शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

विचारांना शांत करण्यासाठी लावा ईश्वराची आठवण काढण्याची सवय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 04:03 IST

विचारांना शांत करण्यासाठीच ईश्वराची प्रेमाने आठवण करण्याची सवय लावावी. मन प्रसन्न असले की कितीही वाईट परिस्थिती आली तरीही ती सहज दूर करण्याची शक्ती आपल्यात येते.

- नीता ब्रह्मकुमारीभक्तीमध्ये सूर्योपासनेचे, सूर्य नमस्काराचे खूप महत्त्व आहे. सूर्याला जल प्रदान करणे, नमस्कार करणे, सूर्याची कोवळी किरणे मिळावीत यासाठी सकाळी व्यायाम करणे. या सर्व गोष्टी आपण करतच असू; पण ज्ञानाचा, शक्तींचा स्रोत या निसर्गाचा मालक ईश्वर आहे. त्याच्या सान्निध्यात सकाळी लवकर उठून नामस्मरण करून त्याची आठवण करणे या गोष्टी मनाला शक्तिशाली बनवितात.मन-बुद्धी शक्तिशाली असेल, तर दिवसभरात केलेली छोटी-मोठी कर्मे श्रेष्ठ बनतात. ती चांगली असतील तर स्वत:ला समाधानही मिळते. मग कर्माची सावली छोटी असो वा मोठी, त्याची भीती वाटणार नाही. काहींना आपल्याच सावलीची भीती वाटते, तसेच केलेल्या कर्माची जाण असल्याने आपणच चिंता, भय यांनी ग्रस्त होतो. म्हणून कर्माचे नियम, कर्मफळ यांबद्दल सतत जागृत राहण्याची आवश्यकता आहे.वास्तविक आपले जीवन कर्मांचा खेळ आहे. कधी कोणत्या डावात आपली हार किंवा जय होईल, हे आपल्यालाच माहीत नाही. कारण, हा खेळ जन्मोजन्मीचा आहे. जसं खेळामध्ये सतर्क राहावे लागते, मग तो खेळ कोणताही असो, तसेच कर्मामध्येही नेहमी जागृत राहण्याची आवश्यकता आहे. हा खेळ कधीही न संपणारा आहे. काही कर्मांपासून मुक्त व्हायचे असेल, तर जितके दु:ख दिले असेल, तर त्यांना तितकेच सुख देऊन तो हिशेब संपवावा किंवा स्वच्छ मनाने ईश्वरासमोर आपल्या चुका सांगून, माफी मागून मन हलके करायला हवे किंवा इतके श्रेष्ठ कर्म करावे की पुण्याचे बळ आपल्यासाठी काम करीत राहील व येणाऱ्या समस्या या शक्तिशाली होऊन त्या संपवाव्यात. हा खेळ खूप रहस्यांनी भरलेला आहे. त्याला समजण्यासाठी मनाला शांत ठेवावे. विचारांना शांत करण्यासाठीच ईश्वराची प्रेमाने आठवण करण्याची सवय लावावी. मन प्रसन्न असले की कितीही वाईट परिस्थिती आली तरीही ती सहज दूर करण्याची शक्ती आपल्यात येते. अज्ञानाच्या रात्री दूर करण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश हवा. हा प्रकाशच आपले मार्गदर्शन करीत राहील.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक