शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Guru Purnima 2023: शिष्यानी गुरुंना 'ही' भेट दिली असता ते खुश होतात; सांगताहेत सद्गुरु!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 16:07 IST

Guru Purnima 2023: गुरुपौर्णिमेची भेट म्हणून गुरु शिष्याने परस्परांना कोणती भेट दिली पाहिजे याबद्दल सद्गुरु यांनी खुलासा केला आहे. 

गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गुरूंच्या ऋणनिर्देशनार्थ काही भेटवस्तू देण्याचा प्रघात पूर्वापार आहे. आजही शाळेत जाणारी लहान मुलेसुद्धा शिक्षकांसाठी आठवणीने एखादे फुल, भेटपत्र, मिठाई अशा गोष्टी घेऊन जातात. पालक त्यासाठी प्रोत्साहन देतात. कारण जे शिक्षक आपले भवितव्य घडवतात, त्यांच्याप्रती आपल्या पाल्याने कृतज्ञता बाळगावी असा त्यामागचा हेतू असतो. मात्र अशी ऐहिक सुखांशी संबंधित गोष्टी दिल्याने गुरु प्रसन्न होतात का? तसे होणार असतील तर ते शिष्याच्या दृष्टीने योग्य ठरेल का? गुरूंना नेमके काय दिले तर ते खुश होतील याबद्दल सद्गुरुंचे म्हणणे काय आहे ते जाणून घेउ. 

सद्गुरू म्हणतात, 'गुरु शिष्याला घडवत असतात, ती एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही. त्यामागे गुरूंची शिकवण्याची आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची तपश्चर्या असते. ज्याप्रमाणे तुम्ही ऑक्टोबर नोव्हेम्बरमध्ये आंब्याचे झाड पाहिले तर त्याला आंबा लागलेला दिसत नाही, मात्र तेच झाड जानेवारी-फेब्रुवारी मध्ये बघाल तर त्या झाडाला फुलं अर्थात मोहोर आलेला असतो. त्या झाडाची फांदी, मूळ, फुल गोङ लागत नाहीतर, मात्र मार्चपासून मे पर्यंत तेच झाड कैऱ्यांनी लगडलेले दिसते आणि त्या कैऱ्या काहीकाळाने मधुर रस देणारे आंबे बनून तयार होतात. या तयारीच्या खुणा आधी दिसत नाहीत मात्र झाडात दिसत नसलेला गोडवा फळात उतरतो. तीच प्रक्रिया गुरु शिष्यांच्या बाबतीत घडत असते. गुरु आपल्या शिष्याला घडवत असतात. तो यशस्वी होईपर्यंत लागणारा काळ हा गुरूंसाठी तपश्चर्येचा काळ असतो. शिष्य यशस्वी झाल्यावर गुरूंना ते फळ मिळते. मग त्याची परतफेड कशी करावी?

गुरूंच्या ऋणातून कोणताही शिष्य उतराई होऊ शकत नाही आणि त्याने होऊही नये असे सद्गुरू सांगतात.  ते म्हणतात शिष्यांनी गुरूंना काही देण्यापेक्षा त्यांच्याकडून कायम घेत राहावे. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे गुरूंकडून जे घेतलेले आहे ते वापरून फेकून देऊ नये किंवा विसरून जाऊ नये. गुरूंकडून घेतलेले ज्ञान पुढे हस्तान्तरीत करावे मात्र ते वाया जाऊ देऊ नये. गुरूंना शिष्याकडून मिळालेली ही भेटच सर्वात जास्त प्रिय ठरू शकते. म्हणून गुरूंनी कायम देत (ज्ञान) राहावे आणि शिष्यांनी कायम गुरूंकडून ज्ञान घेत राहावे असे सद्गुरू सांगतात. 

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा