शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

अपेक्षा हे दु:खाचे मूळ आहे; ते समूळ नष्ट कसे करता येईल, पहा! -गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 15:42 IST

जोवर आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करत राहू तोवर आपण दु:खीच राहणार आहोत.

अपेक्षा ठेवली की उपेक्षा पदरात येते, हे माहीत असूनसुद्धा आपण पदोपदी अपेक्षांचे ओझे वाहत असतो. कोणी कसे वागावे, कोणाशी कसे बोलावे, कोणी आपल्याशी कसे बोलावे, आपल्याला काय आवडेल असे करावे? अशा सगळ्या गोष्टींचे वलय एका जागी येऊन थांबते, ते म्हणजे मी. आपल्या अपेक्षा या केवळ एका बाजूने केलेल्या विचारावर अवलंबून असतात. 

वास्तविक पाहता कोणी कसे वागावे हे आपण ठरवू शकत नाही. आपण कसे वागावे हे मात्र आपण ठरवू शकतो. जोवर आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करत राहू तोवर आपण दु:खीच राहणार आहोत. कारण आपले सुख दु:खाचे नियंत्रण आपण कळत नकळत दुसऱ्याच्या हाती सोपवतो. व्यक्ती, परिस्थिती आपल्या मतानुसार घडली, की आपण खुष आणि मनाविरुद्ध घडली, की आपण दु:खी! 

जोपर्यंत आपण स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी स्वत:च्या अपेक्षांवर खरे उतरत नाही, तोवर आपण दुसऱ्यांवर सतत अवलंबून राहू. जगातली प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या आनंदाचा शोध घेत धडपडत आहे. तिने आपल्या आनंदासाठी झटावे ही अपेक्षा चुकीची आहे. म्हणून अपेक्षांचे दु:खं टाळायचे असेल, तर सर्वात आधी कोणी आपल्यासाठी काही करेल, केले पाहिजे, करत होते हा विषय टाळा. आपण आपल्यासाठी काय करू शकतो, स्वत:ला सुखी, आनंदी, समाधानी ठेवण्यासाठी आजवर आपण काय काय केले, याचे चिंतन होणे जरूरी आहे. 

कोणी आपल्याला आनंदी ठेवणं, हे आपल्या हातात नाही,परंतु दुसऱ्यांना हाती ठेवणं आपल्या हातात आहे.कोणी आपल्याला मदत करेल, हे आपल्या हातात नाही,परंतु, दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणं, आपल्या हातात आहे.कोणी आपल्यावर प्रेम करावं, हे आपल्या हाती नाही,परंतु दुसऱ्यांवर अकारण प्रेम करणं, हे आपल्या हातात आहे. 

सुख देण्यात आहे. सुख मिळेल ही अपेक्षा दु:खंदायी आहे.म्हणून सुखाची अपेक्षा करत त्याच्या मागे धावू नका. सुख, आनंद, प्रोत्साहन इतरांना देत राहा, त्याचा आनंद तुम्हालाही नक्की मिळेल.फुलं देवाला वाहिली, तरीदेखील त्याचा परिमळ जसा आपल्या हाताला चिकटून राहतो, तसा सत्कर्माचा परिमळ आपल्या आयुष्यात सदैव दरवळत राहतो.