शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

मृत्यूनंतर गरुड पुराण का ऐकतात किंवा वाचतात, जाणून घ्या त्यामागील कारणं... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 13:56 IST

गरुड पुराणात आपल्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सखोलतेने सांगितल्या आहेत. प्रत्येकाला याबद्दल माहित असणे आवश्यक आहे.

हिंदू धर्मानुसार, जेव्हा एखाद्याच्या घरात मरण येते तेव्हा त्या घरात १३ दिवस गरुड पुराणाचे वाचन केले जाते. शास्त्रांनुसार एखादा देह मृत्यू पावल्यावर आत्मा त्वरित दुसऱ्या देहात प्रवेश करतो आणि नवा जन्म घेतो. काहींना 3 दिवस लागतात, काहींना १०-१३ दिवस लागतात. हा प्रवास त्रासदायक होऊ नये आणि आत्म्याला योग्य गती मिळावी म्हणून मृतात्म्यासाठी गरुड पुराणाचे वाचन केले जाते. हे वाचन केवळ मृतात्म्यासाठी नाही, तर आपणा सर्वांना मृत्यपश्चात ताप सहन करावा लागू नये, यासाठी तो वस्तुपाठ आहे. यावरून आपल्या पूर्वजांचा दूरदृष्टीकोन किती वाखाणण्यासारखा आहे ते पहा. गर्भधारणा होण्यापासून अर्थात नवीन जीव निर्माण होण्यापासून त्याच्या अंतिम प्रवासापर्यंतचा, नव्हे तर पुढच्या जन्माचाही विचार आणि कृती पूर्वजांनी करून ठेवली आहे. आपल्याला केवळ त्यानुसार आचरण करायचे आहे. 

गरुड पुराण म्हणजे काय, हे आधी जाणून घेऊ. 

एकदा गरुडाने भगवान विष्णूंना प्राणांच्या मृत्यूविषयी यमलोक यात्रा, नरक-योनी आणि मोक्ष याविषयी अनेक गूढ आणि रहस्यमय प्रश्न विचारले. भगवान विष्णूंनी या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. त्या प्रश्न आणि उत्तरांची मालिका म्हणजे गरुड पुराण!

हे एखाद्याच्या मृत्यूपश्चातच का वाचावे? तर... 

१. गरुण पुराणात मृत्यूच्या आधी आणि नंतरची परिस्थिती वर्णन केली आहे. म्हणूनच हे मृतात्म्याला गती मिळावी म्हणून वाचले जाते. 

२. मृत्यूनंतरही १३ दिवस मृतात्मा आपल्या प्रियजनांमध्ये राहतो अशी श्रद्धा आहे. त्या आत्म्याला पुढची दिशा कळावी यासाठी गरुड पुराणानुसार स्वर्ग-नरक, वेग, मोक्ष, गती, अधोगति इत्यादी गोष्टींची माहिती वाचली जाते. 

३. पुढील प्रवासात त्याला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे, याची माहिती त्यात दिलेली असते. 

४. मृत्यूनंतर घरात जेव्हा गरुड पुराणाचे पठण होते तेव्हा मृतात्म्याच्या निमित्ताने जिवंत असलेले की काय वाईट आहे आणि कोणत्या प्रकारच्या नातेवाईक, आप्तजन यांनाही पुढच्या प्रवासाची कल्पना येते. पुढच्यास ठेच मागचा शहाणा व्हावा, यादृष्टीनेही गरुड पुराणाचे वाचन केले जाते. चांगले कर्म केले तर मोक्ष मिळतो अन्यथा पुढचा खडतर प्रवास भोगावा लागतो. 

५. गरुड पुराण आपल्याला सत्कर्मासाठी प्रेरणा देते. मोक्ष केवळ सत्कर्म आणि सुमतीने प्राप्त होतो.

६. गरुड पुराणात व्यक्तीच्या कर्माच्या आधारे शिक्षेच्या रूपात विविध गोष्टी आढळतात. गरुड पुराणानुसार भगवान विष्णूंनी कोणत्या गोष्टी व्यक्तीला कशा पद्धतीने तारुन नेतील, याचे सविस्तर वर्णन त्यात दिले आहे. 

७. गरुड पुराणात आपल्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सखोलतेने सांगितल्या आहेत. प्रत्येकाला याबद्दल माहित असणे आवश्यक आहे. गरुड पुराणातील आत्म-ज्ञानाचे प्रवचन हा मुख्य भाग आहे. गरुड पुराणातील एकोणीस हजार श्लोकांपैकी सात हजार श्लोकामध्ये ज्ञान, धर्म, धोरण, रहस्य, व्यावहारिक जीवन, स्वत: स्वर्ग, नरक आणि इतर जगाचे वर्णन केले आहे.

८. त्यामध्ये भक्ती, ज्ञान, विस्मृती, पुण्य, निश्चम कर्माच्या वैभवाने, अनेक वैश्विक आणि इतर जगातील फळ यज्ञ, दान, तप तीर्थ अशा शुभ कर्मांमध्ये सर्व सामान्य लोकांना जागृत करण्याचे वर्णन केले गेले आहेत. या सर्व गोष्टी जाणून घेतल्यामुळे मृतात्मा आणि त्याचे कुटुंब यातून बोध घेऊ शकतात, अशी त्यामागे भावना असते. 

९. याव्यतिरिक्त, आयुर्वेद, नितारसारा इत्यादी विषयांच्या वर्णनासह मृत जीवाच्या शेवटच्या वेळी केलेल्या क्रियांचा तपशील त्यात वर्णन केलेला असतो.

१०. असे म्हटले जाते की केवळ गरुड पुराणाचे पठण ऐकून मृत आत्म्यास शांती मिळते आणि तारणाचा मार्ग माहित मिळतो. आपल्या सर्व वेदना विसरल्यानंतर, तो प्रभूच्या मार्गावर चालतो आणि मोक्ष प्राप्त करतो, एकतर पितृलोकाकडे जातो किंवा एखाद्या योनीत  पुन्हा जन्माला येतो. त्याला भूत म्हणून भटकण्याची गरज नाही, यासाठी गरुड पुराणाचे वाचन केले जाते.