शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Guru purnima 2021 : गुरु न केल्यामुळे संत नामदेवांची इतर संतमंडळींसमोर फजिती कशी झाली, त्याची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 15:01 IST

Guru Purnima 2021: देवाचे सान्निध्य सतत राहावे असे वाटत असेल, तर अहंकाराचे अस्तित्त्वच नको. तो अहंकार दूर करण्यासाठी गुरु पाहिजेच!

एकदा संत गोरोबा काकांकडे सगळी संतमंडळी जमली होती. ज्ञानेश्वर माऊली, सोपान, मुक्ताई, निवृत्ती, नामदेव असे सगळे एकत्र जमलेले असताना मुक्ताईने कुतुहल म्हणून गोरोबा काकांना विचारले, 'गोरोबा काका, गोरोबा काका, ते कोपऱ्यात ठेवले आहे, त्याला काय बरं म्हणतात?'गोराबा काका म्हणाले, 'मुक्ते, त्याला थापटणे म्हणतात. त्याने कच्ची मडकी कोणती आणि पक्की कोणती हे आपटून ओळखता येते.'मुक्ता ज्ञानोबा दादाकडे बघून हसत म्हणाली, `अय्या, कित्ती छान आहे हे. मग इथे जमलेल्या मडक्यांपैकी कोणते मडके कच्चे आणि कोणते पक्के हे ओळखता येईल का?'

हे ऐकताच नामदेवाने कान टवकारले. पण सभेतून उठून कसे जायचे, म्हणून तो निमूट बसून काय चाललंय हे पाहत होता.गोरोबा काका मुक्तेला म्हणाले, `बघता येईल की, त्यात काय एवढं?'

असे म्हणत गोरोबा काकांनी सर्व संत मंडळींच्या डोक्यावर थापटणे मारायला सुरुवात केली. नुसत्या आवाजाने नामदेवाच्या डोक्यावर टेंगुळ येऊ लागले. तो घाबरला आणि त्याच्यावर पाळी आली तेव्हा म्हणाला, `ही कसली परीक्षा? मला नाही तपासून घ्यायचं काही. माझं मडकं पक्कच आहे. माझ्याशी खुद्द पांडुरंग खेळतो, बोलतो, माझं सगळं ऐकतो. मग मी कसा राहीन कच्चा?'यावर गोरोबा काका मुक्तेकडे बघत म्हणाले, `मुक्ते हे आहे कच्च मडकं!'

नामदेव रागारागात पाय आपटीत तेथून बाहेर पडला. मुक्ता धावत त्याच्या मागे गेली आणि म्हणाली, `नामदेवा, असा रागावू नकोस. गोरोबा काका म्हणाले त्याचे वाईट वाटून घेऊ नकोस, उलट स्वत:मध्ये सुधारणा कर. अरे, विठोबा तुझ्याशी खेळतो, बोलतो याचा तुला अभिमान झाला आहे. परंतु तू गुरु केला असतास, तर या गोष्टीचा वृथा अभिमान कधीच गळून पडला असता. हा मी पणा दूर करण्यासाठी गुरुंना शरण जा. गुरु केल्याशिवाय कोणालाही पर्याय नाही...

सद्गुरु अनुग्रहावीण हरीला तो कठीण सर्वथा पटणे,गोरा संत परीक्षी मस्तकी हाणून सर्व थापटणे।।

देवाचे सान्निध्य सतत राहावे असे वाटत असेल, तर अहंकाराचे अस्तित्त्वच नको. यासाठी तू विसोबा खेचर नावाचे गृहस्थ आहेत, त्यांना शरण जा, ते तुला आपला शिष्य करून घेतील आणि तुझे हे आधेअधुरे मडके पूर्ण पक्के होईल.

नामदेवाने मुक्तेचा शब्द उचलून धरला आणि विसोबा खेचर यांची भेट घेतली व त्यांचे शिष्यत्त्व स्वीकारले. गुरुंनी नामदेवाला अनुग्रह दिला त्यानंतर नामदेवांची कधीच फजिती झाली नाही. म्हणून संतांनी, देवांनी जसा गुरु केला, तसा आपणही केला पाहिजे.

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा