शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

सद्विचारांच्या बेटावरची दृक-श्राव्य भक्ती..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 16:52 IST

एकमेकांचे दोष दाखवतच जो तो आपले थोरपण संपवून टाकतो..!

पुणे : आपला मानवी देह हा नेहमी दृक-श्राव्य माध्यमांत गुंतलेला असतो. त्यातुन एकाचवेळी चांगले-वाईट असे विचारांचे दोन मार्ग कार्यरत असतात. परंतु, आपण चांगले कमी ऐकतो, पाहतो आणि वाईट गोष्टींचे जास्त आकर्षण घेऊन जगतो. मुळात अवती भवतीचे निसर्ग चित्रच बिघडत चालले आहे. जगाची गाडीच रुळावरून घसरत चालली आहे. त्यामुळे सध्या तुम्ही कुठलेही वर्तमान पत्र वाचा आणि चॅनेल बघा तिथे तुम्हाला सर्वाधिक हिंसा, क्रोध, अत्याचार, भीती, नकारात्मक विचारांच्या विषयांचेच प्राबल्य पाहायला मिळते.

एकमेकांच्या उणिवा काढणे. एकमेकांचे दोष पाहणे. हे जर तुम्ही सतत ऐकायला लागलात तर तुमच्या मनात विचार चांगले विचार थोडेच येणार आहेत का ? सारखे नको ते विचार येणार व मनाला स्थिरता कधी येणारच नाही.

    आपल्या मनात वाईट विचारांची प्राबल्य कमी होऊन जर चांगल्या विचारांची निर्मिती असे वाटत असेल तर त्यासाठी गोष्टी नक्कीच नव्याने स्वीकाराव्या लागतील आणि काही बदलाव्या देखील लागणार आहे. त्याची सुरुवात ही नेहमी चांगलय श्रवणाने केली पाहिजे. जितक्या जास्त प्रमाणात चांगले विचार आपल्या कानावर पडत राहतील तितके आपले वाईट सवयीतून बाहेर पडण्यास मदत होईल. मनातले वाईट विचार हळूहळू कमी होत जाईल. आनंद आणि सकारात्मकतेच्या कक्षेत प्रवेश करता येईल. कानावर नेहमी चांगलेच कसे पडेल याची व्यवस्था आपण केली पाहिजे. ही व्यवस्था आपोआप होत नाही. आपल्या कानात नेहमी वाईट गोष्टीच पडत असतात. कानात चांगले पडणे कठीण म्हणून तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत बसा. चांगली माणसे नेहमी चांगले बोलत असतात व त्यामुळे आपल्या कानात नेहमी चांगले चांगले पडते. एकदा तुमच्या चांगल्या गोष्टी तुमच्या कानात पडत राहिल्या की  मनात चांगले विचार येऊ लागतात. आपण जे ऐकतो ना तिथून स्मरणाला सुरुवात होते. तुम्ही काहीही ऐका, काहीही काहीही वाचा. काहीही बोला. त्याप्रमाणे आपले स्मरण होते. पाहताना सावध,  बोलताना सावध,  विचार करताना सावध, स्मरण करताना म्हणजे सावध, असा सर्वच ठिकाणी सावधपणा असायला हवा. मूळ आहे तिथे जर सावधपणा ठेवला तर बाकीचे काळजी करण्याचे कारण नाही. मूळ स्मरण म्हणजे देव. स्मरण देवाचे करावे असे म्हटलेले आहे.  

    जे जे काही चांगले, आश्वासक दिव्य जगात आहे, ते सगळे देव स्वरूपाचे आहे. आपण सगळे माणसा माणसातले दोष पाहत, ऐकवतच आपले मोठेपण संपवून टाकतो.

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक