शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
2
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
3
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
4
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
5
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
7
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
8
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
9
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
10
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
11
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
12
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
13
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
14
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
15
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
17
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
18
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
19
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
20
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

गोष्ट कशी असावी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 4:26 AM

नवीन चित्रपटसृष्टीने नैतिकता पायदळी तुडविलेली आहे. त्यातून माणूस घडतो, असं वाटत नाही. वैभव आलं; पण सुख विरळ झालं.

- बा. भो. शास्त्रीजुनी पिढी गोष्टी ऐकून मोठी झाली. आताची पिढी कार्टून पाहात मोठी होत आहे. गोष्टीत संसार, शेतकरी, राजा, शिकारी, भिकारी असे अनेक विषय असतात. तिचं तात्पर्य कुठलातरी ज्ञानाचा पैलू सांगून जातो. काय करावं, काय करू नये हे त्यात सांगितलं जातं. ग्रामीण भागात गोष्ट सांगणारे काही गोष्टीवेल्हाळ माणसं असत. त्यांचा अभिनय, शब्दफेक, आवाजाचे चढ-उतार, गोष्टीनुसार विषयाला अनुकूल रसाविष्कार ते करीत असत. एकच गोष्ट तीन-चार तास चालायची. दोन तासांची करमणूक करणारा चित्रपट करोडो रुपये खर्च करून तयार होतो. गोष्ट स्वस्त असायची. आजच्या कथाकथन, एकपात्री प्रयोगांचा उगम तिथूनच झाला आहे. मनावर चांगले संस्कार त्यातून मिळत होते. एक आटपाट नगर होतं, इथून प्रत्येक गोष्ट सुरू होते. सर्वज्ञ गोष्टीवेल्हाळ होते. त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा स्वतंत्र ग्रंथ आहे. एकदा नागदेव आणि पाठक दोघांची एकांतात चर्चा रंगली. ती तर्कवितर्काने वादरूप झाली. चर्चेचं भांडणात रूपांतर झालं. तुला काही येत नाही, असे दोघेही परस्पराला म्हणत होते. तेवढ्यात सर्वज्ञ तेथे गेले आणि चर्चेचं स्वरूप सुसंवादी असावं, त्याचं फलित कसं असावं यावर एक सुंदर सूत्र सांगितलं, ‘सुख: श्रेय: शृंगारु इये तीनि नाही ते काईगा गोष्टी ते अरण्यरुदन की’. चर्चा, मंथन, वार्ता, कथा, कहाण्या ही गोष्टीचीच रूपं आहेत. गोष्टीचं स्वरूप, लक्षण सांगताना सुख, श्रेय आणि शृंगार त्यात असावेत, नसता गोष्टीचं अरण्यरुदन होतं. सांगणाऱ्या, ऐकणाºया आणि पाहणाºया सगळ्यांना ती सुखद वाटावी, समाधान देणारी असावी. नवीन ज्ञान मिळाल्याचं सुख, मौलिक इतिहास कळल्याची तृप्ती लाभली पाहिजे. आता चॅनेलवरील बातम्या ऐकून थोडंसं सुख पदरात पडतं, दु:ख डोंगराएवढं मिळतं. माणसं अनावश्यक चर्चा करतात. नवीन चित्रपटसृष्टीने नैतिकता पायदळी तुडविलेली आहे. त्यातून माणूस घडतो, असं वाटत नाही. वैभव आलं; पण सुख विरळ झालं.