शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विचारांना शांत करण्यासाठी लावा ईश्वराची आठवण काढण्याची सवय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 04:03 IST

विचारांना शांत करण्यासाठीच ईश्वराची प्रेमाने आठवण करण्याची सवय लावावी. मन प्रसन्न असले की कितीही वाईट परिस्थिती आली तरीही ती सहज दूर करण्याची शक्ती आपल्यात येते.

- नीता ब्रह्मकुमारीभक्तीमध्ये सूर्योपासनेचे, सूर्य नमस्काराचे खूप महत्त्व आहे. सूर्याला जल प्रदान करणे, नमस्कार करणे, सूर्याची कोवळी किरणे मिळावीत यासाठी सकाळी व्यायाम करणे. या सर्व गोष्टी आपण करतच असू; पण ज्ञानाचा, शक्तींचा स्रोत या निसर्गाचा मालक ईश्वर आहे. त्याच्या सान्निध्यात सकाळी लवकर उठून नामस्मरण करून त्याची आठवण करणे या गोष्टी मनाला शक्तिशाली बनवितात.मन-बुद्धी शक्तिशाली असेल, तर दिवसभरात केलेली छोटी-मोठी कर्मे श्रेष्ठ बनतात. ती चांगली असतील तर स्वत:ला समाधानही मिळते. मग कर्माची सावली छोटी असो वा मोठी, त्याची भीती वाटणार नाही. काहींना आपल्याच सावलीची भीती वाटते, तसेच केलेल्या कर्माची जाण असल्याने आपणच चिंता, भय यांनी ग्रस्त होतो. म्हणून कर्माचे नियम, कर्मफळ यांबद्दल सतत जागृत राहण्याची आवश्यकता आहे.वास्तविक आपले जीवन कर्मांचा खेळ आहे. कधी कोणत्या डावात आपली हार किंवा जय होईल, हे आपल्यालाच माहीत नाही. कारण, हा खेळ जन्मोजन्मीचा आहे. जसं खेळामध्ये सतर्क राहावे लागते, मग तो खेळ कोणताही असो, तसेच कर्मामध्येही नेहमी जागृत राहण्याची आवश्यकता आहे. हा खेळ कधीही न संपणारा आहे. काही कर्मांपासून मुक्त व्हायचे असेल, तर जितके दु:ख दिले असेल, तर त्यांना तितकेच सुख देऊन तो हिशेब संपवावा किंवा स्वच्छ मनाने ईश्वरासमोर आपल्या चुका सांगून, माफी मागून मन हलके करायला हवे किंवा इतके श्रेष्ठ कर्म करावे की पुण्याचे बळ आपल्यासाठी काम करीत राहील व येणाऱ्या समस्या या शक्तिशाली होऊन त्या संपवाव्यात. हा खेळ खूप रहस्यांनी भरलेला आहे. त्याला समजण्यासाठी मनाला शांत ठेवावे. विचारांना शांत करण्यासाठीच ईश्वराची प्रेमाने आठवण करण्याची सवय लावावी. मन प्रसन्न असले की कितीही वाईट परिस्थिती आली तरीही ती सहज दूर करण्याची शक्ती आपल्यात येते. अज्ञानाच्या रात्री दूर करण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश हवा. हा प्रकाशच आपले मार्गदर्शन करीत राहील.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक