शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

'प्रयत्नांती परमेश्वर' का म्हटले जाते? हे सांगणारी महाभारतातील कथा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 19:11 IST

आपण फक्त प्रयत्न करायचे बाकी भार देवावर सोडून द्यायचा; तो सगळं सांभाळून घेतो!   

प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. परंतु, जिथे प्रयत्न संपतात, तिथे देवावर आणि दैवावर भार टाकण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच उरत नाही. जो प्रयत्न करतो, त्याला परमेश्वर साथ देतो. म्हणून प्रयत्नांती परमेश्वर म्हटले आहे. कोणत्याही अवघड परिस्थितीत आपण प्रयत्नच केले नाहीत, ही खंत मनात राहता कामा नये. यासाठी आधी प्रयत्न करा, बाकी परमेश्वरावर सोपवा, जसे या छोट्याशा चिऊताईने सोपवले.

महाभारताचा प्रसंग होता. कुरुक्षेत्राची तयारी केली जात होती. कुठे काही खड्डे, खाच खळगे राहिले नाहीत ना, याची पाहणी करण्यासाठी स्वत: भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह कुरुक्षेत्रावर पोहोचले. तेवढ्यात एक चिमणी उडत उडत श्रीकृष्णाजवळ आली. ती म्हणाली, 'भगवंता, या मनुष्यांच्या भांडणात आम्हा मूक जीवांना शिक्षा का? मी आणि माझी पिले कुणाच्याही अध्यात मध्यात नसताना या समराचे दुष्पपरिणाम आमच्या कुटुंबालाही झेलावे लागत आहेत. तुमच्या हत्तीदळातल्या एका हत्तीने एका ढुशात रणभूमीवरील झाड पाडले आणि झाडावरील माझे घरटे पिलांसकट जमीनिवर आले. माझ्या तान्ह्या बाळांना घेऊन मी कुठे जाऊ? भगवंता आता तुमच्याच आशेवर आम्ही आहोत. असे म्हणत चिमणी निघून गेली. श्रीकृष्णाचे डोळे पाणावले. अर्जुनाने कारण विचारले. श्रीकृष्ण काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशीपासून युद्ध सुरू होणार होते.

सगळे रणधुरंधर कुरुक्षेत्रावर पोहोचले. त्यावेळेस श्रीकृष्णाला चिमणीची आठवण झाली. युद्ध सुरू झाले, की ते इवलेसे जीव हकनाक बळी पडतील. या विचाराने कृष्णाने अर्जुनाच्या हातातील धनुष्य आणि बाण घेतले आणि दूर अंतरावर उभ्या असलेल्या हत्तीवर निशाणा धरला. हे पाहून अर्जुनाने कृष्णाला आठवण करून दिली, `भगवंता तुम्ही शस्त्र हाती घेणार नाही, असे वचन घेतले आहे.'

यावर श्रीकृष्णांनी काही न बोलता बाण सोडला. तो बाण हत्तीला न लागता त्याच्या गळ्यातल्या घंटेला लागला आणि गळ्यातली दोरी तुटून घंटा जमीनिवर पडली. काही काळात घमासान युद्ध सुरू झाले. तब्बल अठरा दिवस चालले. अनेकांचे प्राण गेले. कौरव संपले. पांडव जिंकले. 

दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण आणि अर्जुन पुन्हा रणभूमीची पाहणी करण्यासाठी निघाले. कुरुक्षेत्रावर रक्त मांसाचा चिखल पडलेला. ते पाहून अर्जुनाचे मन विदीर्ण झाले. एके ठिकाणी कृष्णाने रथ थांबवून अर्जुनाला रथापुढे आलेली घंटा उचलायला सांगितली. अर्जुनाने प्रतिप्रश्न न करता रथातून उतरून जड घंटा उचलली. घंटा उचलताच त्यातून चिमणी आणि तिची पिल्लं भेदरलेल्या अवस्थेत दिसली. एवढ्या मोठ्या गदारोळातही या इवल्याशा जिवांना जीवदान कसे मिळाले, या विचाराने आश्चर्यचकित होत अर्जुनाने कृष्णाकडे पाहिले, तर त्यावेळेस त्या पिलांची आई उडत कृष्णाजवळ आली आणि त्यांचे जीव वाचवल्याबद्दल आभार मानत होती. 'भगवंता, जे कोणीही करू शकले नसते, ते तू करून दाखवलेस. आमच्यासारख्या चिमुकल्या भक्तांची एवढ्या कठीण प्रसंगात काळजी घेतलीस. माझा विश्वास आणि माझी भक्ती राखलीस. जसा माझ्या मदतीला धावून आलास, तसाच प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जा. त्यांचे रक्षण कर आणि त्यांच्या प्रयत्नांना, जगण्याच्या उम्मेदीला बळ दे...!'