शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानी नसले तरी चालेल, परंतु अज्ञानी नसावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 13:39 IST

अज्ञानी माणसाचे भटकणे माजलेल्या सरड्याप्रमाणे निरर्थक असते. तो कुळाचार मानत नाही. गावात सोडलेला पोळ जसा मोकाटपणे भटकतो, तसे त्याचे चित्त विषयांच्या ठिकाणी भरकटत असते.

आपले पूर्वज नेहमी म्हणत, दोन इयत्ता कमी शिकलेला असेल, तरी चालेल, पण अर्धवट ज्ञान किंवा अगदीच अज्ञान नको. कारण या दोन्ही गोष्टी मारक आहेत. गीतेच्या तेराव्या अध्यायात अज्ञानं यदतोऽन्यथा, म्हणजे ज्ञानलक्षणांशिवाय जे काही आहे, ते सर्व अज्ञान होय, एवढाच उल्लेख आहे. पण ज्ञानदेवांनी मात्र त्या उल्लेखाचा आधार घेऊन अज्ञानाचे निदर्शक असलेल्या दुर्गुणांचे स्वरूप सविस्तर स्पष्ट केले आहे. ज्ञानदेव म्हणतात,

एरव्ही ज्ञान फुडे जालिया, अज्ञान जाणावे धनंजया।जे ज्ञान नव्हे ते अपैसया, अज्ञानचि।

हेही वाचा : परमार्थाच्या नावावर पाखंडीपणा करणाऱ्यांचा संत कबीरांनी आपल्या पदातून घेतला समाचार!

जे ज्ञानाच्या कक्षेत येत नाही, ते अज्ञानच नव्हे काय? दिवस मावळल्यावर रात्रीशिवाय दुसरे काय असणार? अज्ञानी माणूस कसा असतो म्हणून सांगावे? तो प्रतिष्ठेसाठी जगतो. मानाची वाट पाहतो. सत्कारामुळे संतुष्ट होतो. विद्येचा पसारा घालतो. आपल्या पुण्यकर्माची दवंडी पिटतो. अंगाला भस्म फासून सामान्य लोकांना फसवत राहतो. त्याचे सहज बोलणेही भाल्यापेक्षा अधिक टोचते. त्याचे जगणे म्हणजे हिंसेचे घरच असते. इच्छित वस्तूच्या लाभाने ते हुरळून जातो किंवा तिच्या हानीमुळे कष्टी होतो. स्तुतीमुळे फुशारून जातो अथवा निंदा ऐकल्यावर कपाळ धरून बसतो. पिकलेली लिंबोळी वरून सुंदर दिसते. पण आत कडू असते. तसेच त्याचे बाह्य आचरण चांगले दिसले, तरी मनाने तो घातकी असतो. आपल्या गुरुपासून विद्या शिकून त्या गुरुवरच उलटतो. अज्ञानी माणूस कर्तव्याविषयी आळशी असतो. त्यांचे मन संशयाने भरलेले असते. ज्ञानदेव सांगतात,

जैसे पोटालागी सुणे, उघडे झाकले न म्हणे,तैसे आपुले परावे नेणे, द्रव्यालागी।

कुत्रे पोटाला अन्न मिळवण्यासाठी एखादा पदार्थ झाकलेला आहे की उघडा आहे, असा विचार करत नाहीत. तसाच अज्ञानी माणूस द्रव्याच्या लोभाने आपले व परके अशी निवड जाणत नाही. त्याला पाप करायची लाज वाटत नाही. पुण्याविषयी तो बेफिकीर असतो. गवताचे बी मुंगीच्याही धक्क्याने आपली जागा सोडते, त्याप्रमाणे थोड्या स्वार्थासाठी असे लोक निश्चयापासून ढळतात. मनोरथांच्या ओघाने त्याचे मन भटकत राहते. 

अज्ञानी माणसाचे भटकणे माजलेल्या सरड्याप्रमाणे निरर्थक असते. तो कुळाचार मानत नाही. गावात सोडलेला पोळ जसा मोकाटपणे भटकतो, तसे त्याचे चित्त विषयांच्या ठिकाणी भरकटत असते. तो केवळ भोगांसाठी एकसारखा कष्ट करतो. आपले व्यसन हे दूषण नसून भूषणच आहे, असे मानून तो स्थिरावतो. देवीचा डोलारा डोक्यावर घेऊन देवर्षी जसा घुमू लागतो, तसा तारुण्याने मस्त होऊन छाती पुढे काढून तो चालतो. 

बेडूक सापाच्या तोंडात सगळा गिळला जात असतो. तेवढ्यात माशी बघून ती खाण्यासाठी बेडूक जीभ बाहेर काढतो, पण आपण स्वत: मरत आहोत, याचे भान त्या बेडकाला राहत नाही. तशीच स्थिती अज्ञानी माणसाची असते. मृत्यू जवळ आला आहे, हे स्वार्थाच्या कैफात त्याला पटत नाही. असा माणूस अज्ञानदेशीचा रावो म्हणजे अज्ञानरूपी देशातला राजा असतो, असे ज्ञानदेव सांगतात.

हेही वाचा : सत्याने वागा, नीतिन्यायाने चाला, ही शिकवणारे गुरु, समाजशिक्षक यांची गरज!