शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

गुरुचंद्र..! चित्ताचा ताप हरण करणारा गुरु दुर्लभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 20:30 IST

वित्ताचे हरण करणारे गुरु खूप मिळतात पण जीवन बदलवणारा, हृदय बदलवणारा, डोळ्यांत तेज व बुद्धीत खुमारी निर्माण करणारा, चित्ताचा ताप हरण करणारा गुरु दुर्लभ आहे...!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड, महाराष्ट्र )

भारतीय संस्कृतीने गुरुमध्ये कळसरुप अशा सद्गुरुला नेहमीच पूजिले आहे. गुरु विश्वाच्या अनंततेचे तसेच सृष्टीच्या ज्ञानाचे दर्शन करतो पण सद्गुरु जीवनाची कला शिकवून मानवाला ईश्वराभिमुख बनवतो. अध्यात्मविद्येचे दर्शन करणारा सद्गुरु आहे. जीवनाला सुंदर, निर्दोष व पवित्र बनवून, आपला हात पकडून आपल्याला प्रभुचरणाजवळ घेऊन जाणारा हा सद्गुरु आहे.

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ।द्वंव्दातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं ।भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥

वासना विकारांच्या ह्या पुतळ्याला, मांस मातीच्या ह्या गोळ्याला ज्याने आकार दिला, चिरंतर सुख व शांतीचा मार्ग दाखवला, माणूस असून पशुतुल्य जीवन जगत असलेल्या मला नारायण होण्याचा पथ दाखविला त्या गुरुचे पूजन नाही करायचे तर  कोणाला भगवानतुल्य मानायचे..? ह्या अनंत ऋणांची फेड मी कशी करु.? कृतज्ञतापूर्वक त्याचे पूजन करुन, त्याने दाखविलेल्या जीवन पथावर पुढे जाऊन, त्याच्या ध्येयाला पुढे नेऊन, त्याने पेटविलेल्या ज्ञानज्योतीला सतत प्रज्वलित राखूनच ती होऊ शकेल..! अशा गुरुला काही द्यायचे नसते आणि त्याला द्याल तेवढे थोडेच असते. गुरुची विशिष्टता ही की, त्याला काहीही दिले तरी ते तो अधिक मानून घेतो.

आपले शास्त्रकार तर सांगतात की, तुझ्याजवळ दुसरे काही नसेल तर हरकत नाही. एखादे फूल घेऊन त्याच्याजवळ जा, कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून त्याच्या चरणावर ते अर्पण कर. गुरुचरणी आपण जे अर्पण करतो ते जर स्वीकारार्ह बनले तर त्यात आपलेच आत्मकल्याण सामावलेले आहे. गुरुची सेवा करणारे आपण कोण.? खरं पाहिलं तर आपल्या मृत जीवनात संजीवनी भरणारा गुरुच आपली खरी सेवा करतो.समाजात 'गुरुचंद्र' हा क्वचित् दिसतो. तो सामान्यात सामान्य बनून राहतो. असा हा गुरु आजच्या जमान्यात मिळणे कठीण आहे परंतु अशक्य मात्र नाही. फक्त पाहण्याचे डोळे हवेत. जेथे नजर टाकू तेथे मिळेल एवढा काही तो सुलभ नाही पण तसाच कधी मिळणारच नाही एवढा तो दुर्लभही नाही. आजच्या परिस्थितीत तर -

गुरवः बहवः सन्ति शिष्यवित्तापहारका: ।क्वचितु दृश्यते तत्र शिष्यचित्तापहारक: ॥

वित्ताचे हरण करणारे गुरु खूप मिळतात पण जीवन बदलवणारा, हृदय बदलवणारा, डोळ्यांत तेज व बुद्धीत खुमारी निर्माण करणारा, चित्ताचा ताप हरण करणारा गुरु दुर्लभ आहे. भाग्य असेल तरच असा गुरु मिळतो; अशा गुरुला ओळखणे हे अधिक कठीण आहे. जर कदाचित् त्याला ओळखणे शक्य बनले तर त्याच्या जीवनाच्या परिचयात येणे तर त्याहून अधिक दुष्कर आहे. निकट परिचयात येण्याची ही संधी प्राप्त झाली तरीही त्याला समजणे, त्याचे विचार व वर्तन  यांच्यात दिसत असलेल्या विभिन्नतेच्या पाठीमागे असलेल्या आंतरिक एकसूत्रतेला जाणणे हे फारच कमी लोकांना शक्य आहे. हे जरी शक्य बनले तरी त्याच्याबरोबरचा संबंध टिकणे हे कित्येक वेळेला विभिन्न कारणांमुळे अशक्यच बनते. संबंध कदाचित दीर्घकाळ राहील परंतु त्याच्या जीवननिष्ठेचे अनुसरण हे तर उडत्या पक्ष्याला गोळी घालून खाली पाडण्याएवढे कठीण कार्य आहे. त्याला अनुसरुन त्याच्यासारखा होऊन, तोच बनून, असे दिव्य व गौरवपूर्ण जीवन भावयुक्त नम्रतेने त्याच्या चरणावर धरणे हे हिमालयाचे चूर्ण करण्यासारखे किंवा आकाशाची घडी करण्यासारखे अशक्यवत् काम आहे..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

 ( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक