शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Guru Purnima 2023: गुरु पौर्णिमेच्या तिथीला केलेल्या सत्कार्याचे सहस्त्रपट फळ मिळते, जाणून घ्या महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 12:56 IST

Guru Purnima 2023:यंदा ३ जुलै रोजी आषाढ शुक्ल पौर्णिमा अर्थात गुरु पौर्णिमा आहे; गुरु शिष्य परंपरेचा गौरव करण्यासाठी याच तिथीची निवड का झाली असावी? जाणून घ्या!

संत गुलाबराव महाराजांना एकदा एका पाश्चात्य व्यक्तीने विचारले, की भारतीय संस्कृतीची थोडक्यात ओळख किंवा वर्णन करायचे असेल तर कसे कराल? त्यांनी उत्तर दिले, 'गुरु शिष्य परंपरेतून!' भारतामध्ये ही परंपरा जेवढी जुनी तेवढी अन्यत्र कुठेही आढळणार नाही. ही परंपरा युगानुयुगांपासून सुरू आहे. तिचे महत्त्व आपणही जाणून घेऊ. 

आपले आयुष्य घडवण्यात गुरुंचा सिंहाचा वाटा असतो. गुरु ही केवळ व्यक्ती नाही, तर आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा तो प्रत्येक क्षण आणि त्यासाठी माध्यम झालेली वस्तू, व्यक्ती किंवा अन्य कोणतीही गोष्ट गुरु असू शकते. म्हणून ग्रंथांना गुरु मानले आहे तसे अनुभवालाही गुरु मानले आहे, वाटसरूला गुरु मानले आहे, तसे मार्गदर्शन करणाऱ्याला गुरु मानले आहे. ते कोणत्याही रूपात येऊन आपला उद्धार करू शकतात. त्यांच्याप्रती ऋण निर्देश करण्यासाठी ही तिथी राखीव ठेवली आहे. 

तिथीचे वैशिष्टय 

आषाढ शुक्ल पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. कारण याच तिथीवर महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. गुरुपौर्णिमेला प्रथम व्यासांची पूजा केली जाते. एक वचन आहे - व्यासोचिष्टम् जगत् सर्वम्. याचा अर्थ असा की, जगात असा कोणताही विषय नाही, ज्याला महर्षी व्यासांनी स्पर्श केले नाही की भाष्य केले नाही. एवढे ते महाज्ञानी होते. त्यांनीच चार वेदांचे वर्गीकरण केले. अठरा पुराणे, महाभारत इ. साहित्य महर्षी व्यासांमुळेच आपल्यापर्यंत पोहोचले. म्हणूनच त्यांना 'आदिगुरु' म्हणतात. गुरुपरंपरा त्यांच्यापासून सुरू झाली असे मानले जाते. आद्यशंकराचार्य हे महर्षी व्यासांचे अवतार मानले जातात. त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ हा दिवस त्यांच्या नावे साजरा केला जातो. संस्कृतानुसार गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे दूर करणारा! आपल्या आयुष्यातील आळस, अनैतिकता, अविवेक, अशास्त्रीय गोष्टींचा अंधःकार दूर करणारी व्यक्ती गुरु मानली जाते. तिच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही, म्हणून केवळ कृतज्ञता या दिवशी व्यक्त केली जाते. 

गुरु पौर्णिमेचे अध्यात्मिक महत्त्व 

या दिवशी गुरुंचे स्मरण, पूजन केल्याने जलद आध्यात्मिक प्रगती होते. या दिवशी गुरु तारक चैतन्य वातावरणात सक्रिय होतात. गुरूंची उपासना करणाऱ्या जीवांना या चैतन्याचा लाभ होतो. एवढेच नाही तर आजच्या दिवशी केलेल्या कार्याचे सहस्त्र पटींनी पुण्य लाभते असे ज्योतिष शास्त्र सांगते. 

गुरु पौर्णिमा साजरी कशी करावी? त्याचे नियम पुढच्या लेखात जाणून घेऊ. 

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा