शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

देव भेटला, तर त्याच्याकडे देवाकडे काय मागावं याची यादी बनवू नका; ही गोष्ट वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 14:02 IST

कोणाकडे काय आणि केव्हा मागावे याची आपल्याला समज असायला हवी.

एक राजा असतो. त्याच्या राज्यात त्याची प्रजा सुखी समाधानी असते.सगळा राज्यकारभार सुरळीत सुरु असतो. फक्त राज्याला उत्तराधिकारी नाही, याचे शल्य सर्वांच्या मनात असते. राजा अनेक ज्योतिष्यांना विचारतो, अनेक वैद्यांचे उपचार घेतो, पण गुण येत नाही. 

कर्मधर्मसंयोगाने एक दिवस त्याच्यावर देवाची कृपादृष्टी होते आणि गोड बातमी येणार असल्याचे कळते. नऊ महिन्यांचा काळ राजाला फार मोठा वाटू लागतो. सगळे प्रजाजन राजाकडे बाळ येणार या आनंदात असतात आणि तो शुभ दिवस उगवतो. राजपुत्र झाला, ही वार्ता वाऱ्यासारखी राज्यभर प्रसरते. राजा एवढा आनंदून जातो, की आनंदाच्या भरात तो जाहीर करतो, 'उद्या सकाळी प्रजेने राजमहालात येऊन त्यांना हवी ती वस्तू घेऊन जावी. जो ज्या वस्तूला स्पर्श करेल, ती त्याची! लोकांना गंमत वाटते. सगळे जण काय आणता येईल हा विचार करतात. 

ही बातमी एका छोट्या मुलाच्या कानावर येते. तोसुद्धा तिथे जाण्याचा हट्ट करतो. आई बाबा सांगतात, 'उद्या एवढी गर्दी लोटेल की तू चिरडून जाशील. म्हणून हट्ट करू नकोस. पण मुलाने हट्ट लावून धरला आणि त्याच्या आई बाबांना तो पुरवावा लागला. मात्र मुलाने आपल्याला काय हवे ते सांगितलेच नाही. 

दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेत राजमहाल सर्वांसाठी खुला करून दिला, तशी लोकांची झुंबड उडाली. लोक आनंदाने येत होते, हवं ते घेऊन जात होते. राजाची अक्षय्य संपत्ती असल्याने सर्वांना पुरून उरेल एवढे धन धान्य होते. 

आदल्या दिवशी हट्ट करणारा मुलगा दुसऱ्या दिवशी वडिलांच्या खांद्यावर बसून त्या गर्दीत सामील झाला. त्याने वडिलांना सांगून खाली उतरायला लावले आणि तो धावत गेला व राजाला स्पर्श करत म्हणाला, 'आजपासून राजा माझा आणि राजाची प्रजाही माझी!"

तात्पर्य हेच, की देव आपल्यासाठी जे हवे ते मागायला त्याचा दरबार खुला करून देतो, परंतु प्रश्न असा आहे, की आपल्याला दरबारातल्या किरकोळ वस्तू हव्या आहेत की या दरबाराचा मालक हवा आहे? म्हणून देवाकडे काही मागण्याऐवजी देवालाच मागून घ्या. म्हणजे इतर कसलीही उणीव भासणार नाही.