शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

ही दोन रत्नं तुम्हालाही मिळाली, तर तुम्हीसुद्धा या व्यापाऱ्यासारखे वैभव उपभोगाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 08:00 IST

अशी श्रीमंती मिळवा, जी तुमच्याकडून कोणी कधीच हिरावून घेऊ शकणार नाही!

उंटांचा एक व्यापारी होता. त्याच्याकडील उंटांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती. तसे असले, तरी काही उंट त्याने हौस म्हणून आपल्या संग्रही ठेवले होते. एक दिवस एका उंटांच्या बाजारात गेला असता, उंच आणि देखण्या उंटावर त्याची नजर स्थिरावली. त्याने उंटाच्या विक्रेत्याकडे चौकशी केली. दोघांनी बोलणी करून उंटाची विंâमत नक्की केली. सौदा झाला आणि उंट व्यापाऱ्याला मिळाला. 

उंट घेऊन आपल्या गावी जात असताना व्यापाऱ्याला जाणवले, की उंटाच्या पाठीवर पांघरलेली झूल फारच बोजड आहे. त्याने सहकाऱ्याला सांगून ती काढायला लावली. सहकाऱ्याने झूल काढताच, त्याला लागून असलेल्या खिशात बहुमुल्य रत्नांची पुरचुंडी होती. सहकारी आनंदाच्या भरात व्यापाऱ्याजवळ आला आणि म्हणाला, तुम्हा नफाच नफा झाला. उंटाच्या खरेदीत रत्नांची बोहणी झाली.

व्यापाऱ्याने ती रत्न पाहिली आणि मोर्चा परत बाजाराच्या दिशेने वळवायला सांगितला. सहकारी चाट पडला. तो म्हणाला `हाती आलेली लक्ष्मी परत का देताय?'व्यापारी काही न बोलता उंट घेऊन बाजारात आला. विक्रेता संभ्रमित झाला. त्याला वाटले उंटवापसी साठी व्यापारी परत आला की काय. पण पाहतो तर चित्र वेगळेच होते. व्यापाऱ्याने रत्नांची पुरचुंडी त्याच्या हाती टेकवली. विक्रेता आश्चर्यचकित झाला. कारण असे काही घडले, हे त्याच्या ध्यानीमनीही नव्हते. त्याने पुरचुंडी उघडून पाहिली. त्यात सगळी रत्ने जशी च्या तशी होती. तो म्हणाला, `मी कोणत्या शब्दात तुमचे आभार मानू हे कळत नाही. आज मी व्यापार करण्याच्या नादात खूप मोठे नुकसान करून बसलो असतो. भेट म्हणून तुम्ही कृपया दोन रत्ने घ्या.'

व्यापारी म्हणाला, 'माझ्या आवडीची दोन रत्ने मी आधीच काढून घेतली आहेत.'विक्रेता चक्रावला. सगळी रत्ने जिथल्या तिथे असताना व्यापाऱ्याने कोणती रत्ने घेतली असतील या विचाराने तो हैराण झाला. त्यावर व्यापारी हसत म्हणाला, ती रत्ने आहेत `प्रामाणिकपणा' आणि `माणुसकी!' मी या दोन रत्नांची निवड केली आहे. त्यामुळे खरी रत्ने मिळाली नाहीत, तरी या रत्नांमुळे मला सुखाची झोप, आनंद, समाधान, माणुसकीवरील विश्वास मिळाला आहे, तो लाखमोलाचा आहे.

आपण ज्या गोष्टीत आनंद शोधतो, त्या मुळात दु:खाचे कारण असतात. म्हणून व्यापाऱ्यासारखे रत्नपारखी होऊन खऱ्या रत्नांची निवड करा, जेणेकरून तुम्हाला मिळालेले वैभव आणि श्रीमंती कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही...!