शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

Garud Puran: गरुड पुराणानुसार 'या' लोकांसाठी मरणोत्तर स्वर्गाची दारे असतात खुली; कोण असतात ते भाग्यवान? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 11:05 IST

Garud Puran: गरुड पुराणात मनुष्य देहातून मुक्त झालेल्या आत्म्याचा मरणोत्तर प्रवास कसा आणि कोणत्या दिशेने असेल या संदर्भात माहिती दिली आहे... 

धर्म पुराणात चांगल्या आणि वाईट कर्मांचे तपशीलवार वर्णन केले आहे. यासोबतच कर्माच्या आधारावर स्वर्ग आणि नरकही सांगितले आहे. जे वाईट कर्म करतात त्यांना नरक मिळतो. त्याचप्रमाणे सत्कर्म करणाऱ्यांना स्वर्ग प्राप्त होतो. तसेच सत्कर्माला सदाचरण आणि अध्यात्माची जोड जे देतात त्यांना जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका म्हणजेच मोक्ष मिळतो. गरुड पुराणात ही तिन्ही ठिकाणे सांगितली आहेत आणि त्यांच्यासाठी कर्मांचे वर्णनही केले आहे. नरकात जावे असे कोणालाही वाटणार नाही आणि मोक्षाचे द्वार सर्वसामान्यांनासाठी तसे अवघडच! म्हणून आपल्यासाठी निदान स्वर्गाचे द्वार उघडते का पाहू आणि त्यासाठी कोणते सत्कर्म पदरात लागते तेही जाणून घेऊ!

गरुड पुराणात मनुष्य जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल माहिती दिली आहे. भगवान विष्णू आणि पक्षी राजा गरुड यांच्यातील चर्चेचा गरुड पुराणात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भगवान विष्णू सांगतात की ज्या आत्म्यांना स्वर्गात स्थान मिळते, त्यांना यमराज स्वत: स्वर्गाच्या दारात सोडण्यासाठी येतात. तेथे अप्सरा दारात त्यांचे स्वागत करतात. मृत्यूनंतर, असा आनंद फक्त त्या लोकांनाच मिळतो जे आपल्या आयुष्यात खूप चांगले कार्य करतात. 

>> जे इतरांना जलदान करतात. भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणे यासारखे महापुण्य नाही. गरुड पुराणातही तेच म्हटले आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात, त्यांना स्वर्गात स्थान मिळते. जसे की विहिरी, तळी, हंडे भरून ठेवणे. जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारे लोकही स्वर्गात जातात.

>> जे लोक नेहमी स्त्रियांचा आदर करतात आणि त्यांच्या उद्धारासाठी काम करतात, त्यांना स्वर्गातही स्थान मिळते.

>> जे आपल्या कष्टाने आणि प्रामाणिकपणाने पैसा कमावतात आणि त्यातील काही भाग गरिबांच्या मदतीसाठी वापरतात, ते सुद्धा खूप पुण्यवान असतात. त्यांनाही स्वर्गात स्थान मिळते.

>> ऋषी-मुनींचा, साधू संत सज्जनांचा आदर करणारे लोक. ते त्यांच्यासाठी जेवण आणि इतर सुविधांची व्यवस्था करतात, त्यांची सेवा करतात. वेद आणि पुराणांचा अभ्यास करणाऱ्या लोकांना शिधा देतात, यथाशक्ती आर्थिक मदत करतात त्यांनाही स्वर्ग मिळतो. 

>> जे आयुष्यभर चांगले कर्म करतात आणि कोणताही आजार न होता मरतात ते देखील स्वर्गास पात्र ठरतात.