शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

टेबल-खुर्चीवर बसून केलेले भोजन अशास्त्रीय कसे ठरते व त्यामुळे कोणते उदरविकार जडतात?वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 12:36 IST

अन्नाला आपण पूर्णब्रह्म मानतो, त्यामुळेया अन्न वाढलेले ताट आपल्या पायाच्या पातळीशी न ठेवता चौरंगावर ठेवणे उचित ठरते.

आपल्या जुन्या संस्कृतीप्रमाणे भोजन करताना दोन प्रकारचे पाट वापरत असत. एक पाट बसण्यासाठी व दुसरा पाट ताट ठेवण्यासाठी. त्यातही ताट ठेवण्याचा पाट अधिक लांब रुंद व दोन बोटे उंच असे. त्यामागील शास्त्रीय भूमिका म्हणजे 'अन्न हे पूर्ण ब्रह्म' मानण्यात आले आहे. भोजन हे वास्तविक जेवण नसून यज्ञकर्म आहे. असे समजून अन्नग्रहण केल्यास त्या अन्नाविषयीचा व भोजन प्रक्रियेविषयीचा आदर वाढून त्यामागे एक आध्यात्मिक बैठक येते. 

अन्नाला आपण पूर्णब्रह्म मानतो, त्यामुळेया अन्न वाढलेले ताट आपल्या पायाच्या पातळीशी न ठेवता चौरंगावर ठेवणे उचित ठरते. लिंगायत समाजात आजही अन्नाचे ताट तिपाईवर ठेवून जेवण करतात असे दिसून येते. म्हणून आपल्या बैठकीपेक्षा थोड्या उंच बैठकीवर अन्नाचे ताट ठेवून भक्षण करणे हे यज्ञकर्म होईल. 

अन्नभक्षण करताना पाय पसरून, पालथी मांडी घालून वा पाय उंच करून बसण्यास निषेध सांगितला आहे. कारण पाय पसरून ताणला गेल्यास पोटातील आतडीही ताणली जातात, जठरावर ताण पडतो. पोटातील पचनक्रियेचे अवयव ताणलेल्या स्थितीत असताना अन्नग्रहण केल्यास अग्निमांद्य, अपचन, वायुप्रकोप (गॅसेस) असे उदरविकार निर्माण होतात. 

हल्ली टेबल खूर्ची घेऊन जेवायची पद्धत आहे. त्यामुळेही उदरविकारांचे प्रमाण वाढले आहे. टेबलावर अन्न ठेवून खुर्चीवर बसल्यामुळे पाय खाली सोडणे भाग पडते. त्यामुळे आपोआपच पचनेंद्रियावर ताण येतो. यासाठी टेबलावर भोजन टाळावे. व अत्यावश्यक असलयास निदान खुर्चीवर का होईना पण व्यवस्थित मांडी घालून मगच भोजन करावे. घराबाहेर तसे करणे शक्य नाही, पण निदान घरी जेवताना भारतीय बैठकीनुसार जमिनीवर बसून जेवण्याची सवय ठेवावी. कारण तिच उत्तम आरोग्याची किल्ली आहे.