शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Hartalika Vrat Puja Vidhi: ‘असे’ करावे पूजन; पाहा, पूजा साहित्य, मांडणी, व्रत विधी अन् व्रतकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 15:03 IST

Hartalika Vrat Puja Vidhi In Marathi: हरितालिका व्रतासाठी काय तयारी करावी, कोणते साहित्य घ्यावे? हरितालिका व्रत कसे करावे? हरितालिका व्रताचा सोपा विधी, व्रतकथा जाणून घेऊया...

Hartalika Vrat Puja Vidhi In Marathi: हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वतीसारखा आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून अनेक ठिकाणी कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. महाराष्ट्रात या व्रताला विशेष महत्त्व आहे. गणपतीच्या आधी म्हणजेच तृतीयेला हे व्रत केले जाते. 

हरितालिका तृतीया या दिवशी स्वर्ण गौरी व्रत करण्याची परंपरा प्रचलित आहे. ०५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी भाद्रपद शुद्ध तृतीया सुरू होत आहे. तर, ०६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता भाद्रपद शुद्ध तृतीया समाप्त होत आहे. भारतीय पंचांगपद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा प्रचलित असल्यामुळे ०६ सप्टेंबर रोजी सकाळी हरितालिका पूजन करावे, असे सांगितले जात आहे. हरितालिका व्रतासाठी काय तयारी करावी, कोणते साहित्य घ्यावे? हरितालिका व्रत कसे करावे? हरितालिका व्रताचा सोपा विधी, व्रतकथा जाणून घेऊया...

हरितालिका व्रत पूजा साहित्य

हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, तांब्या, ताम्हन, पळी, भांडे, पाट, गंध, अक्षता, बुक्का, फुले, तुळशी, दूर्वा, उदबत्ती, कापूर, निरांजन, विड्याची पाने १२, कापसाची वस्त्रे, जानवे, सुपाऱ्या १२, फळे, नारळ२, गूळ, खोबरे, बांगडयाने फणी, गळेसरी, पंचामृत - साहित्य (दूध, दही, तूप, मध, साखर) ५ खारका, ५ बदाम. 

- सौभाग्यवाणाचे साहित्य: तांदूळ, १ नारळ, १ फळ, १ सुपली, आरसा, फणी, हिरव्या बांगडया ४, हळद, कुंकू डब्या २, सुटी नाणी पाच रुपयांची, सौभाग्यवाण देणे शक्य नसल्यास, यशाशक्ती रुपयांमध्ये दक्षिणा द्यावी. 

- हरतालिके पूजेतील पत्री: १) अशोकाची पाने २) आवळीची पाने ३) दूर्वाकुर पत्रे ४) कण्हेरीचीं पाने ५) कदंबाची पाने ६) ७) धोत्र्याची पाने ८) आघाड्याची पाने ९) सर्व प्रकारची पत्री १०) बेलाची पाने 

- हरतालिके पूजेतील फुले: १) चाफ्याची फुले २) केवडा, ३) कण्हेरीची फुले, ४) बकुळीची फुले, ५) धोतऱ्याची फुले ६) कमळाची फुले, ७) शेवंतीची फुले, ८) जास्वंदीची फुले, ९) मोगऱ्याची फुलें, १०) अशोकाचीं फुलें. 

।। अथ  हरितालिका व्रत पूजा प्रारंभः ।। 

प्रथम आपल्या इष्ट देवतांना हळद, कुंकू वाहून देवापुढे विडा ठेवावा. विड्याची पाने दोन, त्यावर एक नाणे व एक सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा. गुरुजींना व वडील मंडळींना नमस्कार करुन आसनावार बसावे. नंतर चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर हरतालिकेच्या २ मूर्ति ठेवून, वाळूचे शिवलिंग तयार करावे. अन्यथा हरितालिका मूर्तींसोबत आणलेले शिवलिंग समोर ठेवावे. 

- घरातील देवांसमोर विडा ठेवून, अक्षता व हळदकुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा.

- सुरुवातीला काही तांदूळ घेऊन त्यावर सुपारी ठेवावी आणि गणपती म्हणून त्याचे आवाहन करून पंचोपचार पूजा करावी.

- चौरंग किंवा पाट मांडून केळीच्या खांबांनी चारही बाजू सुशोभीत कराव्यात. सुशोभित केलेल्या या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करावी.

- हरितालिका पूजा करताना “सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे”, अशी प्रार्थना करावी.

- धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री, फुले वाहावित. पूजा करत असताना उमामहेश्वराचे ध्यान करावे.

- पूजा झाल्यावर  झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना मनोभावे नमस्कार करावा. आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे.

हरितालिका उत्तर पूजा किंवा व्रताची सांगता 

हरितालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे उत्तरपूजा करावी. आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी. दहीभाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षता वाहाव्या. यानंतर देवतांचे विसर्जन करावे. हरितालिकेचे पारणे उत्तरपूजेच्या दिवशी करतात.हरितालिकेची कहाणी व्रत कथा

एके दिवशी ईश्वरपार्वती कैलासपर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, "महाराज, सर्व व्रतांत चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे, आणि फळ पुष्कळ, असं एखादं व्रत असलं, तर मला सांगा. आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा." तेव्हा शंकर म्हणाले, "जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे, ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस, आणि त्याचा पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते ऐक.' 

हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू केलंस, ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस, थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःखं सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं, आणि अंशी कन्या कोणास द्यावी, अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनि आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं, तेव्हा नारद म्हणाले, "तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून मी इथं आलो आहे." हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. 

नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकिकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंल, महादेवावाचून मला दुसरा पती करणं नाही; असा माझा निश्वय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं तुला एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलंल. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. 

रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं, नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, "तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही," नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू झालेली सर्व हकिकत त्याला सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. त्याला हरितालिका व्रत असं म्हणतात. 

याचा विधी असा आहे : ज्या ठिकाणी है व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधाव केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूज करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. सात जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खालं. तर त्या जन्मबंध्या व विधवा होतात. दारिद्रय येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती बाण यावं. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी, देवाब्राह्मणाच्या द्वारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. 

टॅग्स :Hartalika Vratहरतालिका व्रतPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मासIndian Festivalsभारतीय उत्सव-सणTraditional Ritualsपारंपारिक विधी