शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
2
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
3
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
4
भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
5
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
6
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
7
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
8
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
9
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
10
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
11
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
12
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
13
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
14
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
15
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
16
२७ जागांवर वंचित कुणाचा करणार 'गेम', महापालिका निवडणुकीत ५३ उमेदवार उतरवले रिंगणात
17
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
18
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
19
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
20
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
Daily Top 2Weekly Top 5

रोज नाही, तर निदान मंगलप्रसंगी चुलीचे पूजन करावे असे म्हणतात, काय असेल त्यामागील शास्त्र? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 18:10 IST

अग्नी हा नारायण आणि अन्न हे ब्रह्म स्वरूप आहे. आणि हे आपल्या प्रमुख दैवतांपैकी आहेत. पण ही दोन्ही दैवते मानवावर रोज कृपा करतात. त्यांचे प्रमुख साधन कोणते? तर चूल. म्हणून तिलाही आपल्या पूर्वजांनी देवतेचे स्वरूप दिले आहे. 

घरोघरी पूर्वी मातीच्या चुली होत्या, शेगड्या होत्या. त्यानंतर रॉकेलचे स्टोव्ह त्यांच्या जोडीला आले. नंतर विद्युत शेगड्या आल्या आणि आता तर घरोघरी गॅसच्या शेगड्यांचा तसेच इंडक्शनचा प्रामुख्याने वापर होत आहे. 

चूल इतिहास जमा झालेली असली, तरी तिच्या पूर्वस्मृती जुन्या मंडळींच्या मनात अजूनही जागत्या आहेत. एवढेच काय तर आधुनिक काळात फॅशन म्हणून चुलीवरच्या जेवणाची फॅशन नव्याने रूढ होताना दिसत आहे. जिच्यात अग्नी प्रज्वलित केला जातो ती चूल. मग तिचे स्वरूप पारंपरिक असो नाहीतर आधुनिक. तिचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. 

अग्नी हा नारायण आणि अन्न हे ब्रह्म स्वरूप आहे. आणि हे आपल्या प्रमुख दैवतांपैकी आहेत. पण ही दोन्ही दैवते मानवावर रोज कृपा करतात. त्यांचे प्रमुख साधन कोणते? तर चूल. म्हणून तिलाही आपल्या पूर्वजांनी देवतेचे स्वरूप दिले आहे. 

स्वयंपाक झाला आणि चूल शांत झाली की पूर्वी स्त्रिया शेणाने चूल सारवून ठेवत. दुसऱ्या दिवशी सकाळी चूल सुरु करण्याआधी दोन बोटं रांगोळी काढून हळद कुंकू वाहत असत. अन्न शिजल्यावर पान वाढण्यापूर्वी चार शिते त्यावर किंचित तूप टाकून प्रथम ते चुलीतील अग्नीत टाकत असत. हा दैनंदिन कुलाचार होता. चुलीला देवत्त्व दिल्यामुळे सुतकासारख्या दिवसात तिला शिवत नसत. तसेच तिला पायही लावत नसत. लग्नकार्यापूर्वी घरोघरी विटांची मोठी चूल म्हणून चुला घालीत किंवा राना वनात आवळी भोजन , मारग मळणे अशा प्रसंगी प्रसंगी तात्पुरती चूल मांडून त्यावर अन्न शिजवत असत. 

आज या पद्धती शिल्लक नाहीत. गॅस किंवा तत्सम आधुनिक उपकरणांमुळे अन्न शिजवण्याची प्रक्रिया सोपी झाली. परंतु त्यामागेही शक्ती आहेच. त्या शक्तीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोज रांगोळी नाही, तर निदान गॅस सुरू करण्यापूर्वी शेगडीला स्पर्श करून कृतज्ञता नक्कीच व्यक्त करू शकतो. गृहप्रवेश, वास्तुशांतीच्या वेळी आजही शेगडीचे पूजन होते. परंतु मंगलप्रसंगी, सण वारी आठवणीने तिची पूजा करावी. हात जोडावे आणि चुकूनही अपघात होऊ नयेत अशी प्रार्थना करावी. 

निर्जीव वस्तुंना कळत नाही असे आपल्याला वाटते, परंतु भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य हेच आहे, की तिने आपल्याला चराचरात परमेश्वर पहायला शिकवला आहे. अशा उदात्त संस्कृतीचा आदर बाळगून छोट्या कृतीतून मोठी परंपरा आपल्याला नक्कीच जतन करता येईल.