शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

माघ शुक्ल सप्तमीला आरोग्य सप्तमी तसेच अचला सप्तमी का म्हणतात, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 08:00 IST

या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. हे व्रत केल्यामुळे धन, संपदा आणि संतान प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

माघ मासातील शुक्ल सप्तमीला अचला सप्तमी म्हणतात. हीच तिथी आपण रथसप्तमी या नावाने साजरी करतो. याशिवाय अचला सप्तमीला सूर्य सप्तमी तसेच आरोग्य सप्तमी असेही म्हणतात. यावर्षी ७ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी अचला सप्तमी आहे. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. हे व्रत केल्यामुळे धन, संपदा आणि संतान प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

पौराणिक कथेनुसार या दिवशी कश्यप ऋषी व त्यांची पत्नी अदिती यांच्या उदरी सूर्याचा जन्म झाला. हे बालक प्रखर तेजस्वी होते. त्याच्या जन्मामुळे सर्वत्र प्रकाशाचे साम्राज्य पसरले. म्हणून हा दिवस सूर्याची जयंती म्हणूनही साजरा केला जातो. ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा असते, त्यांनी हे व्रत केले असता त्यांनाही तेजस्वी व गुणी बालकाचे वरदान मिळते, असे म्हटले जाते. 

अचला सप्तमीचा व्रत :  

व्रतकर्त्याने आदल्या दिवशी म्हणजे षष्ठीला एकभुक्त अर्थात एक वेळ जेवून राहावे. सप्तमीला पहाटेच शुचिर्भूत व्हावे. नंतर शक्य असेल त्या धातूचा दिवा लावावा. सूर्याचे ध्यान करून तो दिवा वाहत्या पाण्यात सोडावा. या विधीनंतर स्वत:च्या घराच्या अंगणात रक्तचंदनाचे गंध उगाळून त्या गंधाने सारथी अरुणासह सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याचे चित्र काढावे. त्या चित्राचे 'ध्येय: सदा सवितृमंडल मध्यवर्ती' या मंत्राने ध्यान करावे. नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी. शेणीच्या विस्तवावर मातीच्या पात्रात केलेल्या खिरीचा नैवेद्य सूर्यप्रतिमेला दाखवावा. शेवटी सात रुईची पाने, सात प्रकारचे धान्य, सात बोरे वाहून अष्टांग अर्घ्य द्यावे. ब्राह्मणभोजन घालावे. स्त्रिायांनी संध्याकाळी हळदीकुंकू समारंभ करावा. दुर्धर व्याधींपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत रूढ झाले. 

अचला सप्तमीची प्रचलित कथा :

इंदुमती नावाची एक गणिका होती.  ती स्वत:चा उद्धार करून घेण्यासाठी वशिष्ठ नावाच्या ऋषिंकडे आली. त्यांनी तिला अचला सप्तमीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. तिने त्या व्रताचे आचरण केले. त्यामुळे तिचा उद्धार झाला. तसेच आणखी एका कथेनुसार कृष्णपूत्र शाम्ब अतिशय बलवान होता. त्याला त्याच्या शक्तीचा अभिमान होता. अशाच भावनेतून त्याने एकदा दुर्वास ऋषींचा अपमान केला. दुर्वास ऋषींनी त्याला शाप दिला. शाम्बचे गर्वहरण झाले, परंतु ऋषींच्या शापामुळे त्याला कुष्ठरोग झाला. या रोगातून बरे होण्यासाठी त्याने दुर्वास ऋषींकडे उ:शाप मागितला. ऋषिंनी त्याला क्षमा दिली आणि सूर्याची उपासना करायला सांगितली. तसेच अचला सप्तमीचे व्रत करायला सांगितले. या व्रताचरणामुळे शाम्ब कुष्ठरोगातून मुक्त झाला. म्हणून या सप्तमीला आरोग्य सप्तमी म्हणूनही ओळखतात.