शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल, अशी एकमेव व्यक्ती कोण आहे, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 08:00 IST

एखाद्या गोष्टीचा शोध घेत आपण गावभर फिरतो, दुसऱ्यांचे मार्गदर्शन घेतो, सल्ले घेतो, पण मनाचा कौल घ्यायला विसरतो.

थोरामोठ्यांच्या म्हणण्यानुसार, माणसाला सतत प्रश्न पडत राहणे, हे प्रगतीचे लक्षण आहे. परंतु आपण जस जसे मोठे होत जातो, तसतसे आपले कुतूहल वाढण्याऐवजी कमी कमी होत जाते. आपण आपल्या बुद्धीचा वापर कमी करतो आणि सांगकाम्यासारखे इतर सांगतील त्याचे अनुकरण करतो. त्यामुळे अनेक प्रश्न मनातल्या मनात विरून जातात किंवा अनुत्तरित राहतात. परंतु, अशी एक व्यक्ती आहे, जी आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर देऊ शकते. ती व्यक्ती कोण, ते या कथेतून जाणून घेऊया.

एक शिष्य भगवान बुद्धांजवळ आला आणि म्हणाला, `भगवान, मला एका प्रश्नाचे उत्तर हवे आहे. आपले मन शांत कसे ठेवावे?'भगवान सांगतात, `मी आता एका कामात व्यस्त आहे, तू आश्रमातल्या दुसऱ्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला जाऊन हा प्रश्न विचार.'शिष्य जातो. वयाने आणि अनुभवाने मोठे असलेल्या एका व्यक्तीला तोच प्रश्न विचारतो. ती व्यक्ती सांगते, `माझे सकाळपासून डोके दुखत आहे. आता मी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. तू आणखी कोणाकडे जा. तुला उत्तर मिळेल.'शिष्य आणखी एक-दोघांना जाऊन भेटतो. पण सगळ्यांची आज अचानक डोकेदुखी, पोटदुखी, मानदुखी वाढलेली असते. शिष्य वैतागून भगवान बुद्धांजवळ येतो आणि सांगतो, `भगवान, आपल्या सांगण्यानुसार आश्रमातल्या तीन ज्येष्ठ व्यक्तींजवळ गेलो. तिघांनीही कारणे देऊन मला परतावून लावले. आता मी कोणाकडे जाऊ? म्हणून तुमच्याकडे परत आलो.'

भगवान म्हणतात, `अरे, त्या तिघांनी तुला उत्तर दिले, पण तूलाच ते कळले नाही. तिघे त्यांच्या व्यापात असल्याने त्यांनी सांगितले, तू आणखी कोणाकडे जा. ही व्यक्ती आणखी कोणी नसून, ती तू आहेस. तुझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला लोकांकडे वेळ नाही. तुझी उत्तरे तुलाच शोधायची आहेत. आणि तुला ती निश्चित मिळतील. यासाठी तुला तुझ्या अंतर्मनात डोकावले पाहिजे. आत्मसंवाद साधला पाहिजे. मनाचा आवाज ऐकला पाहिजे. ते शिकलास, की तुला तुझी उत्तरे मिळू लागतील.'

संत तुकाराम आपल्या अभंगात म्हणतात त्याप्रमाणे, `तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलासी!' आपल्या प्रश्नांचा शोध आपण स्वत:मध्ये घेतला पाहिजे. स्वत:ला समजून घेतले पाहिजे. दुसरे सांगतात म्हणून नाही, तर कोणतीही गोष्ट आपल्याला पटत आहे का याची शाहनिशा केली पाहिजे. 

एखाद्या गोष्टीचा शोध घेत आपण गावभर फिरतो, दुसऱ्यांचे मार्गदर्शन घेतो, सल्ले घेतो, पण मनाचा कौल घ्यायला विसरतो. दिवसभरातील काही क्षण जर स्वत:शी हितगुज केली नाही, तर फार मोठा संवाद आपण गमावत आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे. कारण, सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी ती व्यक्ती दुसरी कोणी नसून आपण स्वत:च असतो!'