संत तुलसीदास यांनी रचलेले हनुमान चालीसा हे स्तोत्र कलियुगातील 'संजीवनी मंत्र' म्हणून ओळखला जातो. एवढे काय विशेष आहे या स्तोत्रात? ते म्हटल्यामुळे होणारे लाभ वाचून तुम्हीदेखील थक्क व्हाल आणि आज मंगळवारपासून मारुती उपासना सुरु कराल. जाणून घ्या व्रत नियम आणि लाभ!
>> चालीसा म्हणजे चाळीस, यात हनुमानाच्या स्तुतीपर ४० श्लोकांची रचना केली आहे.
>> जे कोणी याचे नित्य पठण करतात त्यांच्यावर हनुमंताची थेट कृपा होते.
>> जर तुम्ही सलग ४० दिवस हे स्तोत्र म्हटले तर तुम्हाला चारधाम यात्रा, १२ ज्योतिर्लिंग आणि अन्य पुण्यक्षेत्री गेल्याचे घरबसल्या फळ मिळते.
>> मंगळ दोष असलेल्यांनी हे स्तोत्र म्हटल्याने त्यांचा राग नियंत्रित राहतो तसेच भीती दूर पळून जाते आणि आत्मविश्वास वाढतो.
>> हनुमान चालीसा पठण करायचे असेल तर दिवसभरातील एक वेळ ठरवून घ्या आणि त्या वेळी म्हणा.
>> रोजच्या सरावाने अवघ्या ५ मिनिटात हे स्तोत्र म्हणून पूर्ण होते.
>> ज्यांच्याकडे पूर्ण स्तोत्र म्हणण्याइतका वेळ नाही, त्यांनी या संपूर्ण स्तोत्रातील कोणत्याही दोन ओळींचे जरी उच्चारण मनोभावे केले तरी पूर्ण हनुमान चालीसा म्हटल्याचे पुण्य लाभते.
>> आयुष्यातून सगळी नकारात्मकता दूर होते, सकारात्मक ऊर्जा मिळते. >> लक्ष्मी प्राप्ती होते. आर्थिक स्थैर्य मिळते आणि उत्पन्नाचे नवनवे मार्ग सापडतात.
>> आजार, व्याधी, भीती यातून सुटका मिळते.
>> चेहर्यावर तेज येते आणि आपल्या भोवती सुरक्षा कवच तयार होते.