शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

हरितालिका तृतीया: ‘असे’ करावे पूजन; पाहा, पूजा साहित्य, मांडणी, व्रत विधी अन् व्रतकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 15:03 IST

Hartalika Vrat Puja Vidhi In Marathi: हरितालिका व्रतासाठी काय तयारी करावी, कोणते साहित्य घ्यावे? हरितालिका व्रत कसे करावे? हरितालिका व्रताचा सोपा विधी, व्रतकथा जाणून घेऊया...

Hartalika Vrat Puja Vidhi In Marathi: हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वतीसारखा आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून अनेक ठिकाणी कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. महाराष्ट्रात या व्रताला विशेष महत्त्व आहे. गणपतीच्या आधी म्हणजेच तृतीयेला हे व्रत केले जाते. 

हरितालिका तृतीया या दिवशी स्वर्ण गौरी व्रत करण्याची परंपरा प्रचलित आहे. ०५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी भाद्रपद शुद्ध तृतीया सुरू होत आहे. तर, ०६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता भाद्रपद शुद्ध तृतीया समाप्त होत आहे. भारतीय पंचांगपद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा प्रचलित असल्यामुळे ०६ सप्टेंबर रोजी सकाळी हरितालिका पूजन करावे, असे सांगितले जात आहे. हरितालिका व्रतासाठी काय तयारी करावी, कोणते साहित्य घ्यावे? हरितालिका व्रत कसे करावे? हरितालिका व्रताचा सोपा विधी, व्रतकथा जाणून घेऊया...

हरितालिका व्रत पूजा साहित्य

हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, तांब्या, ताम्हन, पळी, भांडे, पाट, गंध, अक्षता, बुक्का, फुले, तुळशी, दूर्वा, उदबत्ती, कापूर, निरांजन, विड्याची पाने १२, कापसाची वस्त्रे, जानवे, सुपाऱ्या १२, फळे, नारळ२, गूळ, खोबरे, बांगडयाने फणी, गळेसरी, पंचामृत - साहित्य (दूध, दही, तूप, मध, साखर) ५ खारका, ५ बदाम. 

- सौभाग्यवाणाचे साहित्य: तांदूळ, १ नारळ, १ फळ, १ सुपली, आरसा, फणी, हिरव्या बांगडया ४, हळद, कुंकू डब्या २, सुटी नाणी पाच रुपयांची, सौभाग्यवाण देणे शक्य नसल्यास, यशाशक्ती रुपयांमध्ये दक्षिणा द्यावी. 

- हरतालिके पूजेतील पत्री: १) अशोकाची पाने २) आवळीची पाने ३) दूर्वाकुर पत्रे ४) कण्हेरीचीं पाने ५) कदंबाची पाने ६) ७) धोत्र्याची पाने ८) आघाड्याची पाने ९) सर्व प्रकारची पत्री १०) बेलाची पाने 

- हरतालिके पूजेतील फुले: १) चाफ्याची फुले २) केवडा, ३) कण्हेरीची फुले, ४) बकुळीची फुले, ५) धोतऱ्याची फुले ६) कमळाची फुले, ७) शेवंतीची फुले, ८) जास्वंदीची फुले, ९) मोगऱ्याची फुलें, १०) अशोकाचीं फुलें. 

।। अथ  हरितालिका व्रत पूजा प्रारंभः ।। 

प्रथम आपल्या इष्ट देवतांना हळद, कुंकू वाहून देवापुढे विडा ठेवावा. विड्याची पाने दोन, त्यावर एक नाणे व एक सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा. गुरुजींना व वडील मंडळींना नमस्कार करुन आसनावार बसावे. नंतर चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर हरतालिकेच्या २ मूर्ति ठेवून, वाळूचे शिवलिंग तयार करावे. अन्यथा हरितालिका मूर्तींसोबत आणलेले शिवलिंग समोर ठेवावे. 

- घरातील देवांसमोर विडा ठेवून, अक्षता व हळदकुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा.

- सुरुवातीला काही तांदूळ घेऊन त्यावर सुपारी ठेवावी आणि गणपती म्हणून त्याचे आवाहन करून पंचोपचार पूजा करावी.

- चौरंग किंवा पाट मांडून केळीच्या खांबांनी चारही बाजू सुशोभीत कराव्यात. सुशोभित केलेल्या या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करावी.

- हरितालिका पूजा करताना “सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे”, अशी प्रार्थना करावी.

- धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री, फुले वाहावित. पूजा करत असताना उमामहेश्वराचे ध्यान करावे.

- पूजा झाल्यावर  झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना मनोभावे नमस्कार करावा. आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे.

हरितालिका उत्तर पूजा किंवा व्रताची सांगता 

हरितालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे उत्तरपूजा करावी. आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी. दहीभाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षता वाहाव्या. यानंतर देवतांचे विसर्जन करावे. हरितालिकेचे पारणे उत्तरपूजेच्या दिवशी करतात.

हरितालिकेची कहाणी व्रत कथा

एके दिवशी ईश्वरपार्वती कैलासपर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, "महाराज, सर्व व्रतांत चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे, आणि फळ पुष्कळ, असं एखादं व्रत असलं, तर मला सांगा. आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा." तेव्हा शंकर म्हणाले, "जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे, ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस, आणि त्याचा पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते ऐक.' 

हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू केलंस, ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस, थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःखं सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं, आणि अंशी कन्या कोणास द्यावी, अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनि आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं, तेव्हा नारद म्हणाले, "तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून मी इथं आलो आहे." हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. 

नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकिकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंल, महादेवावाचून मला दुसरा पती करणं नाही; असा माझा निश्वय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं तुला एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलंल. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. 

रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं, नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, "तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही," नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू झालेली सर्व हकिकत त्याला सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. त्याला हरितालिका व्रत असं म्हणतात. 

याचा विधी असा आहे : ज्या ठिकाणी है व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधाव केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूज करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. सात जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खालं. तर त्या जन्मबंध्या व विधवा होतात. दारिद्रय येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती बाण यावं. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी, देवाब्राह्मणाच्या द्वारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. 

टॅग्स :Hartalika Vratहरतालिका व्रतPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मास