शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अपेक्षा हे दु:खाचे मूळ आहे; ते समूळ नष्ट कसे करता येईल, पहा! -गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 15:42 IST

जोवर आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करत राहू तोवर आपण दु:खीच राहणार आहोत.

अपेक्षा ठेवली की उपेक्षा पदरात येते, हे माहीत असूनसुद्धा आपण पदोपदी अपेक्षांचे ओझे वाहत असतो. कोणी कसे वागावे, कोणाशी कसे बोलावे, कोणी आपल्याशी कसे बोलावे, आपल्याला काय आवडेल असे करावे? अशा सगळ्या गोष्टींचे वलय एका जागी येऊन थांबते, ते म्हणजे मी. आपल्या अपेक्षा या केवळ एका बाजूने केलेल्या विचारावर अवलंबून असतात. 

वास्तविक पाहता कोणी कसे वागावे हे आपण ठरवू शकत नाही. आपण कसे वागावे हे मात्र आपण ठरवू शकतो. जोवर आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करत राहू तोवर आपण दु:खीच राहणार आहोत. कारण आपले सुख दु:खाचे नियंत्रण आपण कळत नकळत दुसऱ्याच्या हाती सोपवतो. व्यक्ती, परिस्थिती आपल्या मतानुसार घडली, की आपण खुष आणि मनाविरुद्ध घडली, की आपण दु:खी! 

जोपर्यंत आपण स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी स्वत:च्या अपेक्षांवर खरे उतरत नाही, तोवर आपण दुसऱ्यांवर सतत अवलंबून राहू. जगातली प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या आनंदाचा शोध घेत धडपडत आहे. तिने आपल्या आनंदासाठी झटावे ही अपेक्षा चुकीची आहे. म्हणून अपेक्षांचे दु:खं टाळायचे असेल, तर सर्वात आधी कोणी आपल्यासाठी काही करेल, केले पाहिजे, करत होते हा विषय टाळा. आपण आपल्यासाठी काय करू शकतो, स्वत:ला सुखी, आनंदी, समाधानी ठेवण्यासाठी आजवर आपण काय काय केले, याचे चिंतन होणे जरूरी आहे. 

कोणी आपल्याला आनंदी ठेवणं, हे आपल्या हातात नाही,परंतु दुसऱ्यांना हाती ठेवणं आपल्या हातात आहे.कोणी आपल्याला मदत करेल, हे आपल्या हातात नाही,परंतु, दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणं, आपल्या हातात आहे.कोणी आपल्यावर प्रेम करावं, हे आपल्या हाती नाही,परंतु दुसऱ्यांवर अकारण प्रेम करणं, हे आपल्या हातात आहे. 

सुख देण्यात आहे. सुख मिळेल ही अपेक्षा दु:खंदायी आहे.म्हणून सुखाची अपेक्षा करत त्याच्या मागे धावू नका. सुख, आनंद, प्रोत्साहन इतरांना देत राहा, त्याचा आनंद तुम्हालाही नक्की मिळेल.फुलं देवाला वाहिली, तरीदेखील त्याचा परिमळ जसा आपल्या हाताला चिकटून राहतो, तसा सत्कर्माचा परिमळ आपल्या आयुष्यात सदैव दरवळत राहतो.