शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

देव भेटला, तर त्याच्याकडे देवाकडे काय मागावं याची यादी बनवू नका; ही गोष्ट वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 14:02 IST

कोणाकडे काय आणि केव्हा मागावे याची आपल्याला समज असायला हवी.

एक राजा असतो. त्याच्या राज्यात त्याची प्रजा सुखी समाधानी असते.सगळा राज्यकारभार सुरळीत सुरु असतो. फक्त राज्याला उत्तराधिकारी नाही, याचे शल्य सर्वांच्या मनात असते. राजा अनेक ज्योतिष्यांना विचारतो, अनेक वैद्यांचे उपचार घेतो, पण गुण येत नाही. 

कर्मधर्मसंयोगाने एक दिवस त्याच्यावर देवाची कृपादृष्टी होते आणि गोड बातमी येणार असल्याचे कळते. नऊ महिन्यांचा काळ राजाला फार मोठा वाटू लागतो. सगळे प्रजाजन राजाकडे बाळ येणार या आनंदात असतात आणि तो शुभ दिवस उगवतो. राजपुत्र झाला, ही वार्ता वाऱ्यासारखी राज्यभर प्रसरते. राजा एवढा आनंदून जातो, की आनंदाच्या भरात तो जाहीर करतो, 'उद्या सकाळी प्रजेने राजमहालात येऊन त्यांना हवी ती वस्तू घेऊन जावी. जो ज्या वस्तूला स्पर्श करेल, ती त्याची! लोकांना गंमत वाटते. सगळे जण काय आणता येईल हा विचार करतात. 

ही बातमी एका छोट्या मुलाच्या कानावर येते. तोसुद्धा तिथे जाण्याचा हट्ट करतो. आई बाबा सांगतात, 'उद्या एवढी गर्दी लोटेल की तू चिरडून जाशील. म्हणून हट्ट करू नकोस. पण मुलाने हट्ट लावून धरला आणि त्याच्या आई बाबांना तो पुरवावा लागला. मात्र मुलाने आपल्याला काय हवे ते सांगितलेच नाही. 

दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेत राजमहाल सर्वांसाठी खुला करून दिला, तशी लोकांची झुंबड उडाली. लोक आनंदाने येत होते, हवं ते घेऊन जात होते. राजाची अक्षय्य संपत्ती असल्याने सर्वांना पुरून उरेल एवढे धन धान्य होते. 

आदल्या दिवशी हट्ट करणारा मुलगा दुसऱ्या दिवशी वडिलांच्या खांद्यावर बसून त्या गर्दीत सामील झाला. त्याने वडिलांना सांगून खाली उतरायला लावले आणि तो धावत गेला व राजाला स्पर्श करत म्हणाला, 'आजपासून राजा माझा आणि राजाची प्रजाही माझी!"

तात्पर्य हेच, की देव आपल्यासाठी जे हवे ते मागायला त्याचा दरबार खुला करून देतो, परंतु प्रश्न असा आहे, की आपल्याला दरबारातल्या किरकोळ वस्तू हव्या आहेत की या दरबाराचा मालक हवा आहे? म्हणून देवाकडे काही मागण्याऐवजी देवालाच मागून घ्या. म्हणजे इतर कसलीही उणीव भासणार नाही.