शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही कुठे राहता?.....'भ्रमात!'

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 14, 2020 17:24 IST

आपण मनुष्य आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य फक्त भ्रमात राहत असतो. अपेक्षा खूप उंचावून ठेवल्या की एक दिवस भ्रमाचा भोपळा फुटतो.

ज्योत्स्ना गाडगीळ 

एकदा एका मुलाखतीत मुलाखतकाराने उमेदवाराला प्रश्न विचारला, 'तुम्ही कुठे राहता.' 

उमेदवाराने उत्तर दिले, 'भ्रमात.'

मुलाखतकार चपापले. त्यांनी उमेदवाराला खुलासा करायला सांगितला, त्यावर उमेदवार म्हणाला, 'महोदय, आपण मनुष्य आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य फक्त भ्रमात राहत असतो. इच्छा, आकांक्षा, अपेक्षा यांचे आपल्याभोवती एवढे मोठे वलय असते, की आपण त्याच्यातच वावरत असतो आणि अपेक्षा खूप उंचावून ठेवल्या की एक दिवस भ्रमाचा भोपळा फुटतो.'

हेही वाचा: वीस हजाराच्या मोबदल्यात शेठजींनी कमावले, पुण्य, आनंद आणि समाधान!

वरील प्रसंगाचा नीट विचार केला तर लक्षात येईल, खरोखरच, आपण सगळेच जण एका कल्पनेच्या जगात वावरत असतो. त्या कल्पना आत्मोन्नती साधणाऱ्या असतील तर ठीक, मात्र अनेकदा अतिविचाराने काल्पनिक जग नैराश्याने व्यापून जाते. आपण साप साप म्हणत भुई थोपटत बसतो, मात्र वास्तव वेगळेच असते. असाच आपल्या एका शिष्याचा भ्रमाचा भोपळा, त्याच्या गुरुजींनी फोडला आणि त्याला वास्तवाची जाणीव करून दिली. त्याचा दृष्टांत-

एक गुरु होते. ते आपल्या आश्रमात राहत होते. एके दिवशी संध्याकाळची प्रार्थना आटोपल्यानंतर त्यांनी आपल्या मुख्य शिष्याला बोलावले आणि त्याच्या हातात एक पुस्तक देत म्हणाले, `हे आत ठेवून ये.'

शिष्य पुस्तक घेऊन गेला व उलट्या पावली परत आला. थरथरत म्हणाला, `गुरुदेव, गुरुदेव, आत साप आहे.'

गुरुदेव म्हणाले, `काही हरकत नाही, मी तुला एक मंत्र देतो. तू आत जाऊन मंत्र म्हण. साप निघून जाईल.'

गुरुदेवांनी मंत्र दिला. मंत्र पुटपुटत शिष्य आत गेला. उभ्याने त्याने मंत्र म्हटला, पण साप जिथल्या तिथेच होता.

शिष्य बाहेर आला व म्हणाला, `गुरुदेव, मी पुन्हा पुन्हा मंत्र म्हटला, पण साप गेला नाही.'

'असे म्हणतोस? ठीक आहे. तू आता हा दिवा घेऊन जा. मंत्राने नाही गेला, तरी दिव्याच्या प्रकाशाने तो नक्कीच पसार होईल.'

शिष्य दिवा घेऊन आत गेला. थोड्या वेळाने तो बाहेर आला, तेव्हा त्याचे तोंड उतरलेले होते. तो म्हणाला, `गुरुदेव, आत साप नव्हताच मुळी! एक दोरी पडली होती. अंधारात मला वाटले, तो सापच आहे.'

गुरुदेव मोठ्याने हसले व म्हणाले, `बाळा, दिव्याच्या प्रकाशाने तुझा भ्रमाचा भोपळा फुटला. अरे, अवघा संसार असाच भ्रमाच्या जाळ्यात गुरफटलेला आहे. हे आवरण दूर करून सत्यदर्शन हवे असेल, तर त्यासाठी ज्ञानाचा प्रकाश हवा. म्हणून ज्ञानाचा दिवा लाव आणि तो तुझ्या अंतरंगात तेवत ठेव.'

गुरुदेव बोलत होते. शिष्य शांतपणे ऐकत होता. पण त्याच्या अंतरंगात ज्ञानज्योत प्रकाशू लागली होती. 

हेही वाचा : प्रेम म्हणजे काय, सांगताहेत संत सेना महाराज