शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Gudi Padwa 2022 : दुर्धर आजारापासून मुक्ती आणि तेजस्वी शरीर हवे असेल तर कडुलिंबाच्या पानांचा गुढी पाडव्यापासून 'असा' वापर करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 12:28 IST

Gudi Padwa 2022 : गुढी पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांशी आपला संबंध येतो त्यानंतर वर्षभर त्या गुणकारी पानांकडे दुर्लक्ष होते. त्याचा उपयोग वाचा आणि निरोगी आयुष्यासाठी दैनंदिन आयुष्यात त्याचा समावेश करा. 

गुढीचा नैवेद्य आयुर्वेदाचार्य सुश्रुताने “चरक संहितेत” सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदिक औषध म्हणून कडू लिंबाची कोवळी पाने, फुले, गूळ, साखर, मिरे, जिरे, हरभऱ्याची डाळ, ओवा, हिंग, धने, मीठ यांचे मिश्रण वाटून एकजीव करून प्रत्येकाला थोडा थोडा प्रसाद खायला देतात, यासाठी की जरी आयुष्याची किंवा दिवसाची, वर्षाची सुरुवात कडू झाली तरी शेवट गोड व्हावा" हा संदेश यातून मिळतो.

खरे तर हे चूर्ण रोज चमचाभर आयुष्यभर घ्यायचे असते. ज्यामुळे दुर्धर व्याधी दूर होतात. शरीर तेजस्वी व निरोगी बनते. तो तिक्त रस आहे जो शरीराला अत्यावश्यक आहे. तो शीत आहे, चन्दनाच्या खालोखाल त्याचे गंध उगाळून सर्वांगाला लावतात, म्हणजे शरीरातील उष्णता कमी होते. किवा आंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने टाकूनही स्नानाला म्हणजे शरीर निरोगी वापरतात. म्हणून लिंबाच्या पेंडीचा निम साबण वापरतात. बाळंतिणीने ह्याचा रस प्यायल्यास बाळंतरोग होत नाहीत.

कडू घोट जीवनात अनेकदा येतात ते गिळून टाकण्याची सवय व्हावी.  म्हणून म्हणतात की व्यवहारात नेहेमी कटू असावे म्हणजे शेवट गोड होतोच. अन नेमके तेच आपल्याला नको असते किंवा आवडत नाही व आपण ते टाळतोच, जे नेहेमी अटळ असते. जे नको असते तेच आपल्या नशिबी येते. मग जे मिळाले तेच गोड का न मानून घ्यावे! औषध कडुच असते पण ते कसे शर्करावगुंठित असते पण ते आपले आरोग्य चांगले ठेवते ना! तसेच आपले आयुष्य असते. 

कडुच का? जे वर्षभर सेवन केले जात नाही ते वर्षारंभीच का? हा एक पर्यावरणाचा संदेश आहे. झाडे लावा झाडे जगवा. लिंब हे ऑक्सीजन पुरवणारे झाड आहे. त्याची पाने हवा शुद्ध करतात. पूर्वी हायवेवर, किंवा गावांच्या दुतर्फा ही दोन दोन माणसांच्या हाताचा मोठ्ठा घेर असलेली लिंब, चिंच, आंबा, वड, पिंपळ, साग, पळस, औदुंबरही झाडे लावून त्याचे संवर्धन केले जाई. त्याचे कारण म्हणजे हे वृक्ष थंडगार सावली व लाकूडफाटा, सरण, बांधकामासाठी लाकूड, पाचोळ्याचे खत, फळे फुले, पाने सर्वच औषधी व पशुपक्षी, मानवास खाण्यास उपयोगी, जणू कल्पवृक्षच.

पण आता तुमच्या लक्षात आले आहे का, की इथेही पाश्चिमात्य विचारांनी घुसखोरी करून आपली नकळत सांस्कृतिक व पर्यावरणाची हानी सुप्तपणे चालवली आहे, हे वृक्ष लावणे बंदच झाले आहे काही काळापासून व सुभाबुळ, गुलमोहोर, विदेशी भरपूर कचरा करणारी, फळेफुले न देणारी अशी नाजुक झाडे लावण्याचा सपाटा चालू आहे(ज्याच्या लाकडाचा काहीही उपयोग होत नाही), दुर्दैवाने हे कोणाच्याच लक्षात येत नाही आहे. असो. आपण त्याचे महत्त्व लक्षात घेऊ आणि पर्यावरण पूरक झाडांची लागवड करून निसर्गाचे आणि संस्कृतीचे जतन करू. 

टॅग्स :Healthआरोग्यgudhi padwaगुढीपाडवा