शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताय? हे उपाय करा, काम पूर्ण होणारच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 12:38 IST

कामाच्या बाबतीत टाळाटाळ करू नका. आजचे काम उद्यावर अजिबात ढकलू नका.

महत्त्वाच्या कामाला निघताना मनात शेकडो शंका कुशंका येतात. काम होईल का? संबंधित व्यक्ती भेटेल का? कामाला गती मिळेल का? कामात अडथळे येतील का? असे नानाविध प्रश्न उपस्थित राहिले, की मनात शंकेची पाल चुकचुकते. नुसत्या विचाराने आपण गर्भगळीत होतो आणि भीतीने कामाची चालढकल करत आजचे काम उद्यावर रेटतो. परंतु, वेळेला अतिशय महत्त्व असते. निघून गेलेली वेळ आणि हातातून निसटलेली संधी परत येत नसते. म्हणून आत्मविश्वासाने कामाची सुरुवात करा आणि सोबतच पुढील उपाय करा. कामात अडचणी येणार नाहीत.

>>कामात अडथळे येण्यामागे अनेकदा कारणीभूत असते, ती म्हणजे ग्रहदशा. काम अधिकच महत्त्वाचे असेल, तर घराबाहेर निघण्याआधी पंचांगात किंवा दिनदर्शिकेत राहू काळ तपासून घ्यावा. राहू काळात कामासाठी बाहेर पडू नये. राहू काळ सुरू होण्याआधी किंवा झाल्यानंतर कामाची सुरुवात करावी. सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीत राहू काळ असतो आणि तो साधारण दीड तासांचा असतो. 

>>ज्या दिशेने प्रवास करणार आहात, ती दिशा प्रवासासाठी योग्य आहे की नाही, हे देखील दैनिक पंचांगात दिलेले असते. त्याला दिशाशूल म्हणतात. त्यावर उपायही दिलेले असतात. म्हणून पंचांग पाहण्याचा रोज सराव ठेवला पाहिजे आणि पंचांग कसे पाहावे हे शिकून घेतले पाहिजे. 

>>एखाद्या कामाचा निकाल, खरेदी, बोलणी असे काही प्रसंग असतील, तर घराबाहेर निघताना एक चमचा दही साखर खाऊन निघा.

>>कामाला गती मिळावी, म्हणून घरातून निघताना पोळीचे तुकडे कावळ्याला किंवा कुत्र्याला खाऊ घालावे. 

>>बाप्पाच्या नावाने सर्व प्रकारची कार्यसिद्धी होते. म्हणून बाप्पा मोरया म्हणून बाहेर पडावे. तसेच दाराबाहेर पडल्यावर ज्या बाजूला जायचे आहे त्याच्या विरुद्ध दिशेने चार पावले मागे उलट चालावे.मग पुढे जावे.

>>पूर्वी घरी आलेल्या माणसाला गुळ पाणी देण्याची प्रथा होती. तसेच कामाला जाताना गुळ पाणी घेऊन निघावे.

>>महत्त्वाच्या कामालाच नाही, तर एरव्हीसुद्धा तुळशीचे पान खाऊन बाहेर पडणे शुभ मानले जाते. 

>>आपल्या इष्ट देवतेची पूजा करून बाहेर पडावे.    

>>तसेच स्वमुख पाहणेदेखील शुभ मानले जाते. स्वत:ला आरशात पाहून आपला आत्मविश्वास दुणावतो आणि कार्यपूर्तीचे बळ मिळते.

>>कामासाठी बाहेर पडल्यावर मागे फिरून पाहू नये. पुढेच मार्गक्रमणा करावी.