शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल, अशी एकमेव व्यक्ती कोण आहे, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 08:00 IST

एखाद्या गोष्टीचा शोध घेत आपण गावभर फिरतो, दुसऱ्यांचे मार्गदर्शन घेतो, सल्ले घेतो, पण मनाचा कौल घ्यायला विसरतो.

थोरामोठ्यांच्या म्हणण्यानुसार, माणसाला सतत प्रश्न पडत राहणे, हे प्रगतीचे लक्षण आहे. परंतु आपण जस जसे मोठे होत जातो, तसतसे आपले कुतूहल वाढण्याऐवजी कमी कमी होत जाते. आपण आपल्या बुद्धीचा वापर कमी करतो आणि सांगकाम्यासारखे इतर सांगतील त्याचे अनुकरण करतो. त्यामुळे अनेक प्रश्न मनातल्या मनात विरून जातात किंवा अनुत्तरित राहतात. परंतु, अशी एक व्यक्ती आहे, जी आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर देऊ शकते. ती व्यक्ती कोण, ते या कथेतून जाणून घेऊया.

एक शिष्य भगवान बुद्धांजवळ आला आणि म्हणाला, `भगवान, मला एका प्रश्नाचे उत्तर हवे आहे. आपले मन शांत कसे ठेवावे?'भगवान सांगतात, `मी आता एका कामात व्यस्त आहे, तू आश्रमातल्या दुसऱ्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला जाऊन हा प्रश्न विचार.'शिष्य जातो. वयाने आणि अनुभवाने मोठे असलेल्या एका व्यक्तीला तोच प्रश्न विचारतो. ती व्यक्ती सांगते, `माझे सकाळपासून डोके दुखत आहे. आता मी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. तू आणखी कोणाकडे जा. तुला उत्तर मिळेल.'शिष्य आणखी एक-दोघांना जाऊन भेटतो. पण सगळ्यांची आज अचानक डोकेदुखी, पोटदुखी, मानदुखी वाढलेली असते. शिष्य वैतागून भगवान बुद्धांजवळ येतो आणि सांगतो, `भगवान, आपल्या सांगण्यानुसार आश्रमातल्या तीन ज्येष्ठ व्यक्तींजवळ गेलो. तिघांनीही कारणे देऊन मला परतावून लावले. आता मी कोणाकडे जाऊ? म्हणून तुमच्याकडे परत आलो.'

भगवान म्हणतात, `अरे, त्या तिघांनी तुला उत्तर दिले, पण तूलाच ते कळले नाही. तिघे त्यांच्या व्यापात असल्याने त्यांनी सांगितले, तू आणखी कोणाकडे जा. ही व्यक्ती आणखी कोणी नसून, ती तू आहेस. तुझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला लोकांकडे वेळ नाही. तुझी उत्तरे तुलाच शोधायची आहेत. आणि तुला ती निश्चित मिळतील. यासाठी तुला तुझ्या अंतर्मनात डोकावले पाहिजे. आत्मसंवाद साधला पाहिजे. मनाचा आवाज ऐकला पाहिजे. ते शिकलास, की तुला तुझी उत्तरे मिळू लागतील.'

संत तुकाराम आपल्या अभंगात म्हणतात त्याप्रमाणे, `तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलासी!' आपल्या प्रश्नांचा शोध आपण स्वत:मध्ये घेतला पाहिजे. स्वत:ला समजून घेतले पाहिजे. दुसरे सांगतात म्हणून नाही, तर कोणतीही गोष्ट आपल्याला पटत आहे का याची शाहनिशा केली पाहिजे. 

एखाद्या गोष्टीचा शोध घेत आपण गावभर फिरतो, दुसऱ्यांचे मार्गदर्शन घेतो, सल्ले घेतो, पण मनाचा कौल घ्यायला विसरतो. दिवसभरातील काही क्षण जर स्वत:शी हितगुज केली नाही, तर फार मोठा संवाद आपण गमावत आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे. कारण, सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी ती व्यक्ती दुसरी कोणी नसून आपण स्वत:च असतो!'