शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

देव भेटला, तर त्याच्याकडे देवाकडे काय मागावं याची यादी बनवू नका; ही गोष्ट वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 14:02 IST

कोणाकडे काय आणि केव्हा मागावे याची आपल्याला समज असायला हवी.

एक राजा असतो. त्याच्या राज्यात त्याची प्रजा सुखी समाधानी असते.सगळा राज्यकारभार सुरळीत सुरु असतो. फक्त राज्याला उत्तराधिकारी नाही, याचे शल्य सर्वांच्या मनात असते. राजा अनेक ज्योतिष्यांना विचारतो, अनेक वैद्यांचे उपचार घेतो, पण गुण येत नाही. 

कर्मधर्मसंयोगाने एक दिवस त्याच्यावर देवाची कृपादृष्टी होते आणि गोड बातमी येणार असल्याचे कळते. नऊ महिन्यांचा काळ राजाला फार मोठा वाटू लागतो. सगळे प्रजाजन राजाकडे बाळ येणार या आनंदात असतात आणि तो शुभ दिवस उगवतो. राजपुत्र झाला, ही वार्ता वाऱ्यासारखी राज्यभर प्रसरते. राजा एवढा आनंदून जातो, की आनंदाच्या भरात तो जाहीर करतो, 'उद्या सकाळी प्रजेने राजमहालात येऊन त्यांना हवी ती वस्तू घेऊन जावी. जो ज्या वस्तूला स्पर्श करेल, ती त्याची! लोकांना गंमत वाटते. सगळे जण काय आणता येईल हा विचार करतात. 

ही बातमी एका छोट्या मुलाच्या कानावर येते. तोसुद्धा तिथे जाण्याचा हट्ट करतो. आई बाबा सांगतात, 'उद्या एवढी गर्दी लोटेल की तू चिरडून जाशील. म्हणून हट्ट करू नकोस. पण मुलाने हट्ट लावून धरला आणि त्याच्या आई बाबांना तो पुरवावा लागला. मात्र मुलाने आपल्याला काय हवे ते सांगितलेच नाही. 

दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेत राजमहाल सर्वांसाठी खुला करून दिला, तशी लोकांची झुंबड उडाली. लोक आनंदाने येत होते, हवं ते घेऊन जात होते. राजाची अक्षय्य संपत्ती असल्याने सर्वांना पुरून उरेल एवढे धन धान्य होते. 

आदल्या दिवशी हट्ट करणारा मुलगा दुसऱ्या दिवशी वडिलांच्या खांद्यावर बसून त्या गर्दीत सामील झाला. त्याने वडिलांना सांगून खाली उतरायला लावले आणि तो धावत गेला व राजाला स्पर्श करत म्हणाला, 'आजपासून राजा माझा आणि राजाची प्रजाही माझी!"

तात्पर्य हेच, की देव आपल्यासाठी जे हवे ते मागायला त्याचा दरबार खुला करून देतो, परंतु प्रश्न असा आहे, की आपल्याला दरबारातल्या किरकोळ वस्तू हव्या आहेत की या दरबाराचा मालक हवा आहे? म्हणून देवाकडे काही मागण्याऐवजी देवालाच मागून घ्या. म्हणजे इतर कसलीही उणीव भासणार नाही.