शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

Gauri Puja 2023: ज्येष्ठा-कनिष्ठा गौरी घरी येतात आणि तृप्त होऊन घरा दाराला कोणते वरदान देतात ते पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 17:49 IST

Gauri Puja 2023: २० सप्टेंबर रोजी गौरी आगमन झाले आहे, २१ रोजी पूजन आणि २२ रोजी विसर्जन आहे; सोनपावली आलेली गौरी आपल्याला काय काय देते बघा!

आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झाले, भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिले. मुले घरी आली. आईला सांगितले, `आई, आपल्या घरी गौर आण.'

आई म्हणाली, `बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे. घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवायला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही वडिलांकडे जा, बाजारातून सामान आणायला सांगा. सामान आणले म्हणजे गौर आणीन.' मुले उठली. वडिलांकडे गेली. त्यांना म्हणाली, `बाबा, बाजारात जा, घावनघाटल्याचे सामान आणा म्हणजे आई गौर आणील.' 

वडिलांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनातून फार दु:खी झाला. सोन्यासारखी मुले आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबीपुढे इलाज नाही. मागायला जावे तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरे म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली.

जवळच एक म्हातारी सवाशीण होती. तिने त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाने हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचे समाधन केले. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले. बायकोने दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण म्हणून विचारले. वऱ्याने आजी म्हणून सांगितले. 

बायको घरात गेली आणि आंबिलीकरिता कण्या पाहू लागली. तो मडके कण्यांनी भरलेले दृष्टीस पडले. तिला मोठे नवल वाटले. ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. तिने पेज केली. सर्वांनी पोटभर खाल्ली. आनंदाने सगळे झोपले.

सकाळ झाली. आजीने ब्राह्मणाला उठवले आणि त्याच्या बायकोला न्हाऊ घालायला सांगितले. देवाला घावनघाटले कर म्हणाली. ब्राह्मणाने आजीचा निरोप बायकोला दिला. आपण उठून भिक्षेला गेला. बायकोने आजीला न्हाऊ घातले. तोवर ब्राह्मण भरपूर भिक्षा घेऊन आला. सगळे आनंदात होते. ब्राह्मणाच्या बायकोने वेळ न दवडता स्वयंपाक केला. आजीसकट सगळे जण घावनघाटल्याचे जेवण जेवले. तृप्त झाले. आजीने उद्या खीर कर असे ब्राह्मणाच्या बायकोला सांगितले. देवावर भार टाकून तिनेही तत्काळ मान डोलवत हो म्हटले. 

दुसऱ्या दिवशी ब्राह्मण घराबाहेर पडणार, तेव्हा आजी म्हणाली, `तू काळजी करू नका. तुला जितक्या गाई-म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर. तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचे दूध काढ.'

ब्राह्मणाने तसे केले. संध्याकाळी खीरीचे जेवण झाले. दुसऱ्या दिवशी आजीने ब्राह्मणाला सांगितले, `खूप पाहुणचार घेतला आता मला माझ्या घरी पोहोचव.' तेव्हा ब्राह्मण म्हणाला, `आजी तुझ्यामुळे माझे प्राण वाचले, मी खंबीरपणे पुन्हा माझे कार्य सुरू केले. लोकांना ज्ञानदान करून भिक्षा मिळवू लागलो. माझ्या या वैभवात अशीच वाढ होत राहावी म्हणून उपाय सांगशील का?'

यावर आजी म्हणाली, `तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक. मडक्यांवर टाक. पेटीत टाक. गोठ्यात टाक. असे केलेस म्हणजे कसली कमतरता राहणार नाही. पण या सगळ्याबरोबर प्रयत्न, कष्ट सुरू ठेव. कर्तव्यात कसूर ठेवू नकोस.'

ब्राह्मणाने बरं म्हटले. तिच्या रूपाने आलेल्या गौरीची पूजा केली. गौरी प्रसन्न झाली. तिने व्रत सांगितले, `भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावे, दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्याने धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. दुसरे दिवशी घावनगोड, तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णींची ओटी भरावी. जेवू घालावे. संध्याकाली हळद कुंकू वाहून बोळवण करावी. म्हणजे अक्षय्य सुख मिळेल. संतती संपत्ती मिळेल.' 

अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी, देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण!

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी