शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ज्ञानी नसले तरी चालेल, परंतु अज्ञानी नसावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 13:39 IST

अज्ञानी माणसाचे भटकणे माजलेल्या सरड्याप्रमाणे निरर्थक असते. तो कुळाचार मानत नाही. गावात सोडलेला पोळ जसा मोकाटपणे भटकतो, तसे त्याचे चित्त विषयांच्या ठिकाणी भरकटत असते.

आपले पूर्वज नेहमी म्हणत, दोन इयत्ता कमी शिकलेला असेल, तरी चालेल, पण अर्धवट ज्ञान किंवा अगदीच अज्ञान नको. कारण या दोन्ही गोष्टी मारक आहेत. गीतेच्या तेराव्या अध्यायात अज्ञानं यदतोऽन्यथा, म्हणजे ज्ञानलक्षणांशिवाय जे काही आहे, ते सर्व अज्ञान होय, एवढाच उल्लेख आहे. पण ज्ञानदेवांनी मात्र त्या उल्लेखाचा आधार घेऊन अज्ञानाचे निदर्शक असलेल्या दुर्गुणांचे स्वरूप सविस्तर स्पष्ट केले आहे. ज्ञानदेव म्हणतात,

एरव्ही ज्ञान फुडे जालिया, अज्ञान जाणावे धनंजया।जे ज्ञान नव्हे ते अपैसया, अज्ञानचि।

हेही वाचा : परमार्थाच्या नावावर पाखंडीपणा करणाऱ्यांचा संत कबीरांनी आपल्या पदातून घेतला समाचार!

जे ज्ञानाच्या कक्षेत येत नाही, ते अज्ञानच नव्हे काय? दिवस मावळल्यावर रात्रीशिवाय दुसरे काय असणार? अज्ञानी माणूस कसा असतो म्हणून सांगावे? तो प्रतिष्ठेसाठी जगतो. मानाची वाट पाहतो. सत्कारामुळे संतुष्ट होतो. विद्येचा पसारा घालतो. आपल्या पुण्यकर्माची दवंडी पिटतो. अंगाला भस्म फासून सामान्य लोकांना फसवत राहतो. त्याचे सहज बोलणेही भाल्यापेक्षा अधिक टोचते. त्याचे जगणे म्हणजे हिंसेचे घरच असते. इच्छित वस्तूच्या लाभाने ते हुरळून जातो किंवा तिच्या हानीमुळे कष्टी होतो. स्तुतीमुळे फुशारून जातो अथवा निंदा ऐकल्यावर कपाळ धरून बसतो. पिकलेली लिंबोळी वरून सुंदर दिसते. पण आत कडू असते. तसेच त्याचे बाह्य आचरण चांगले दिसले, तरी मनाने तो घातकी असतो. आपल्या गुरुपासून विद्या शिकून त्या गुरुवरच उलटतो. अज्ञानी माणूस कर्तव्याविषयी आळशी असतो. त्यांचे मन संशयाने भरलेले असते. ज्ञानदेव सांगतात,

जैसे पोटालागी सुणे, उघडे झाकले न म्हणे,तैसे आपुले परावे नेणे, द्रव्यालागी।

कुत्रे पोटाला अन्न मिळवण्यासाठी एखादा पदार्थ झाकलेला आहे की उघडा आहे, असा विचार करत नाहीत. तसाच अज्ञानी माणूस द्रव्याच्या लोभाने आपले व परके अशी निवड जाणत नाही. त्याला पाप करायची लाज वाटत नाही. पुण्याविषयी तो बेफिकीर असतो. गवताचे बी मुंगीच्याही धक्क्याने आपली जागा सोडते, त्याप्रमाणे थोड्या स्वार्थासाठी असे लोक निश्चयापासून ढळतात. मनोरथांच्या ओघाने त्याचे मन भटकत राहते. 

अज्ञानी माणसाचे भटकणे माजलेल्या सरड्याप्रमाणे निरर्थक असते. तो कुळाचार मानत नाही. गावात सोडलेला पोळ जसा मोकाटपणे भटकतो, तसे त्याचे चित्त विषयांच्या ठिकाणी भरकटत असते. तो केवळ भोगांसाठी एकसारखा कष्ट करतो. आपले व्यसन हे दूषण नसून भूषणच आहे, असे मानून तो स्थिरावतो. देवीचा डोलारा डोक्यावर घेऊन देवर्षी जसा घुमू लागतो, तसा तारुण्याने मस्त होऊन छाती पुढे काढून तो चालतो. 

बेडूक सापाच्या तोंडात सगळा गिळला जात असतो. तेवढ्यात माशी बघून ती खाण्यासाठी बेडूक जीभ बाहेर काढतो, पण आपण स्वत: मरत आहोत, याचे भान त्या बेडकाला राहत नाही. तशीच स्थिती अज्ञानी माणसाची असते. मृत्यू जवळ आला आहे, हे स्वार्थाच्या कैफात त्याला पटत नाही. असा माणूस अज्ञानदेशीचा रावो म्हणजे अज्ञानरूपी देशातला राजा असतो, असे ज्ञानदेव सांगतात.

हेही वाचा : सत्याने वागा, नीतिन्यायाने चाला, ही शिकवणारे गुरु, समाजशिक्षक यांची गरज!