शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 12:47 IST

Guru Asta 2024: गुरु अस्ताचा काळ महिनाभराचा आहे, या काळात वैयक्तिक, नैसर्गिक, राजकीय शुभ-अशुभ घटना घडू शकतात असे ज्योतिष तज्ञांचे मत आहे!

धन, धर्म, ज्ञान, सुख, समृद्धी, विवाह, संतती, भाग्य, संतुलन आधीचे कारक देवगुरू बृहस्पती वृषभ राशी मध्ये ८ मे २०२४ ते १ जून २०२४ पर्यंत गुरु अस्त राहतील. या घटनेचा प्रभाव प्रत्येक राशीवर होईल. पण धनु आणि मीन जास्त प्रभावित राहतील, कारण या काळात या  राशि ना स्वामी बल कमी होईल.  याबद्दल सविस्तर माहिती देत आहेत, गजानन परब गुरुजी!

गुरु अस्त म्हणजे काय ते जाणून घेऊ!

आपण जर कुंडलीत पहाल तर जो ग्रह अस्त झालेला असतो त्या समोर एक जळत असलेले चिन्ह असते, म्हणजे जळत असल्याचे निदर्शनात येते किंवा त्या समोर कंसात(अ) असे असते, म्हणजे तो ग्रह त्या वेळी अस्त आहे.  ग्रह जेव्हा आकाशात गोचर भ्रमण करतात त्यावेळी ग्रह एक ठराविक अंतरात सूर्याच्या जवळ येतो तो ग्रह अस्त होत असतो, मग प्रत्येक ग्रह एक वेगवेगळ्या अंतरात अस्त होतो. सूर्य सिद्धांत मध्ये याचा उल्लेख केलेला आहे की कोणता ग्रह किती अंतरात सूर्याजवळ अस्त होत जातो, त्या नुसार गुरु सूर्याच्या ११ अंश अंतरात येतो त्या वेळी अस्त होतो. अस्त होत असलेला ग्रह शुभ फळ देण्यात असमर्थ होतो. बृहतसंहितामध्ये सांगितल्याप्रमाणे शनि ग्रह ज्यावेळी अस्त होतो त्या वेळी राजाला, आधुनिक जगात प्रशासकीय काम करणार्‍यांना, नेते, मंत्री, प्रमुख यांना  त्रासदायक, भीतीदायक स्थिति निर्माण होत असते. त्यामुळे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. 

ग्रह अस्त झाल्याने काय होते? अस्त होणे अशुभ का संगितले आहे? 

सर्वच ग्रहांना ऊर्जा आणि प्रकाश सूर्यापासून प्राप्त होत असतो, परंतु त्या साठी ग्रहांना सूर्यापासुन काही अंतरात राहणेही आवश्यक असते, ग्रह ज्यावेळी सूर्याच्या खूप जवळ येतात त्यावेळी ते बलहीन होतात, जळल्याप्रमाणे होतात, जसे आपण अग्नीच्या जवळ जातो त्यावेळी आपली  त्वच्या उष्णतेने जळल्या प्रमाणे भासते, त्याच प्रमाणे ग्रह बलहीन होतात त्यांच्या कारक तत्वात कमतरता येते यालाच अस्त म्हटले आहे. 

फलदीपिका सांगते, अस्त ग्रह नीच अवस्थे प्रमाणे फळ देतात. ज्या ग्रहाचा स्वप्रकाश नष्ट होतो, तो अपेक्षित फळ कस देईल? पाराशार संहिता सांगते, कोणताही ग्रह ज्यावेळी सूर्या पासून १८० अंशात असतो, म्हणजे सूर्यापासून सातव्या स्थानात असतो त्यावेळी तो पूर्ण प्रकाशित होऊन बलवान असतो, चंद्र सूर्यापासून १८० अंशात सातव्या राशीत समोर असतो त्यावेळी पोर्णिमा तिथी असते तो पूर्ण प्रकाशित होऊन बलवान होतो. 

कुंडली नुसार गुरु आपल्या महत्वपूर्ण भावांचे काराक आहेत, कालपुरुष कुंडलीत ९ व्या व १२ व्या राशींचे स्वामी आहेत म्हणजे धर्म आणि भाग्य भावाचे स्वामी त्याच बरोबर मोक्ष भावाचा स्वामी आहे, गुरुच्या ५, ७, ९ अमृत्तुल्य अशा ३ दृष्टी आहेत, महर्षि पाराशर सांगतात कुंडलीतील शुभ आणि बलवान गुरु १ लाख दोष नष्ट करतात एवढे शुभ बृहस्पती आहेत.         मंगल कार्य वर्ज्य :

म्हणून सर्व गुण संपन्न, धन, धर्म, ज्ञान, सुख, समृद्धी, विवाह, संतती, भाग्य देणारा गुरु सर्व ग्रहात अत्यंत शुभ फलदायी, सर्व मंगल कार्याचा कारक असा ग्रह गुरु स्वत: अस्त होतो, त्या वेळी तो बलहीन असतो, त्याच्या कारक तत्वात कमतरता येते, त्यावेळी आपण कोणतेही शुभकार्य करणे योग्य नाही, मग विवाह, गृहप्रवेश, जमीन खरेदी, वगेरे सर्व मंगल कार्य करू शकत नाहीत. म्हणुन मुहूर्त शास्त्रानुसार गुरु  अस्त असताना, गुरु बल नसताना मुहूर्त वर्ज केले आहेत. गुरु धर्माचे ग्रह आहेत तर राहू त्यांच्या विरुद्ध ग्रह आहेत. गुरु अस्त होतात तेव्हा राहुचा अशुभ प्रभाव पण वाढतो. म्हणूनच नवीन कामे, नवीन इनवेष्टमेंट या काळात वर्ज्य  केलेली चांगली.   

गुरु अस्ताचा अशुभ प्रभाव कोणत्या राशींवर?

धनु, मीन राशींचे स्वामी गुरुआहेत. कर्क चे उच्च आहेत. अस्त काळात धनु, मीन, कर्क, सिंह या राशीना अशुभ फळ प्राप्त होण्याचे जास्त पाहण्यात येते, त्याच प्रमाणे या काळात इतर राशीना ही शुभ-अशुभ फळ प्राप्त होते. 

गुरु अस्त काळातील उपाय : 

गुरु अस्त काळात गुरु संबंधित उपाय अवश्य करावे. पिवळ्या वस्त्राचे दान करावे, मंदिरात साफसफाई व दान करावे. आपल्या गुरू जनांची सेवा करावी, शिव अभिषेक, विष्णुसहस्त्रनाम स्त्रोत्र चा पाठ करावा, गुरुवारी पिंपळाच्या खोडात जल किंवा दुध अर्पण करावे. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष