शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

स्वर्ग, नरक, मोक्ष या केवळ संकल्पना आहेत की आणि काही? धर्मशास्त्र सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 14:08 IST

या तीनही गोष्टी आपण पाहिलेल्या नाहीत आणि ज्यांनी पाहिल्या असतील ते सांगायला परत आले नाहीत. तरीही काळानुकाळ त्यावर विश्वास ठेवून आपण शब्दप्रयोग करतो. कारण ज्या योगीऋषींनी त्यांच्या तप:साधनेवरून जाणल्या, त्यावरून आपण या गोष्टींची कल्पना करू शकतो.

पुण्य मिळवून काय स्वर्गात जाणार आहे का? पाप करून नरकात जायचे आहे का? देहातून आत सुटका व्हावी आणि आत्म्याला मोक्ष मिळावा...जन्म-मृत्यूशी निगडित अशा कितीतरी गोष्टी आपल्या बोलण्यात येतात. स्वर्ग-नरक-मोक्ष या कल्पनेने मनुष्य पापभिरु होतो आणि वाईट कर्म करण्यापासून स्वत:ला परावृत्त ठेवतो. 

या तीनही गोष्टी आपण पाहिलेल्या नाहीत आणि ज्यांनी पाहिल्या असतील ते सांगायला परत आले नाहीत. तरीही काळानुकाळ त्यावर विश्वास ठेवून आपण शब्दप्रयोग करतो. कारण ज्या योगीऋषींनी त्यांच्या तप:साधनेवरून जाणल्या, त्यावरून आपण या गोष्टींची कल्पना करू शकतो.

ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या अस्तित्त्वातच नाहीत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या दिसत नाहीत पण त्यांचे अस्तित्त्व आपण मान्य करतो. आणखी एक उदाहरण कदाचित अतिशयोक्ती वाटू शकेल, परंतु गेले दीड वर्ष ज्या कोरोनाने जगभर थैमान घातले, तो शास्त्रज्ञांनाही दिसला नाही, पण त्याच्या अस्तित्त्वाचे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या कमी नाही. त्यामुळे त्याचेही अस्तित्त्व मान्य करावे लागलेच. 

या विश्वात न दिसणारे असे कितीतरी सत्य भरलेले आहे. ते दिसणाऱ्या वस्तूंपेक्षा अधिक सत्य आहे. त्या अदृश्यावरच हे सर्व विश्व आधारित आहे. म्हणून तर शास्त्रज्ञ अवकाशाच्या संशोधनात मग्न आहेत.

आपल्या ऋषिमुनींनी योग मार्गाने हे सर्व पूर्वी जाणले आहे. नरक, स्वर्ग, मोक्ष यातील काहीच नाही असे गृहित धरले तर धर्माचरण करणे सगळेच सोडून देतील. लोक कशालाच, कोणालाच घाबरणार नाहीत, बेबंधपणे वागतील. धर्माचरणामुळे समाजाला एक शिस्त लावलेली आहे. स्वर्ग, नरक या संकल्पनांमुळे मनुष्याला धर्माचरणासाठी प्रवृत्त केले जाते. 

कलियुगात पुण्यकर्मे लवकर फलदायी ठरतील असे गरुडपुराणात म्हटले आहे. तर पापकर्मे शीघ्रफलदायी होणार नाहीत. कारण केलेले पाप कालांतराने सिद्ध होते. कलियुगात पुण्य कर्माची सिद्धी केवळ संकल्पाने होते. पण पाप आचाराने सिद्ध होते.

हे सर्व जाणून अल्पकष्टाने महत्फल मिळणाNया या काळात प्रत्येकाने धर्माचरण करून समाजधारणा साधून आपला उद्धार करून घेणे योग्य ठरत़े