शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
8
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
9
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
10
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
12
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
13
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
14
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
15
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
16
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
17
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
18
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
19
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
20
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
Daily Top 2Weekly Top 5

मनात टोकाचे विचार येतातेत? थांबा! लवकरच परिस्थिती बदलणार आहे! - सद्गुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 14:12 IST

उद्विग्न मनस्थिती असलेल्या व्यक्तीच्या मनात प्रचंड संताप असतो. हा राग  दोन प्रकारे उफाळू शकतो. एक राग स्वत:सकट इतरांचा सर्वनाश करतो आणि दुसरा राग ऊर्जेचे रूप धारण करून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सगळे प्रयत्न पणाला लावतो.

जेव्हा व्यक्ती अपयशाने खचते, तेव्हा ती आतून पूर्णपणे कोलमडून गेलेली असते का? स्वत:ला सावरणे नाहीतर कोलमडू देणे, हे सर्वस्वी आपल्या हाती असते. कोणीही बाहेरील व्यक्ती आपल्याला तोडू शकत नाही. यासाठी आपले विचार, मन, प्रयत्न यांचा पाया भक्कम असायला हवा. हातून निसटून गेलेल्या संधीचा फार विचार करू नका. या गोष्टी चांगल्यासाठीच घडल्या, याची प्रचिती कदाचित भविष्यात येईल. म्हणून परिस्थिती कशीही असो, तुम्ही खंबीर व्हा. वेळ सारखी नसते, ती बदलत राहते. कठीणात कठीण प्रसंगातून बाहेर काढण्याची ताकद बदलत्या वेळेत असते. तोवर आपल्याला संयम ठेवता यायला हवा.

उद्विग्न मनस्थिती असलेल्या व्यक्तीच्या मनात प्रचंड संताप असतो. हा राग  दोन प्रकारे उफाळू शकतो. एक राग स्वत:सकट इतरांचा सर्वनाश करतो आणि दुसरा राग ऊर्जेचे रूप धारण करून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सगळे प्रयत्न पणाला लावतो. आपल्याला दुसऱ्या प्रकारे रागाचे नियोजन करायचे आहे.  त्यासाठी रागाच्या भरात अपशब्द निघणार नाहीत ना, याची काळजी घ्या. कारण, वेळ बदलते, माणसे बदलतात पण शब्द राहून जातात. 

रागाच्या भरात कितीही टोकाचे विचार आले, तरी ते विचार कागदावर उतरवून काढा. आज ना उद्या परिस्थिती बदलणार आहे. असेही त्या कागदावर लिहा. त्या संकटकाळात बाकी कोणीही सोबत नसले, तरी तुम्हाला स्वत:ची साथ भक्कम आहे, असा आत्मविश्वास वाटायला हवा. जोवर तुम्ही स्वत: हार मानत नाही, तोवर कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही. 

मृत्यू हा संकटातून सुटण्याचा मार्ग नाही. खरी मजा संकटांना तोंड देण्यात आहे. मृत्यूतून तुमची सुटका होईलही, परंतु तुमच्या पश्चात तुमच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली जाईल आणि त्याचे स्पष्टीकरण द्यायला तुम्ही अस्तित्त्वात नसाल आणि विनाकारण घरच्यांना तो त्रास सहन करावा लागेल. हा आत्मक्लेश तुमच्याबरोबर अनेकांना मरणयातना देणारा ठरेल. त्यापेक्षा काही काळ थांबा. टोकाचे विचार आले, तरी येऊद्या. विचार येतील आणि जातील. तुम्हाला वैचारिक वादळात अढळपणे उभे राहायचे आहे, हे लक्षात ठेवा. तुमची अपयशगाथा उद्याची यशोगाथा होणार आहे. तुम्ही दिलेला लढा दुसऱ्या कोणासाठी भविष्यात प्रेरणादायी ठरेल. 

म्हणून खचून जाऊ नका. कितीही राग आला, संकट आले तरी डगमगू नका. प्रतिक्रिया देऊ नका. ते वादळ निघून गेले, की मग पुनश्च हरी ओम म्हणत नव्याने सुरुवात करा. एका अपयशाने आयुष्य कधीच संपत नाही. दुसरी संधी आपली वाट पाहत असते. ती संधी ओळखा आणि आत्मविश्वासाने कामाला लागा.