शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

रोज नाही, तर निदान मंगलप्रसंगी चुलीचे पूजन करावे असे म्हणतात, काय असेल त्यामागील शास्त्र? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 18:10 IST

अग्नी हा नारायण आणि अन्न हे ब्रह्म स्वरूप आहे. आणि हे आपल्या प्रमुख दैवतांपैकी आहेत. पण ही दोन्ही दैवते मानवावर रोज कृपा करतात. त्यांचे प्रमुख साधन कोणते? तर चूल. म्हणून तिलाही आपल्या पूर्वजांनी देवतेचे स्वरूप दिले आहे. 

घरोघरी पूर्वी मातीच्या चुली होत्या, शेगड्या होत्या. त्यानंतर रॉकेलचे स्टोव्ह त्यांच्या जोडीला आले. नंतर विद्युत शेगड्या आल्या आणि आता तर घरोघरी गॅसच्या शेगड्यांचा तसेच इंडक्शनचा प्रामुख्याने वापर होत आहे. 

चूल इतिहास जमा झालेली असली, तरी तिच्या पूर्वस्मृती जुन्या मंडळींच्या मनात अजूनही जागत्या आहेत. एवढेच काय तर आधुनिक काळात फॅशन म्हणून चुलीवरच्या जेवणाची फॅशन नव्याने रूढ होताना दिसत आहे. जिच्यात अग्नी प्रज्वलित केला जातो ती चूल. मग तिचे स्वरूप पारंपरिक असो नाहीतर आधुनिक. तिचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. 

अग्नी हा नारायण आणि अन्न हे ब्रह्म स्वरूप आहे. आणि हे आपल्या प्रमुख दैवतांपैकी आहेत. पण ही दोन्ही दैवते मानवावर रोज कृपा करतात. त्यांचे प्रमुख साधन कोणते? तर चूल. म्हणून तिलाही आपल्या पूर्वजांनी देवतेचे स्वरूप दिले आहे. 

स्वयंपाक झाला आणि चूल शांत झाली की पूर्वी स्त्रिया शेणाने चूल सारवून ठेवत. दुसऱ्या दिवशी सकाळी चूल सुरु करण्याआधी दोन बोटं रांगोळी काढून हळद कुंकू वाहत असत. अन्न शिजल्यावर पान वाढण्यापूर्वी चार शिते त्यावर किंचित तूप टाकून प्रथम ते चुलीतील अग्नीत टाकत असत. हा दैनंदिन कुलाचार होता. चुलीला देवत्त्व दिल्यामुळे सुतकासारख्या दिवसात तिला शिवत नसत. तसेच तिला पायही लावत नसत. लग्नकार्यापूर्वी घरोघरी विटांची मोठी चूल म्हणून चुला घालीत किंवा राना वनात आवळी भोजन , मारग मळणे अशा प्रसंगी प्रसंगी तात्पुरती चूल मांडून त्यावर अन्न शिजवत असत. 

आज या पद्धती शिल्लक नाहीत. गॅस किंवा तत्सम आधुनिक उपकरणांमुळे अन्न शिजवण्याची प्रक्रिया सोपी झाली. परंतु त्यामागेही शक्ती आहेच. त्या शक्तीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोज रांगोळी नाही, तर निदान गॅस सुरू करण्यापूर्वी शेगडीला स्पर्श करून कृतज्ञता नक्कीच व्यक्त करू शकतो. गृहप्रवेश, वास्तुशांतीच्या वेळी आजही शेगडीचे पूजन होते. परंतु मंगलप्रसंगी, सण वारी आठवणीने तिची पूजा करावी. हात जोडावे आणि चुकूनही अपघात होऊ नयेत अशी प्रार्थना करावी. 

निर्जीव वस्तुंना कळत नाही असे आपल्याला वाटते, परंतु भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य हेच आहे, की तिने आपल्याला चराचरात परमेश्वर पहायला शिकवला आहे. अशा उदात्त संस्कृतीचा आदर बाळगून छोट्या कृतीतून मोठी परंपरा आपल्याला नक्कीच जतन करता येईल.