शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

तुम्ही कुठे राहता?.....'भ्रमात!'

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 14, 2020 17:24 IST

आपण मनुष्य आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य फक्त भ्रमात राहत असतो. अपेक्षा खूप उंचावून ठेवल्या की एक दिवस भ्रमाचा भोपळा फुटतो.

ज्योत्स्ना गाडगीळ 

एकदा एका मुलाखतीत मुलाखतकाराने उमेदवाराला प्रश्न विचारला, 'तुम्ही कुठे राहता.' 

उमेदवाराने उत्तर दिले, 'भ्रमात.'

मुलाखतकार चपापले. त्यांनी उमेदवाराला खुलासा करायला सांगितला, त्यावर उमेदवार म्हणाला, 'महोदय, आपण मनुष्य आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य फक्त भ्रमात राहत असतो. इच्छा, आकांक्षा, अपेक्षा यांचे आपल्याभोवती एवढे मोठे वलय असते, की आपण त्याच्यातच वावरत असतो आणि अपेक्षा खूप उंचावून ठेवल्या की एक दिवस भ्रमाचा भोपळा फुटतो.'

हेही वाचा: वीस हजाराच्या मोबदल्यात शेठजींनी कमावले, पुण्य, आनंद आणि समाधान!

वरील प्रसंगाचा नीट विचार केला तर लक्षात येईल, खरोखरच, आपण सगळेच जण एका कल्पनेच्या जगात वावरत असतो. त्या कल्पना आत्मोन्नती साधणाऱ्या असतील तर ठीक, मात्र अनेकदा अतिविचाराने काल्पनिक जग नैराश्याने व्यापून जाते. आपण साप साप म्हणत भुई थोपटत बसतो, मात्र वास्तव वेगळेच असते. असाच आपल्या एका शिष्याचा भ्रमाचा भोपळा, त्याच्या गुरुजींनी फोडला आणि त्याला वास्तवाची जाणीव करून दिली. त्याचा दृष्टांत-

एक गुरु होते. ते आपल्या आश्रमात राहत होते. एके दिवशी संध्याकाळची प्रार्थना आटोपल्यानंतर त्यांनी आपल्या मुख्य शिष्याला बोलावले आणि त्याच्या हातात एक पुस्तक देत म्हणाले, `हे आत ठेवून ये.'

शिष्य पुस्तक घेऊन गेला व उलट्या पावली परत आला. थरथरत म्हणाला, `गुरुदेव, गुरुदेव, आत साप आहे.'

गुरुदेव म्हणाले, `काही हरकत नाही, मी तुला एक मंत्र देतो. तू आत जाऊन मंत्र म्हण. साप निघून जाईल.'

गुरुदेवांनी मंत्र दिला. मंत्र पुटपुटत शिष्य आत गेला. उभ्याने त्याने मंत्र म्हटला, पण साप जिथल्या तिथेच होता.

शिष्य बाहेर आला व म्हणाला, `गुरुदेव, मी पुन्हा पुन्हा मंत्र म्हटला, पण साप गेला नाही.'

'असे म्हणतोस? ठीक आहे. तू आता हा दिवा घेऊन जा. मंत्राने नाही गेला, तरी दिव्याच्या प्रकाशाने तो नक्कीच पसार होईल.'

शिष्य दिवा घेऊन आत गेला. थोड्या वेळाने तो बाहेर आला, तेव्हा त्याचे तोंड उतरलेले होते. तो म्हणाला, `गुरुदेव, आत साप नव्हताच मुळी! एक दोरी पडली होती. अंधारात मला वाटले, तो सापच आहे.'

गुरुदेव मोठ्याने हसले व म्हणाले, `बाळा, दिव्याच्या प्रकाशाने तुझा भ्रमाचा भोपळा फुटला. अरे, अवघा संसार असाच भ्रमाच्या जाळ्यात गुरफटलेला आहे. हे आवरण दूर करून सत्यदर्शन हवे असेल, तर त्यासाठी ज्ञानाचा प्रकाश हवा. म्हणून ज्ञानाचा दिवा लाव आणि तो तुझ्या अंतरंगात तेवत ठेव.'

गुरुदेव बोलत होते. शिष्य शांतपणे ऐकत होता. पण त्याच्या अंतरंगात ज्ञानज्योत प्रकाशू लागली होती. 

हेही वाचा : प्रेम म्हणजे काय, सांगताहेत संत सेना महाराज