शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षी गणपती बसवला व दुसरे वर्षी बसवला नाही तर चालेल का? शास्त्र काय सांगते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 17:16 IST

प्रासंगिक अडचणी लक्षात घेता, शास्त्राने कोणती तडजोड सांगितली आहे, ते पाहू.

गणपती हे आपल्या सर्वांचे आवडते दैवत. बाप्पा आपल्या घरी यावा, त्याने आपल्याकडचा पाहुणचार घ्यावा असे प्रत्येक भक्ताला वाटते. अनेकदा लहान मुलांच्या आग्रहास्तव घरात गणपती आणण्याची प्रथा नसतानाही गणपती बसवला जातो, परंतु पुढच्या वर्षी उत्साह मावळला, की गणपती बसवणे सक्तीचे वाटू लागते. मग त्यात भक्तीभाव न राहता केवळ सोपस्कार उरतो. असे केल्याने पाप-पुण्याचा प्रश्न उद्भवत नाही, परंतु जी गोष्ट आपल्याला सातत्याने टिकवता येणार नाही, त्याचा दूरदृष्टीने विचार करून सुरुवात करायला हवी. असा पाहुणचार आपल्याला तरी आवडेल का? मग देवाचा तरी अवमान आपण का करावा? हा साधा विचार आपण केला पाहिजे. तसे असले, तरी काही प्रासंगिक अडचणी लक्षात घेता, शास्त्राने कोणती तडजोड सांगितली आहे, ते पाहू.

गणपती बसवणे हा कुळाचार नाही. भाद्रपदातील गणेशाच्या मूर्तीला आपण पार्थिव म्हणतो. तो मातीपासून हातावर बसेल एवढ्याच उंचीचा बनवायचा, त्याची प्राणप्रतिष्ठा करायची, पूजन करायचे व लगेच विसर्जन करायचे. ही मूळ प्रथा होती. भक्तांनी आपल्या सोयीने, उत्साहाने त्यात भर घातली. 

गणपतीचा उत्सव केला. दोन दिवस, पाच दिवस, दहा दिवस घरी बसवला आणि निरोप दिला. गणपतीनेही भक्तांचा यथाशक्ती केलेला पाहुणचार वेळोवेळी स्वीकारला. एखाद वर्षी कोणाला गणपती बसवणे शक्य झाले नाही, तर त्याच्यावर कधी अवकृपा केली नाही. की कधी भक्तांचा राग धरला नाही, पुढच्या वर्षी तेवढ्याच उत्साहात तो वाजत गाजत आला.

त्यामुळे एक वर्षी गणपती बसवला आणि दुसऱ्या वर्षी खंड पडला आणि पुढेही पडत राहीला तर त्यात कोणतेही पाप लागणार नाही. देवाची क्षमा मागून आपली अडचण सांगून देवाला निरोप दिला, तरी देव आपले अपराध पोटात घेतो. पण म्हणून, देवाला गृहीत धरणेही योग्य नाही. हे व्रत आहे, घेतले तर पाळले पाहिजे, आणि जमणार नसेल तर भक्तीभावाने दोन हस्तक व तिसरे मस्तक जोडून देवाला नमस्कार केला पाहिजे.