शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

Guru Purnima 2023: शिष्यानी गुरुंना 'ही' भेट दिली असता ते खुश होतात; सांगताहेत सद्गुरु!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 16:07 IST

Guru Purnima 2023: गुरुपौर्णिमेची भेट म्हणून गुरु शिष्याने परस्परांना कोणती भेट दिली पाहिजे याबद्दल सद्गुरु यांनी खुलासा केला आहे. 

गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गुरूंच्या ऋणनिर्देशनार्थ काही भेटवस्तू देण्याचा प्रघात पूर्वापार आहे. आजही शाळेत जाणारी लहान मुलेसुद्धा शिक्षकांसाठी आठवणीने एखादे फुल, भेटपत्र, मिठाई अशा गोष्टी घेऊन जातात. पालक त्यासाठी प्रोत्साहन देतात. कारण जे शिक्षक आपले भवितव्य घडवतात, त्यांच्याप्रती आपल्या पाल्याने कृतज्ञता बाळगावी असा त्यामागचा हेतू असतो. मात्र अशी ऐहिक सुखांशी संबंधित गोष्टी दिल्याने गुरु प्रसन्न होतात का? तसे होणार असतील तर ते शिष्याच्या दृष्टीने योग्य ठरेल का? गुरूंना नेमके काय दिले तर ते खुश होतील याबद्दल सद्गुरुंचे म्हणणे काय आहे ते जाणून घेउ. 

सद्गुरू म्हणतात, 'गुरु शिष्याला घडवत असतात, ती एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही. त्यामागे गुरूंची शिकवण्याची आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची तपश्चर्या असते. ज्याप्रमाणे तुम्ही ऑक्टोबर नोव्हेम्बरमध्ये आंब्याचे झाड पाहिले तर त्याला आंबा लागलेला दिसत नाही, मात्र तेच झाड जानेवारी-फेब्रुवारी मध्ये बघाल तर त्या झाडाला फुलं अर्थात मोहोर आलेला असतो. त्या झाडाची फांदी, मूळ, फुल गोङ लागत नाहीतर, मात्र मार्चपासून मे पर्यंत तेच झाड कैऱ्यांनी लगडलेले दिसते आणि त्या कैऱ्या काहीकाळाने मधुर रस देणारे आंबे बनून तयार होतात. या तयारीच्या खुणा आधी दिसत नाहीत मात्र झाडात दिसत नसलेला गोडवा फळात उतरतो. तीच प्रक्रिया गुरु शिष्यांच्या बाबतीत घडत असते. गुरु आपल्या शिष्याला घडवत असतात. तो यशस्वी होईपर्यंत लागणारा काळ हा गुरूंसाठी तपश्चर्येचा काळ असतो. शिष्य यशस्वी झाल्यावर गुरूंना ते फळ मिळते. मग त्याची परतफेड कशी करावी?

गुरूंच्या ऋणातून कोणताही शिष्य उतराई होऊ शकत नाही आणि त्याने होऊही नये असे सद्गुरू सांगतात.  ते म्हणतात शिष्यांनी गुरूंना काही देण्यापेक्षा त्यांच्याकडून कायम घेत राहावे. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे गुरूंकडून जे घेतलेले आहे ते वापरून फेकून देऊ नये किंवा विसरून जाऊ नये. गुरूंकडून घेतलेले ज्ञान पुढे हस्तान्तरीत करावे मात्र ते वाया जाऊ देऊ नये. गुरूंना शिष्याकडून मिळालेली ही भेटच सर्वात जास्त प्रिय ठरू शकते. म्हणून गुरूंनी कायम देत (ज्ञान) राहावे आणि शिष्यांनी कायम गुरूंकडून ज्ञान घेत राहावे असे सद्गुरू सांगतात. 

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा