शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन तुमची प्रगती थांबली आहे? त्यामागे 'हे' कारण असू शकते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 12:31 IST

महत्त्वाकांक्षा ठेवा. स्वप्नपूर्तीची धडपड करा. परंतु स्वप्न पूर्ण झाले, म्हणून थांबून न राहता, स्वप्नांच्या पुढच्या टप्प्याची आखणी करा, यश नक्की मिळेल!

एक चित्रकार होता. तो खूप छान चित्र काढत असे. चित्रकलेवरच त्याचा रोजगार अवलंबून होता. त्याचे चित्र ५०० रुपयांना विकले जात असे. या हिशोबाने तो दरमाह १५ हजार रुपये कमवत असे. 

वयोमानानुसार त्याचे हात थरथरू लागले. चित्र काढणे त्याला अवघड वाटू लागले. ही कला वंशपरंपरेने त्याच्याजवळ आली होती आणि त्याच्या पुढच्या पिढीतही संक्रमित झाली होती. त्याने आपल्या मुलाला घराची जबाबदारी खांद्यावर घेऊन चित्रकलेतून रोजगार कमवण्याचा सल्ला दिला.

मुलाची चित्रकला छान होती. चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेताही तो केवळ निरीक्षणातून सुंदर चित्रे काढू लागला. त्याने पहिल्यांदा आपले चित्र विक्रीसाठी नेले, तर त्याला दोनशे रुपए मिळाले. तो नाराज झाला. घरी परतला.

त्यालाही वडिलांसारखे एका चित्रामागे ५०० रुपयांची कमाई अपेक्षित होती. त्याने वडिलांना विचारले. ते म्हणाले, `बेटा प्रयत्न करत राहा.' मुलाने प्रयत्न सुरू ठेवले. त्याच्या चित्राला ३०० रुपये मिळू लागले. १०० रुपयांची वाढ होऊनही तो समाधानी नव्हता. तो वडिलांना म्हणाला, `तुम्ही नक्कीच काहीतरी यशाचा मंत्र माझ्यापासून लपवून ठेवत आहात. हरकत नाही. उद्या मी असे चित्र काढून दाखवीन की त्या चित्राला ५०० रुपये नक्कीच मिळतील.'

मुलाने जिद्दीने अतिशय सुंदर चित्र रेखाटले आणि त्या चित्राला ५०० च काय ७०० रुपये विंâमत मिळाली. मुलगा नाचत नाचत घरी आला. त्याने बाबांना बातमी दिली. बाबा म्हणाले, `आता तुला मी एक चित्र १००० रुपयांना कसे विकायचे ते सांगतो...'

मुलगा कुत्सितपणे म्हणाला, `बाबा, तुमचे चित्र ५०० रुपयांना विकलेत, मी तुमच्यापेक्षा २०० रुपयांची अधिक कमाई केली आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या आधारावर मला १००० रुपये कसे कमवायचे हे सांगणार आहात?'

वडील म्हणाले, `बाळा, मी माझ्या बाबांनासुद्धा असेच उत्तर दिले होते. त्यांचे चित्र जेमतेम ३०० रुपयांना विकले गेले, तेव्हा मी माझे चित्र ५०० रुपयांना विकून दाखवले होते. तेव्हा माझे बाबा मला तेच चित्र ७०० रुपयांना कसे विकता येईल, हे शिकवणार होते, तर मीदेखील त्यांना तुझ्यासारखेच उडवाउडवीचे उत्तर दिले होते. मी ५०० रुपयांत समाधान मानू लागलो. पण बाबांचे ऐकले असते, तर माझ्या चित्रांचा भाव नक्कीच वधारला असता!'

गोष्टीचे तात्पर्य हेच, की आपण ज्याक्षणी शिकणे थांबवतो, त्याक्षणापासून प्रगतीची दारे बंद करून घेतो. जगात शिकण्यासारखे पुष्कळ आहे. प्रत्येकाकडून शिवूâन घेण्याची, आत्मसात करण्याची तयारी असली पाहिजे. जो आयुष्यभर विद्यार्थी दशेत राहतो, त्याचाच उत्कर्ष होतो. म्हणून `पी हळद आणि हो गोरी' अशा इंस्टंट यशाच्या मागे न लागता आयुष्यभर यश कसे टिकवता येईल, यासाठी प्रयत्न करा. महत्त्वाकांक्षा ठेवा. स्वप्नपूर्तीची धडपड करा. परंतु स्वप्न पूर्ण झाले, म्हणून थांबून न राहता, स्वप्नांच्या पुढच्या टप्प्याची आखणी करा, यश नक्की मिळेल!