शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

टेबल-खुर्चीवर बसून केलेले भोजन अशास्त्रीय कसे ठरते व त्यामुळे कोणते उदरविकार जडतात?वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 12:36 IST

अन्नाला आपण पूर्णब्रह्म मानतो, त्यामुळेया अन्न वाढलेले ताट आपल्या पायाच्या पातळीशी न ठेवता चौरंगावर ठेवणे उचित ठरते.

आपल्या जुन्या संस्कृतीप्रमाणे भोजन करताना दोन प्रकारचे पाट वापरत असत. एक पाट बसण्यासाठी व दुसरा पाट ताट ठेवण्यासाठी. त्यातही ताट ठेवण्याचा पाट अधिक लांब रुंद व दोन बोटे उंच असे. त्यामागील शास्त्रीय भूमिका म्हणजे 'अन्न हे पूर्ण ब्रह्म' मानण्यात आले आहे. भोजन हे वास्तविक जेवण नसून यज्ञकर्म आहे. असे समजून अन्नग्रहण केल्यास त्या अन्नाविषयीचा व भोजन प्रक्रियेविषयीचा आदर वाढून त्यामागे एक आध्यात्मिक बैठक येते. 

अन्नाला आपण पूर्णब्रह्म मानतो, त्यामुळेया अन्न वाढलेले ताट आपल्या पायाच्या पातळीशी न ठेवता चौरंगावर ठेवणे उचित ठरते. लिंगायत समाजात आजही अन्नाचे ताट तिपाईवर ठेवून जेवण करतात असे दिसून येते. म्हणून आपल्या बैठकीपेक्षा थोड्या उंच बैठकीवर अन्नाचे ताट ठेवून भक्षण करणे हे यज्ञकर्म होईल. 

अन्नभक्षण करताना पाय पसरून, पालथी मांडी घालून वा पाय उंच करून बसण्यास निषेध सांगितला आहे. कारण पाय पसरून ताणला गेल्यास पोटातील आतडीही ताणली जातात, जठरावर ताण पडतो. पोटातील पचनक्रियेचे अवयव ताणलेल्या स्थितीत असताना अन्नग्रहण केल्यास अग्निमांद्य, अपचन, वायुप्रकोप (गॅसेस) असे उदरविकार निर्माण होतात. 

हल्ली टेबल खूर्ची घेऊन जेवायची पद्धत आहे. त्यामुळेही उदरविकारांचे प्रमाण वाढले आहे. टेबलावर अन्न ठेवून खुर्चीवर बसल्यामुळे पाय खाली सोडणे भाग पडते. त्यामुळे आपोआपच पचनेंद्रियावर ताण येतो. यासाठी टेबलावर भोजन टाळावे. व अत्यावश्यक असलयास निदान खुर्चीवर का होईना पण व्यवस्थित मांडी घालून मगच भोजन करावे. घराबाहेर तसे करणे शक्य नाही, पण निदान घरी जेवताना भारतीय बैठकीनुसार जमिनीवर बसून जेवण्याची सवय ठेवावी. कारण तिच उत्तम आरोग्याची किल्ली आहे.