शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

मनात टोकाचे विचार येतातेत? थांबा! लवकरच परिस्थिती बदलणार आहे! - सद्गुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 14:12 IST

उद्विग्न मनस्थिती असलेल्या व्यक्तीच्या मनात प्रचंड संताप असतो. हा राग  दोन प्रकारे उफाळू शकतो. एक राग स्वत:सकट इतरांचा सर्वनाश करतो आणि दुसरा राग ऊर्जेचे रूप धारण करून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सगळे प्रयत्न पणाला लावतो.

जेव्हा व्यक्ती अपयशाने खचते, तेव्हा ती आतून पूर्णपणे कोलमडून गेलेली असते का? स्वत:ला सावरणे नाहीतर कोलमडू देणे, हे सर्वस्वी आपल्या हाती असते. कोणीही बाहेरील व्यक्ती आपल्याला तोडू शकत नाही. यासाठी आपले विचार, मन, प्रयत्न यांचा पाया भक्कम असायला हवा. हातून निसटून गेलेल्या संधीचा फार विचार करू नका. या गोष्टी चांगल्यासाठीच घडल्या, याची प्रचिती कदाचित भविष्यात येईल. म्हणून परिस्थिती कशीही असो, तुम्ही खंबीर व्हा. वेळ सारखी नसते, ती बदलत राहते. कठीणात कठीण प्रसंगातून बाहेर काढण्याची ताकद बदलत्या वेळेत असते. तोवर आपल्याला संयम ठेवता यायला हवा.

उद्विग्न मनस्थिती असलेल्या व्यक्तीच्या मनात प्रचंड संताप असतो. हा राग  दोन प्रकारे उफाळू शकतो. एक राग स्वत:सकट इतरांचा सर्वनाश करतो आणि दुसरा राग ऊर्जेचे रूप धारण करून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सगळे प्रयत्न पणाला लावतो. आपल्याला दुसऱ्या प्रकारे रागाचे नियोजन करायचे आहे.  त्यासाठी रागाच्या भरात अपशब्द निघणार नाहीत ना, याची काळजी घ्या. कारण, वेळ बदलते, माणसे बदलतात पण शब्द राहून जातात. 

रागाच्या भरात कितीही टोकाचे विचार आले, तरी ते विचार कागदावर उतरवून काढा. आज ना उद्या परिस्थिती बदलणार आहे. असेही त्या कागदावर लिहा. त्या संकटकाळात बाकी कोणीही सोबत नसले, तरी तुम्हाला स्वत:ची साथ भक्कम आहे, असा आत्मविश्वास वाटायला हवा. जोवर तुम्ही स्वत: हार मानत नाही, तोवर कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही. 

मृत्यू हा संकटातून सुटण्याचा मार्ग नाही. खरी मजा संकटांना तोंड देण्यात आहे. मृत्यूतून तुमची सुटका होईलही, परंतु तुमच्या पश्चात तुमच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली जाईल आणि त्याचे स्पष्टीकरण द्यायला तुम्ही अस्तित्त्वात नसाल आणि विनाकारण घरच्यांना तो त्रास सहन करावा लागेल. हा आत्मक्लेश तुमच्याबरोबर अनेकांना मरणयातना देणारा ठरेल. त्यापेक्षा काही काळ थांबा. टोकाचे विचार आले, तरी येऊद्या. विचार येतील आणि जातील. तुम्हाला वैचारिक वादळात अढळपणे उभे राहायचे आहे, हे लक्षात ठेवा. तुमची अपयशगाथा उद्याची यशोगाथा होणार आहे. तुम्ही दिलेला लढा दुसऱ्या कोणासाठी भविष्यात प्रेरणादायी ठरेल. 

म्हणून खचून जाऊ नका. कितीही राग आला, संकट आले तरी डगमगू नका. प्रतिक्रिया देऊ नका. ते वादळ निघून गेले, की मग पुनश्च हरी ओम म्हणत नव्याने सुरुवात करा. एका अपयशाने आयुष्य कधीच संपत नाही. दुसरी संधी आपली वाट पाहत असते. ती संधी ओळखा आणि आत्मविश्वासाने कामाला लागा.