शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

गौर गोपाल दास सांगतात, 'देवाची सोबत हवी असेल तर त्याच्यावर निःशंकपणे विश्वास टाकायला शिका!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 17:45 IST

देवावर विश्वास आहे हे म्हणणं आणि प्रत्यक्षात त्याच्यावर विश्वास टाकणं यातला फरक गौर गोपाल दास यांनी फार छान समजवला आहे. 

आपण म्हणतो, की देवावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण संकटकाळी जेव्हा देव आपली परीक्षा घेतो, आपल्याला एकटे सोडतो, तेव्हा अचानक तो विश्वास डळमळीत होऊ लागतो. एवढेच नाही, तर आपण त्याचे अस्तित्वही नाकारतो. मग याला विश्वास म्हणायचे का?

महाभारतात १०० कौरवांसमोर ५ पांडवांचा विजय झाला, का? कारण साक्षात श्रीकृष्ण त्यांच्या पाठीशी होता. तेच जर, दुर्योधनाने श्रीकृष्णाला मागून घेतले असते, तर कदाचित वेगळाच इतिहास घडला असता. मात्र, दुर्योधनाने कृष्णापेक्षा त्याच्या अठरा औक्षहणी सैन्यावर विश्वास दाखवला आणि परमात्म्याचा संग नाकारला. याउलट अर्जुनाने, श्रीकृष्णावर विश्वास दाखवला आणि तुझे सैन्य नको, फक्त तू सोबत हवा, असे म्हटले आणि त्याच्या मार्गदर्शनाने विजय मिळवला.असा विश्वास असायला हवा. हेच सांगताना, साधू गौर गोपाल दास प्रभू सुंदर गोष्ट सांगतात....

एकदा एका विमानप्रवासात सगळे प्रवासी शांतपणे झोपले होते. अचानक विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. प्रवाशांना सूचना मिळेपर्यंत विमान हवेत हेलकावे खाऊ लागले. एका क्षणी तर विमान १८० अंशात आकाश-पाताळाला समांतर झाले. सर्व प्रवाशांना वाटले, पुढचा क्षण आपण बघणार नाही. सगळे आरडा- ओरड करू लागले. रडू लागले. पायलटला दोष देऊ लागले. एकूणच सर्वांची भीतीने गाळण उडाली होती. 

मात्र, त्याच वेळी एक लहान मुलगी अजिबात भांबावून न जाता आपले गोष्टीचे पुस्तक छातीशी कवटाळून लोकांकडे बघत होती आणि हसत होती. ही गोष्ट एका माणसाच्या लक्षात आली. 

देवकृपेने काही क्षणातच विमान स्थिरस्थावर झाले आणि सुरक्षित ठिकाणी उतरवले गेले. सर्व प्रवासी देवाचे आभार मानत, एकमेकांचे अभिनंदन करत विमानातून उतार झाले. ती छोटी मुलगी, आपला सीट बेल्ट काढून उतरायला निघाली, तेव्हा त्या व्यक्तीने तिला थांबवून विचारले, 'बेटा, मगाशी एवढे लोक घाबरले असताना, आरडा-ओरड करत असताना, तू अगदी शांतपणे सर्वांकडे पाहत होतीस आणि नंतर काहीही न घडल्यासारखी पुन्हा पुस्तक वाचू लागलीस. तुला घडलेल्या प्रसंगाची भीती नाही वाटली?'

त्यावर ती मुलगी पुन्हा हसून म्हणाली, 'कसली भीती काका? या विमानाचे पायलट माझे बाबा आहेत, त्यामुळे सर्वांपेक्षा जास्त, त्यांना माझी काळजी असणार आणि ते आहेत म्हटल्यावर मला काहीच नाही होणार, याची मला खात्री होती.'

याला म्हणतात विश्वास! असा विश्वास आपण देवावर दाखवतो का, हे तपासून पाहायला हवे.