शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Gudi Padwa 2022 : दुर्धर आजारापासून मुक्ती आणि तेजस्वी शरीर हवे असेल तर कडुलिंबाच्या पानांचा गुढी पाडव्यापासून 'असा' वापर करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 12:28 IST

Gudi Padwa 2022 : गुढी पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांशी आपला संबंध येतो त्यानंतर वर्षभर त्या गुणकारी पानांकडे दुर्लक्ष होते. त्याचा उपयोग वाचा आणि निरोगी आयुष्यासाठी दैनंदिन आयुष्यात त्याचा समावेश करा. 

गुढीचा नैवेद्य आयुर्वेदाचार्य सुश्रुताने “चरक संहितेत” सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदिक औषध म्हणून कडू लिंबाची कोवळी पाने, फुले, गूळ, साखर, मिरे, जिरे, हरभऱ्याची डाळ, ओवा, हिंग, धने, मीठ यांचे मिश्रण वाटून एकजीव करून प्रत्येकाला थोडा थोडा प्रसाद खायला देतात, यासाठी की जरी आयुष्याची किंवा दिवसाची, वर्षाची सुरुवात कडू झाली तरी शेवट गोड व्हावा" हा संदेश यातून मिळतो.

खरे तर हे चूर्ण रोज चमचाभर आयुष्यभर घ्यायचे असते. ज्यामुळे दुर्धर व्याधी दूर होतात. शरीर तेजस्वी व निरोगी बनते. तो तिक्त रस आहे जो शरीराला अत्यावश्यक आहे. तो शीत आहे, चन्दनाच्या खालोखाल त्याचे गंध उगाळून सर्वांगाला लावतात, म्हणजे शरीरातील उष्णता कमी होते. किवा आंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने टाकूनही स्नानाला म्हणजे शरीर निरोगी वापरतात. म्हणून लिंबाच्या पेंडीचा निम साबण वापरतात. बाळंतिणीने ह्याचा रस प्यायल्यास बाळंतरोग होत नाहीत.

कडू घोट जीवनात अनेकदा येतात ते गिळून टाकण्याची सवय व्हावी.  म्हणून म्हणतात की व्यवहारात नेहेमी कटू असावे म्हणजे शेवट गोड होतोच. अन नेमके तेच आपल्याला नको असते किंवा आवडत नाही व आपण ते टाळतोच, जे नेहेमी अटळ असते. जे नको असते तेच आपल्या नशिबी येते. मग जे मिळाले तेच गोड का न मानून घ्यावे! औषध कडुच असते पण ते कसे शर्करावगुंठित असते पण ते आपले आरोग्य चांगले ठेवते ना! तसेच आपले आयुष्य असते. 

कडुच का? जे वर्षभर सेवन केले जात नाही ते वर्षारंभीच का? हा एक पर्यावरणाचा संदेश आहे. झाडे लावा झाडे जगवा. लिंब हे ऑक्सीजन पुरवणारे झाड आहे. त्याची पाने हवा शुद्ध करतात. पूर्वी हायवेवर, किंवा गावांच्या दुतर्फा ही दोन दोन माणसांच्या हाताचा मोठ्ठा घेर असलेली लिंब, चिंच, आंबा, वड, पिंपळ, साग, पळस, औदुंबरही झाडे लावून त्याचे संवर्धन केले जाई. त्याचे कारण म्हणजे हे वृक्ष थंडगार सावली व लाकूडफाटा, सरण, बांधकामासाठी लाकूड, पाचोळ्याचे खत, फळे फुले, पाने सर्वच औषधी व पशुपक्षी, मानवास खाण्यास उपयोगी, जणू कल्पवृक्षच.

पण आता तुमच्या लक्षात आले आहे का, की इथेही पाश्चिमात्य विचारांनी घुसखोरी करून आपली नकळत सांस्कृतिक व पर्यावरणाची हानी सुप्तपणे चालवली आहे, हे वृक्ष लावणे बंदच झाले आहे काही काळापासून व सुभाबुळ, गुलमोहोर, विदेशी भरपूर कचरा करणारी, फळेफुले न देणारी अशी नाजुक झाडे लावण्याचा सपाटा चालू आहे(ज्याच्या लाकडाचा काहीही उपयोग होत नाही), दुर्दैवाने हे कोणाच्याच लक्षात येत नाही आहे. असो. आपण त्याचे महत्त्व लक्षात घेऊ आणि पर्यावरण पूरक झाडांची लागवड करून निसर्गाचे आणि संस्कृतीचे जतन करू. 

टॅग्स :Healthआरोग्यgudhi padwaगुढीपाडवा