शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हनुमंताचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, असे प्रभू श्रीराम का म्हणाले जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 08:00 IST

सदर कथा वाचल्यावर आपल्याला लक्षात येईल की भक्त भगवंताच्या ऋणात राहणे पसंत करतो की भगवंत भक्ताच्या ऋणात राहणे पसंत करतो.

प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमंत आणि समस्त वानरसेना रावणाला पराजित करून अयोध्येत परत आली. तेव्हा, अयोध्यावासीयांनी उत्सव साजरा केला, जल्लोश केला, गुढ्या उभारल्या, रांगोळ्या काढल्या आणि आपल्या रघुरायाचे आणि सीतामाईचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. प्रेमाने भारावलेल्या सीतामाईला त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असे वाटले. तिने आपला मनोदय रामरायासमोर मांडला आणि त्यांनी होकार दिल्यावर एक भेट समारंभ आयोजित केला. समस्त वानरसेना, अयोध्यावासी या समारंभात सहभागी झाले होते. प्रत्येकाची वैयक्तिक भेट घेऊन सीतामाई आणि रामरायांनी त्यांना भेटवस्तू देऊ केली. 

या समारंभात हनुमंतदेखील उपस्थित होते. मात्र, त्यांचे समारंभात अजिबात लक्ष नव्हते. ते एका झाडावर फळ खात बसले होते. अचानक सीतामाईच्या लक्षात आले, जवळपास सर्वांना भेटवस्तू देऊन झाल्या, मात्र या कार्यात ज्याचा सिंहाचा वाटा होता, त्या हनुमंताला आपण काहीच भेट दिली नाही. सीतामाईने रामरायाला ही बाब सांगितली व हनुमंताला काय भेट द्यावी अशी विचारणा केली. त्यावर रामराय निरुत्तर झाले. ते म्हणाले, `हनुमंताचे आपल्यावर एवढे उपकार आहेत, की आपल्या प्राणांची कुडी जरी दिली, तरी त्याचे उपकार फिटणार नाहीत. सीतामाईलाही ती बाब पटली. तरीदेखील, सीतामाईला भेटवस्तू देण्याचा मोह आवरला नाही. तिने हनुमंताला बोलावून घेतले. 

आज्ञा मिळताच, पुढच्याच क्षणी हनुमंत समोर हजर. त्यांनी सीतामाई आणि रामरायाला वंदन केले आणि 'काय आज्ञा' अशी विचारणा केली. सीतामाईने थेट मुद्द्याचे बोलून आपल्या गळ्यातला, माहेरहून मिळालेला, अतिशय मौलिक असा नवरत्नांचा हार हनुमंताला भेट म्हणून दिला. `या हाराचे मी काय करणार?' असा विचार येत हनुमंताने रामरायाकडे पाहिले. सीतेचा आग्रह मोडू नकोस, या भेटीचा स्वीकार कर, असे रामरायाने नजरेतूनच सांगितले. हनुमंताने तसे केलेही. 

भेटवस्तू स्वीकारून हनुमंत पुन्हा झाडावर जाऊन बसले. त्यांनी पुनश्च हाराकडे निरखून पाहिले. हारातली रत्ने चमचमत होती. आकर्षक दिसत होती. परंतु, त्या रत्नांमध्ये मारुतीरायाला आपलीच प्रतिमा दिसत होती. कदाचित रत्नाच्या आतमध्ये रामराय असतील, अशा विचाराने हनुमंताने एक एक रत्न दाताने फोडून बघायला सुरुवात केली. सीतामाईने कुतुहलाने कटाक्ष टाकला. तिला वाटले होते, हनुमंत आपण दिलेल्या भेटवस्तूचा स्वीकार करून, सर्वत्र मिरवेल. मात्र, चित्र काही भलतेच होते. 

केवळ नवरत्न फोडल्याचे दु:ख नव्हते. तो हार माहेरून मिळालेला असल्याने, स्वाभाविकच हाराची किंमत चौपट होती. त्याची अशी विल्हेवाट लागत असताना पाहून सीतामाईने थोडं रागात आणि थोडं नाराजीत हनुमंताला प्रश्न विचारला, `हनुमंता भेटवस्तू आवडली नव्हती, तर तसे सांगायचे ना. दुसरे काहीतरी दिले असते. पण तू, हे असे वागलेले मला अजिबात आवडले नाही. 

मातेची क्षमा मागून हनुमंत म्हणाले, `रावणाविरुद्ध लढणे, त्याचा पराभव करणे आणि आपल्या स्वामींच्या कार्याला हातभार लावणे, ही सेवक म्हणून माझी जबाबदारीच होती. ते काही उपकार नव्हेत. म्हणून मी समारंभात असूनही अलिप्त बसून होतो. आपण मला भेटवस्तू देऊ केली. ती खरोखरीच अपूर्व होती. परंतु, ती नीट निरखून पाहिल्यावर लक्षात आले, की त्यात माझे रामराय नाहीत. त्यांच्या शोधार्थ मी प्रत्येक रत्न फोडून माझे नररत्न आढळते का, याचा शोध घेत होतो. 

हनुमंताच्या स्पष्टीकरणावर प्रतिप्रश्न करत मातेने विचारले, 'तुला त्या हारात रामराय दिसले नाहीत, म्हणून ती तोडून टाकलीस. मात्र, तू  एवढा रामनाम घेत असतोस, मग तुझ्या हृदयात तरी राम आहे का?'

त्याक्षणी हनुमंताने उठून मातेला वंदन केले, रघुरायाचे स्मरण केले आणि आपली छाती फाडून हृदयस्थ परमेश्वर असलेले रामपंचायतनाचे दर्शन घडवले. ते पाहून सीतामाईला आश्चर्य वाटले आणि कुतुहलही. हनुमंताच्या रामभक्तीची तिला जाणीव झाली. सीतामाई आणि रामरायाने हनुमंताला `चिरंजीवी भव' असा आशीर्वाद दिला. तेव्हापासून आजतागायत चिरंजीवी हनुमंतांच्या रामभक्तीचे दाखले दिले जातात. त्यांच्या रामभक्तीचा अंश आपल्यातही उतरावा, अशी प्रार्थना करूया आणि म्हणूया,

सीयावर रामचंद्र की जय।पवनसुत हनुमान की जय।बोलो रे भाई, सब संतन की जय।

टॅग्स :ramayanरामायण