शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

बाळाचे बारसे करत असाल, तत्पूर्वी ज्योतिषशास्त्राने केलेल्या सूचना वाचा. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 12:21 IST

हा सोहळा केवळ नामकरण विधी नाही, तर आयुष्यभराची ओळख देणारा उत्सव आहे. 

बाळ जन्माला आले की रडत असते, ते 'कोssहम कोssहम' म्हणजे 'मी कोण' असे स्वतःची ओळख विचारत असते. त्याला अनेक लाडिक हाकांनी बोलावले जाते. परंतु बाराव्या दिवशी किंवा दीड-दोन महिन्यांनी पाळण्यात घालून बारसे केले जाते. त्यावेळेस त्याला सुयोग्य नाव देऊन 'सोहम' म्हणजे तू कोण आहेस, कुठल्या कुळात जन्माला आला आहेस ही ओळख दिली जाते. त्यामुळे हा सोहळा केवळ नामकरण विधी नाही, तर आयुष्यभराची ओळख देणारा उत्सव आहे. 

>> बाळाचे नाव काय हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. ते राशीवरूनच ठेवावे, असा ज्योतिषशास्त्राचा आग्रह असतो. कारण त्यावरून बाळाचे सौभाग्य, आरोग्य, पैसा, भविष्य या गोष्टींचा उलगडा होतो. नावाचा अक्षरावरून जन्म वेळी चन्द्रस्थिती कशी होती हे कळते आणि त्यावरून उर्वरित अनुमान काढता येते. 

>> ज्योतिष शास्त्राने १२ राशींवर आधारित वेगवेगळे अनुमान काढले आहेत. नावाचे अद्याक्षर आणि बाकीची ग्रहस्थिती यावरून बाळाला नाव ठेवणे उचित ठरते. बाळाचे नाव ठरवताना जन्म नक्षत्रदेखील पाहिले जाते. 

>> बाळाच्या जन्मानंतर दहाव्या, बाराव्या किंवा सोळाव्या दिवशी बारसे केले तर मुहूर्त बघावा लागत नाही. जर तेव्हा शक्य नसेल, तर पंचांग पाहून शुभ मुहूर्तावर नामकरण विधी केला जातो. 

>> नामकरण संस्कारासाठी अनुराधा, पुनर्वसु, माघ, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तरभाद्रपदा, स्वाती, धनिष्ठा, श्रवण, रोहिणी, अश्विनी, मृगशिर, रेवती, हस्त आणि मृगशिर, रेवती, हस्त और पुश्य नक्षत्र उत्तम मानले जातात. 

>> पौर्णिमा आणि अमावस्येला नामकरण विधी करू नये.