शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जोवर दुसऱ्यांच्या सुखाशी तुलना करत राहाल, तोवर दुःखीच राहाल; वाचा 'ही' छानशी गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 17:06 IST

तुलना करायचीच असेल तर दुसऱ्यांच्या दुःखाशी करा, त्यामुळे तुम्ही किती सुखात आहात ते कळेल; सुखाशी केलेली तुलना फक्त दुःख देईल!

स्पर्धा निकोप असेल, तर प्रगतीला वाव असतो. परंतु सहसा तसे होत नाही. स्पर्धेतून एकमेकांबद्दल मत्सर वाढतो, द्वेष उत्पन्न होतो आणि दुसऱ्याच्या प्रगतीने आपण अस्वस्थ होतो. हा मनुष्य स्वभाव असला, तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दुसऱ्यांच्या प्रगतीबद्दल वाटणारी असूया आपल्या प्रगतीच्या आड येऊन नैराश्याला खतपाणी घालते. त्यावर पर्याय सुचवताना व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू एक गोष्ट सांगतात. ती वाचल्यावर तुम्हाला बालपणी ऐकलेली गोष्ट आठवेल. ती गोष्ट कोणती हे पुढे कळेलच. आधी प्रभुजींनी सांगितलेली गोष्ट पाहू. 

राहुल आणि जितेन हे दोघेही एकाच विद्यापीठातून एकाच गुणवत्तेने उत्तीर्ण झालेले दोन विद्यार्थी एकाच कंपनीत नोकरीला लागतात. दोघेही एकसारखे मेहनती असूनही वर्षभरातच राहुलला पगारवाढ आणि पदोन्नती मिळते. जितेनला या गोष्टीचा खूप त्रास होतो. तो कुढत राहतो. आणखी मेहनत घेतो. तरीदेखील त्याच्या कामाची दखल घेतली जात नाही. 

एक दिवस जितेन रागारागात राजीनामा देतो. आपल्या मेहनतीची दखल घेतली जात नसल्याचे राजीनाम्यात नमूद करतो. कंपनीचे व्यवस्थापक जितेनच्या याआधीच्या कामाची पाहणी करतात. पण तो नक्की कशात कमी पडतोय, हे पाहण्यासाठी त्याला एक संधी देतात.

जितेनला बोलावून एक काम दिले जाते. आपल्या कंपनीच्या आवारात कोणी टरबूज विक्रेता आहे का? याची पाहणी करण्यास सांगितले जाते. जितेन तपास करून येतो. व्यवस्थापक त्याला टरबुजाची किंमत विचारतो, जितेन पुन्हा जाऊन चौकशी करून येतो. थोड्यावेळाने हेच काम राहुलला दिले जाते. राहुल तपास करून येतो आणि आल्यावर टरबूजवाला कुठे बसतो, तो किती रुपयाला टरबूज देणार आहे, तो टरबूज कुठे पिकवतो, महिन्याला किती उत्पन्न कमवतो, त्याच्याकडून घाऊक भावात खरेदी करायची असल्यास आपल्याला किती नफा होऊ शकेल अशी इथंभूत माहिती आणतो. ते ऐकून जितेन वरमतो. काम सारखेच, परंतु राहुलच्या कामाची पद्धत, त्याची विचार करण्याची पद्धत आणि कामाला दिलेले पूर्णत्त्व यामुळे त्याचे काम आपल्यापेक्षा वरचढ ठरते, हे जितेन च्या लक्षात येते. तो राजीनामा मागे घेतो आणि राहुलच्या हाताखाली राहून काम अधिक चांगल्या रीतीने पूर्ण कसे करता येईल हे शिकून घेतो. 

आता तुम्हालाही बालपणीची अकबर बिरबलाची गोष्ट आठवली ना? बिरबलाच्या जागी बेगम आपल्या भावाचा वशिला लावू पाहते, पण बिरबल म्हणजे आजचा राहुल असतो. जो कामात चोख आणि उजवा असतो. आपल्यालाही अशा राहुलचा, बिरबलाचा आदर्श ठेवायचा आहे. यशाचा मार्ग असाच शोधायचा असतो. त्यामुळे दुसऱ्याच्या यशाने वाईट वाटून न घेता आपण कुठे कमी पडत आहोत, याचा अभ्यास करा आणि आपल्या यशाची वाट तयार करा. तुम्हालाही निश्चितच यश मिळेल!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी