शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

'प्रयत्नांती परमेश्वर' का म्हटले जाते? हे सांगणारी महाभारतातील कथा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 19:11 IST

आपण फक्त प्रयत्न करायचे बाकी भार देवावर सोडून द्यायचा; तो सगळं सांभाळून घेतो!   

प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. परंतु, जिथे प्रयत्न संपतात, तिथे देवावर आणि दैवावर भार टाकण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच उरत नाही. जो प्रयत्न करतो, त्याला परमेश्वर साथ देतो. म्हणून प्रयत्नांती परमेश्वर म्हटले आहे. कोणत्याही अवघड परिस्थितीत आपण प्रयत्नच केले नाहीत, ही खंत मनात राहता कामा नये. यासाठी आधी प्रयत्न करा, बाकी परमेश्वरावर सोपवा, जसे या छोट्याशा चिऊताईने सोपवले.

महाभारताचा प्रसंग होता. कुरुक्षेत्राची तयारी केली जात होती. कुठे काही खड्डे, खाच खळगे राहिले नाहीत ना, याची पाहणी करण्यासाठी स्वत: भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह कुरुक्षेत्रावर पोहोचले. तेवढ्यात एक चिमणी उडत उडत श्रीकृष्णाजवळ आली. ती म्हणाली, 'भगवंता, या मनुष्यांच्या भांडणात आम्हा मूक जीवांना शिक्षा का? मी आणि माझी पिले कुणाच्याही अध्यात मध्यात नसताना या समराचे दुष्पपरिणाम आमच्या कुटुंबालाही झेलावे लागत आहेत. तुमच्या हत्तीदळातल्या एका हत्तीने एका ढुशात रणभूमीवरील झाड पाडले आणि झाडावरील माझे घरटे पिलांसकट जमीनिवर आले. माझ्या तान्ह्या बाळांना घेऊन मी कुठे जाऊ? भगवंता आता तुमच्याच आशेवर आम्ही आहोत. असे म्हणत चिमणी निघून गेली. श्रीकृष्णाचे डोळे पाणावले. अर्जुनाने कारण विचारले. श्रीकृष्ण काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशीपासून युद्ध सुरू होणार होते.

सगळे रणधुरंधर कुरुक्षेत्रावर पोहोचले. त्यावेळेस श्रीकृष्णाला चिमणीची आठवण झाली. युद्ध सुरू झाले, की ते इवलेसे जीव हकनाक बळी पडतील. या विचाराने कृष्णाने अर्जुनाच्या हातातील धनुष्य आणि बाण घेतले आणि दूर अंतरावर उभ्या असलेल्या हत्तीवर निशाणा धरला. हे पाहून अर्जुनाने कृष्णाला आठवण करून दिली, `भगवंता तुम्ही शस्त्र हाती घेणार नाही, असे वचन घेतले आहे.'

यावर श्रीकृष्णांनी काही न बोलता बाण सोडला. तो बाण हत्तीला न लागता त्याच्या गळ्यातल्या घंटेला लागला आणि गळ्यातली दोरी तुटून घंटा जमीनिवर पडली. काही काळात घमासान युद्ध सुरू झाले. तब्बल अठरा दिवस चालले. अनेकांचे प्राण गेले. कौरव संपले. पांडव जिंकले. 

दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण आणि अर्जुन पुन्हा रणभूमीची पाहणी करण्यासाठी निघाले. कुरुक्षेत्रावर रक्त मांसाचा चिखल पडलेला. ते पाहून अर्जुनाचे मन विदीर्ण झाले. एके ठिकाणी कृष्णाने रथ थांबवून अर्जुनाला रथापुढे आलेली घंटा उचलायला सांगितली. अर्जुनाने प्रतिप्रश्न न करता रथातून उतरून जड घंटा उचलली. घंटा उचलताच त्यातून चिमणी आणि तिची पिल्लं भेदरलेल्या अवस्थेत दिसली. एवढ्या मोठ्या गदारोळातही या इवल्याशा जिवांना जीवदान कसे मिळाले, या विचाराने आश्चर्यचकित होत अर्जुनाने कृष्णाकडे पाहिले, तर त्यावेळेस त्या पिलांची आई उडत कृष्णाजवळ आली आणि त्यांचे जीव वाचवल्याबद्दल आभार मानत होती. 'भगवंता, जे कोणीही करू शकले नसते, ते तू करून दाखवलेस. आमच्यासारख्या चिमुकल्या भक्तांची एवढ्या कठीण प्रसंगात काळजी घेतलीस. माझा विश्वास आणि माझी भक्ती राखलीस. जसा माझ्या मदतीला धावून आलास, तसाच प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जा. त्यांचे रक्षण कर आणि त्यांच्या प्रयत्नांना, जगण्याच्या उम्मेदीला बळ दे...!'