शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

करिअर, नोकरी,व्यवसायात अडचणी येत आहेत? 'हे' उपाय अवश्य करून पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 12:11 IST

करिअर आड येणारे अडथळे दूर करण्यासाठी वास्तू शास्त्राने दिलेले उपाय अवश्य करून पहा, तुम्हाला मदत होईल. 

यश अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत हे मान्य, पण करिअरची गाडी यशाच्या किंवा अपयशाच्या मार्गाने भरधाव निघाली असेल तर दोन्ही बाजूला धोके आहेच. ज्याप्रमाणे गाडीची गती नियंत्रित ठेवण्यासाठी महामार्गावर गतिरोधक असतात, तसे आपल्या करिअरच्या महामार्गावर यश-अपयशाचे गतिरोधक असणे गरजेचे आहे. गाडी यशाच्या मार्गाने धावत राहिली, तर अहंकाराने गाडीचे टायर निकामी होऊन कधीही अपघात होऊ शकतो आणि अपयशाच्या उतरणीला लागली, तर नैराश्याचा गंज लागूनही गाडी निकामी होऊ शकते. यासाठी संतुलित गतीने, टप्प्याटप्प्याने प्रगती झाली, तर आपले ध्येय आपल्याला निश्चित गाठता येईल. करिअर आड येणारे अडथळे दूर करण्यासाठी वास्तू शास्त्राने दिलेले उपाय अवश्य करून पहा, तुम्हाला मदत होईल. 

नोकरी मिळवण्याचे उपाय : नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहात, पण शुल्लक कारणावरून तुमची संधी वारंवार हुकत आहे, असे जर तुम्हाला जाणवत असेल. किंवा व्यवसायात प्रगती होताना काही अडथळे येऊन कामं थांबत आहे असे वाटत असेल तर शुक्रवारी बाजरी आणि तांदूळ आणून ठेवा. शनिवारी सकाळी काम सुरू करण्यापूर्वी पक्ष्यांना बाजरी, तांदूळ घाला. तुमचे काम मार्गी लागे पर्यंत काही शनिवार सातत्याने हा उपाय करा, लाभ होईल. 

पद, प्रतिष्ठा, सन्मान मिळवण्यासाठी : अनेकांना मेहनत करूनही जेवढा मान मिळायला हवा तेवढा मिळत नाही. एवढेच काय, तर त्यांच्या कामाची साधी दखलही घेतली जात नाही. अशा लोकांनी तांब्याच्या भांड्यात सोन्याची अंगठी रात्रभर टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी चुळ भरण्याआधी ते पाणी प्राशन करा. असे केल्याने मनाची अस्वस्थता कमी होऊन मन शांत होते, ताणतणाव कमी होतो. मात्र हा उपाय करताना तांब्याचे भांडे स्वच्छ करून घ्यावे. त्यात जो सोन्याचा दागिना टाकणार असाल, तोही स्वच्छ केलेला असावा व हा उपाय करत असेपर्यंत तो दागिना वापरू नये. त्यामुळे त्याची स्वच्छता टिकून राहील. इच्छित कामनापूर्ण होईपर्यंत हा उपाय करत राहा, अवश्य लाभ होईल. 

हितशत्रूंपासून बचावासाठी : आजच्या बनावट दुनियेत आपलं कोण आणि परकं कोण हे सांगणे अवघड आहे. लोक तोंडावर गोड बोलतात आणि पाठीत खंजीर खुपसतात. अशा मतलबी लोकांपासून बचाव करण्यासाठी आणि त्यांच्या कुरघोड्यांपासून रक्षण करण्यासाठी झोपताना डोक्याशी तांब्याचा कलश किंवा पाण्याने भरून ठेवा आणि सकाळी ते पाणी फेकून द्या. या उपायाने तुम्ही अकारण बदनामी होण्यापासून स्वतःला वाचवू शकाल. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र