृतीने स्थूल होतो. जो लगेच झोपतो त्याच्या देहात अनेक प्रकारच्या व्याधी उत्पन्न होतात. भोजनानंतर जो चालतो त्याचे आयुष्य वाढते व जो धावतो तो मृत्यू जवळ घेतो. सुभाषितात केलेले भाष्य आपण पाहिले व अनुभवले असेल. या विधानांची सत्यता पटण्याजोगी आहे. म्हणून दीर्घायुष्याच्या मागे वामशायीप्रमाणे शतपदगामी होण्याचे रहस्य दडलेले आहे. यासाठी जेवल्यावर शतपावली करणे गरजेचे आहे. पोटातील अन्नाचे पचन होण्याची एकमेव क्रिया म्हणजे मंदगतीने पावले टाकत किमान शंभर पावले चालणे.

शतपावलीप्रमाणेच भोजनानंतर काही वेळाने वामकुक्षी घेतल्याचेही अनेक फायदे होतात. 

वामपाश्र्वेण संविशेत् असे शास्त्रवचन आहे. भोजन झाल्यावर डाव्या कुशीवर काही वेळ पडून राहावे, यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे जठरातील अन्न काही काळ जठरात राहणे प्रकृतीला पथ्यकर असते. जठराच्या आवुंâचन प्रसरणामुळे अन्नाची घुसळण होऊन ते पुढील मार्गात चांगले पचते. 

दुसरे कारण म्हणजे आपल्या उजव्या नासिकेतून सूर्यनाडी (पिंगला) व डाव्या नाकपुडीतून चंद्रनाडी (इडा) वाहत असते. अन्नपचनासाठी सूर्यनाडीचा स्वर चालणे अत्यावश्यक असते. यासाठी भोजनोत्तर डाव्या कुशीवर किमान अर्धा तास पडून रहावे, यालाच वामकुक्षी असे म्हणतात.