शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

समतेची असेल दृष्टी, तर दिसेल परमार्थाची सृष्टी!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 4, 2021 08:00 IST

मनुष्यस्वभाव असा आहे, की तो बाह्य रुपाला महत्त्व देतो. व्यक्तीच्या कपड्यांवरून, राहणीमानावरून त्याची पारख केली जाते. मात्र, `ऊस डोंगापरी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा' हे मर्म आपण विसरून जातो. समोरच्याचे ज्ञान, स्वभाव, गुण यांची पारख न करता सत्ता, संपत्ती, श्रीमंतीला मान देतो. या स्वभावामुळेच समाजात केवळ आर्थिक नव्हे, तर मानसिक दरी देखील निर्माण होते. 

ज्योत्स्ना गाडगीळ

भगवंताने प्रत्येकाला आपले काम योजून दिले आहे. त्याच्या कृपेने ते कार्य सुरळीतपणे पार पडत आहे. त्याने कोणालाही काहीही उणे पडू दिले नाही. प्रत्येकाकडे काही ना काही विशेष दिले आहे. आपल्याकडील ही विशेष बाब कोणती, हे काही जणांना उमगते, तर काही जणांना नाही. ज्यांना उमगते, त्यांना आपल्या अस्तित्वाचे मोल कळते आणि ज्यांना उमगत नाही, ते केवळ आपल्यापेक्षा दुसऱ्यांच्या वाट्याला किती छान गोष्टी आहेत, याची मोजदाद करत वेळ व्यर्थ वाया घालवतात. हा फरक आहे दृष्टीकोनाचा. काय आहे यावर विचार करायचा की काय नाही याची काळजी, हे समीकरण व्यक्तीपरत्वे बदलत जाते. याबाबत तुकाराम महाराज विठुरायाला सांगतात, 

समचरण दृष्टि विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो।आणिक नलगे मायिक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा।ब्रह्मादिक पदे दु:खाची शिराणी, तेथे चित्त झणी जडो देसी।तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत।

हेही वाचा : सत्व रज तमात्मक केला 'काकडा'; देवाला साद घालण्यासाठी आरतीचे विविध प्रकार! 

हे विठुराया, आम्हालाही तुझ्यासारखी समतेची दृष्टी दे. तू ज्याप्रमाणे तुझ्या लेकरांकडे पाहताना भेदभाव करत नाहीस, तसे आम्हालाही वागता यावे, हीच प्रार्थना आहे. विषयांमध्ये अडकत गेलो, की मनातील द्वंद्व वाढत जाते, भेदभाव वाढतो आणि अद्वैताशी जोडले जाणे कठीण होऊन बसते. मोठ्या पदांची अभिलाषा करावी, तर जबाबदाऱ्यांचे काटेरी मुकुटही आनंदाने घालावे लागतात. त्यात आम्ही इतके अडकून जातो, की खरा आनंद कोणता हेदेखील विसरून जातो. आयुष्याचे मर्म कळेपर्यंत उशीर होतो आणि जे कमावण्यासाठी राबलो, ते नाशवंत होते याचा साक्षात्कार होतो. म्हणून आम्हाला तुझी दृष्टी हवी. समतेने, ममत्वतेने सर्वांकडे पाहणारी. 

मनुष्यस्वभाव असा आहे, की तो बाह्य रुपाला महत्त्व देतो. व्यक्तीच्या कपड्यांवरून, राहणीमानावरून त्याची पारख केली जाते. मात्र, `ऊस डोंगापरी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा' हे मर्म आपण विसरून जातो. समोरच्याचे ज्ञान, स्वभाव, गुण यांची पारख न करता सत्ता, संपत्ती, श्रीमंतीला मान देतो. या स्वभावामुळेच समाजात केवळ आर्थिक नव्हे, तर मानसिक दरी देखील निर्माण होते. 

याउलट वारीमध्ये सर्वधर्म, सर्वजाती, सर्व वर्गातील लोक वारकरी होऊन विठुरायाच्या भेटीला जातात. तेव्हा आपपरभाव राहतच नाही. जय हरी माऊली म्हणत, `एकमेका लागतील पायी रे' या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे सगळे एका प्रवाहात सहभागी होतात. मात्र, वारीतून बाहेर आल्यावर पुन्हा जर श्रेष्ठ कनिष्ठ भाव निर्माण होत असेल, तर काय उपयोग? यासाठी आपले जगणे ही रोजचीच वारी आहे असे समजून `जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत' या उक्तीप्रमाणे एकमेका पायी लागावे आणि वारीचा आनंद लुटावा. हाच भावार्थ आणि हाच परमार्थ!

हेही वाचा : बोलताना जरा सांभाळून, शब्दांना तलवारीपेक्षा जास्त धार असते!