शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

सद्विचारांच्या बेटावरची दृक-श्राव्य भक्ती..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 16:52 IST

एकमेकांचे दोष दाखवतच जो तो आपले थोरपण संपवून टाकतो..!

पुणे : आपला मानवी देह हा नेहमी दृक-श्राव्य माध्यमांत गुंतलेला असतो. त्यातुन एकाचवेळी चांगले-वाईट असे विचारांचे दोन मार्ग कार्यरत असतात. परंतु, आपण चांगले कमी ऐकतो, पाहतो आणि वाईट गोष्टींचे जास्त आकर्षण घेऊन जगतो. मुळात अवती भवतीचे निसर्ग चित्रच बिघडत चालले आहे. जगाची गाडीच रुळावरून घसरत चालली आहे. त्यामुळे सध्या तुम्ही कुठलेही वर्तमान पत्र वाचा आणि चॅनेल बघा तिथे तुम्हाला सर्वाधिक हिंसा, क्रोध, अत्याचार, भीती, नकारात्मक विचारांच्या विषयांचेच प्राबल्य पाहायला मिळते.

एकमेकांच्या उणिवा काढणे. एकमेकांचे दोष पाहणे. हे जर तुम्ही सतत ऐकायला लागलात तर तुमच्या मनात विचार चांगले विचार थोडेच येणार आहेत का ? सारखे नको ते विचार येणार व मनाला स्थिरता कधी येणारच नाही.

    आपल्या मनात वाईट विचारांची प्राबल्य कमी होऊन जर चांगल्या विचारांची निर्मिती असे वाटत असेल तर त्यासाठी गोष्टी नक्कीच नव्याने स्वीकाराव्या लागतील आणि काही बदलाव्या देखील लागणार आहे. त्याची सुरुवात ही नेहमी चांगलय श्रवणाने केली पाहिजे. जितक्या जास्त प्रमाणात चांगले विचार आपल्या कानावर पडत राहतील तितके आपले वाईट सवयीतून बाहेर पडण्यास मदत होईल. मनातले वाईट विचार हळूहळू कमी होत जाईल. आनंद आणि सकारात्मकतेच्या कक्षेत प्रवेश करता येईल. कानावर नेहमी चांगलेच कसे पडेल याची व्यवस्था आपण केली पाहिजे. ही व्यवस्था आपोआप होत नाही. आपल्या कानात नेहमी वाईट गोष्टीच पडत असतात. कानात चांगले पडणे कठीण म्हणून तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत बसा. चांगली माणसे नेहमी चांगले बोलत असतात व त्यामुळे आपल्या कानात नेहमी चांगले चांगले पडते. एकदा तुमच्या चांगल्या गोष्टी तुमच्या कानात पडत राहिल्या की  मनात चांगले विचार येऊ लागतात. आपण जे ऐकतो ना तिथून स्मरणाला सुरुवात होते. तुम्ही काहीही ऐका, काहीही काहीही वाचा. काहीही बोला. त्याप्रमाणे आपले स्मरण होते. पाहताना सावध,  बोलताना सावध,  विचार करताना सावध, स्मरण करताना म्हणजे सावध, असा सर्वच ठिकाणी सावधपणा असायला हवा. मूळ आहे तिथे जर सावधपणा ठेवला तर बाकीचे काळजी करण्याचे कारण नाही. मूळ स्मरण म्हणजे देव. स्मरण देवाचे करावे असे म्हटलेले आहे.  

    जे जे काही चांगले, आश्वासक दिव्य जगात आहे, ते सगळे देव स्वरूपाचे आहे. आपण सगळे माणसा माणसातले दोष पाहत, ऐकवतच आपले मोठेपण संपवून टाकतो.

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक