शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

Guru Purnima 2024: गुरुपौर्णिमेला सत्कार्य केल्याने अध्यात्मिक प्रगती जलद होते; वाचा महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 07:00 IST

Guru Purnima 2024: २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा आहे, त्यानिमित्त या तिथीचे अध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊ. 

संत गुलाबराव महाराजांना एकदा एका पाश्चात्य व्यक्तीने विचारले, की भारतीय संस्कृतीची थोडक्यात ओळख किंवा वर्णन करायचे असेल तर कसे कराल? त्यांनी उत्तर दिले, 'गुरु शिष्य परंपरेतून!' भारतामध्ये ही परंपरा जेवढी जुनी तेवढी अन्यत्र कुठेही आढळणार नाही. ही परंपरा युगानुयुगांपासून सुरू आहे. तिचे महत्त्व आपणही जाणून घेऊ. 

आपले आयुष्य घडवण्यात गुरुंचा सिंहाचा वाटा असतो. गुरु ही केवळ व्यक्ती नाही, तर आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा तो प्रत्येक क्षण आणि त्यासाठी माध्यम झालेली वस्तू, व्यक्ती किंवा अन्य कोणतीही गोष्ट गुरु असू शकते. म्हणून ग्रंथांना गुरु मानले आहे तसे अनुभवालाही गुरु मानले आहे, वाटसरूला गुरु मानले आहे, तसे मार्गदर्शन करणाऱ्याला गुरु मानले आहे. ते कोणत्याही रूपात येऊन आपला उद्धार करू शकतात. त्यांच्याप्रती ऋण निर्देश करण्यासाठी ही तिथी राखीव ठेवली आहे. 

तिथीचे वैशिष्टय 

आषाढ शुक्ल पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. कारण याच तिथीवर महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. गुरुपौर्णिमेला प्रथम व्यासांची पूजा केली जाते. एक वचन आहे - व्यासोचिष्टम् जगत् सर्वम्. याचा अर्थ असा की, जगात असा कोणताही विषय नाही, ज्याला महर्षी व्यासांनी स्पर्श केले नाही की भाष्य केले नाही. एवढे ते महाज्ञानी होते. त्यांनीच चार वेदांचे वर्गीकरण केले. अठरा पुराणे, महाभारत इ. साहित्य महर्षी व्यासांमुळेच आपल्यापर्यंत पोहोचले. म्हणूनच त्यांना 'आदिगुरु' म्हणतात. गुरुपरंपरा त्यांच्यापासून सुरू झाली असे मानले जाते. आद्यशंकराचार्य हे महर्षी व्यासांचे अवतार मानले जातात. त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ हा दिवस त्यांच्या नावे साजरा केला जातो. संस्कृतानुसार गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे दूर करणारा! आपल्या आयुष्यातील आळस, अनैतिकता, अविवेक, अशास्त्रीय गोष्टींचा अंधःकार दूर करणारी व्यक्ती गुरु मानली जाते. तिच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही, म्हणून केवळ कृतज्ञता या दिवशी व्यक्त केली जाते. 

गुरु पौर्णिमेचे अध्यात्मिक महत्त्व 

या दिवशी गुरुंचे स्मरण, पूजन केल्याने जलद आध्यात्मिक प्रगती होते. या दिवशी गुरु तारक चैतन्य वातावरणात सक्रिय होतात. गुरूंची उपासना करणाऱ्या जीवांना या चैतन्याचा लाभ होतो. एवढेच नाही तर आजच्या दिवशी केलेल्या कार्याचे सहस्त्र पटींनी पुण्य लाभते असे ज्योतिष शास्त्र सांगते. 

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा