शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

गुरुचंद्र..! चित्ताचा ताप हरण करणारा गुरु दुर्लभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 20:30 IST

वित्ताचे हरण करणारे गुरु खूप मिळतात पण जीवन बदलवणारा, हृदय बदलवणारा, डोळ्यांत तेज व बुद्धीत खुमारी निर्माण करणारा, चित्ताचा ताप हरण करणारा गुरु दुर्लभ आहे...!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड, महाराष्ट्र )

भारतीय संस्कृतीने गुरुमध्ये कळसरुप अशा सद्गुरुला नेहमीच पूजिले आहे. गुरु विश्वाच्या अनंततेचे तसेच सृष्टीच्या ज्ञानाचे दर्शन करतो पण सद्गुरु जीवनाची कला शिकवून मानवाला ईश्वराभिमुख बनवतो. अध्यात्मविद्येचे दर्शन करणारा सद्गुरु आहे. जीवनाला सुंदर, निर्दोष व पवित्र बनवून, आपला हात पकडून आपल्याला प्रभुचरणाजवळ घेऊन जाणारा हा सद्गुरु आहे.

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ।द्वंव्दातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं ।भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥

वासना विकारांच्या ह्या पुतळ्याला, मांस मातीच्या ह्या गोळ्याला ज्याने आकार दिला, चिरंतर सुख व शांतीचा मार्ग दाखवला, माणूस असून पशुतुल्य जीवन जगत असलेल्या मला नारायण होण्याचा पथ दाखविला त्या गुरुचे पूजन नाही करायचे तर  कोणाला भगवानतुल्य मानायचे..? ह्या अनंत ऋणांची फेड मी कशी करु.? कृतज्ञतापूर्वक त्याचे पूजन करुन, त्याने दाखविलेल्या जीवन पथावर पुढे जाऊन, त्याच्या ध्येयाला पुढे नेऊन, त्याने पेटविलेल्या ज्ञानज्योतीला सतत प्रज्वलित राखूनच ती होऊ शकेल..! अशा गुरुला काही द्यायचे नसते आणि त्याला द्याल तेवढे थोडेच असते. गुरुची विशिष्टता ही की, त्याला काहीही दिले तरी ते तो अधिक मानून घेतो.

आपले शास्त्रकार तर सांगतात की, तुझ्याजवळ दुसरे काही नसेल तर हरकत नाही. एखादे फूल घेऊन त्याच्याजवळ जा, कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून त्याच्या चरणावर ते अर्पण कर. गुरुचरणी आपण जे अर्पण करतो ते जर स्वीकारार्ह बनले तर त्यात आपलेच आत्मकल्याण सामावलेले आहे. गुरुची सेवा करणारे आपण कोण.? खरं पाहिलं तर आपल्या मृत जीवनात संजीवनी भरणारा गुरुच आपली खरी सेवा करतो.समाजात 'गुरुचंद्र' हा क्वचित् दिसतो. तो सामान्यात सामान्य बनून राहतो. असा हा गुरु आजच्या जमान्यात मिळणे कठीण आहे परंतु अशक्य मात्र नाही. फक्त पाहण्याचे डोळे हवेत. जेथे नजर टाकू तेथे मिळेल एवढा काही तो सुलभ नाही पण तसाच कधी मिळणारच नाही एवढा तो दुर्लभही नाही. आजच्या परिस्थितीत तर -

गुरवः बहवः सन्ति शिष्यवित्तापहारका: ।क्वचितु दृश्यते तत्र शिष्यचित्तापहारक: ॥

वित्ताचे हरण करणारे गुरु खूप मिळतात पण जीवन बदलवणारा, हृदय बदलवणारा, डोळ्यांत तेज व बुद्धीत खुमारी निर्माण करणारा, चित्ताचा ताप हरण करणारा गुरु दुर्लभ आहे. भाग्य असेल तरच असा गुरु मिळतो; अशा गुरुला ओळखणे हे अधिक कठीण आहे. जर कदाचित् त्याला ओळखणे शक्य बनले तर त्याच्या जीवनाच्या परिचयात येणे तर त्याहून अधिक दुष्कर आहे. निकट परिचयात येण्याची ही संधी प्राप्त झाली तरीही त्याला समजणे, त्याचे विचार व वर्तन  यांच्यात दिसत असलेल्या विभिन्नतेच्या पाठीमागे असलेल्या आंतरिक एकसूत्रतेला जाणणे हे फारच कमी लोकांना शक्य आहे. हे जरी शक्य बनले तरी त्याच्याबरोबरचा संबंध टिकणे हे कित्येक वेळेला विभिन्न कारणांमुळे अशक्यच बनते. संबंध कदाचित दीर्घकाळ राहील परंतु त्याच्या जीवननिष्ठेचे अनुसरण हे तर उडत्या पक्ष्याला गोळी घालून खाली पाडण्याएवढे कठीण कार्य आहे. त्याला अनुसरुन त्याच्यासारखा होऊन, तोच बनून, असे दिव्य व गौरवपूर्ण जीवन भावयुक्त नम्रतेने त्याच्या चरणावर धरणे हे हिमालयाचे चूर्ण करण्यासारखे किंवा आकाशाची घडी करण्यासारखे अशक्यवत् काम आहे..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

 ( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक