शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'जो बोले सो निहाल, सत श्री अकाल' असा जयघोष करणारे गुरु गोविंद सिंह यांचे अनुकरणीय विचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 13:11 IST

आज गुरु गोविंद सिंह यांची जयंती,  त्यांच्या धर्म विचारांचे आजही शीख बांधव कट्टरतेने पालन करतात, ते विचार आपणही जाणून घेऊ. 

शिखांचे दहावे धर्मगुरु, कवी, योद्धा, तत्ववेत्ता आणि मार्गदर्शक गुरु गोविंद सिंह यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म पटना येथे झाला. तिथे त्यांनी शिखांचे धर्मस्थळ गुरुद्वारा उभारले होते. तिथेच त्यांनी गुरुग्रंथ साहेब याला धर्मग्रंथ म्हणून मान्यता दिली. आजही शीख बांधव त्यांच्या विचारांचे पालन करतात.

सेवेत वाहून घ्या : आपले आयुष्य केवळ स्वत:साठी न जगता इतरांच्या सेवेत घालवा. गोरगरिबांना मदत करा. अडल्या-नडलेल्यांची विचारपूस करा. आत्मकेंद्री न होता, समाजभिमुख व्हा.  

गुरुबानी पाठ करा : आपल्या जीभेला चांगले वळण लावायचे असेल, तर स्तोत्रपठणाला पर्याय नाही. गुरु गोविंदांनी शीख बांधवांना गुरुबानीचा मंत्र दिला, तसा आपणही रामरक्षा, मारुतीस्तोत्र, गीता, गीताई मुखोद्गत करून रोज पठण करू शकतो. 

धर्माचे पालन करा : धर्म म्हणजे धारणा. प्रत्येकाचे जगण्याचे एक ध्येय असते. ते मिळवण्यासाठी कर्माची सांगण घालणे म्हणजे धर्माचे पालन करणे. हे पवित्र कार्य प्रामाणिकपणे केले पाहिजे. 

कामचुकारपणा नको : आपले काम ही आपली ओळख बनली पाहिजे. कामातील सातत्य आपल्याला परमेश्वराच्या सेवेचा आनंद देते. म्हणून जबाबदारी झटकू नका आणि कामचुकारपणाही करू नका. 

धन, तारुण्य आणि कुळाचा अभिमान बाळगू नका : या तीनही गोष्टींचा अभिमान बाळगणे व्यर्थ आहे. धन अर्थात लक्ष्मी चंचल आहे, तारुण्य क्षय होणारे आहे आणि कुळ ही तुमची ओळख नसून ते तुमच्या जन्माचे माध्यम आहे, ध्येय नाही.  

अपेयपान किंवा अभक्ष्यभक्षण करू नका : धर्माने आपल्याला हिंसा शिकवलेली नाही. म्हणून शाकाहाराचा अवलंब करा. तसेच मद्याचा पेला किंवा तंबाकू आदि व्यसनादि गोष्टींचे सेवन आयुष्य संपवून टाकते. त्यांच्या आहारी जाऊ नका. सात्विक पण सकस आहार करा आणि भरपूर व्यायाम करा.  

निंदा, चुगळी किंवा मत्सर करू नका : लोकांना कोणाच्याही पाठीमागे बोलण्याची सवय असते. असे बोलणे म्हणजे अप्रत्यक्षपणे दुसऱ्याचा अपमान करणे आहे. अपमान करणे हे पाप आहे. म्हणून कोणाबद्दल चांगले बोलता येत नसेल, तर गप्प राहा पण वाईट बोलू नका. 

शब्दाला जागा : आपल्या शब्दामुळे कोणाला दिलासा मिळणार असेल आणि दिलेला शब्द आपल्याला पूर्ण करता येणार असेल, तरच शब्द द्या आणि दिलेल्या शब्दाला जागा. अर्थात वचनपूर्ती करा. अन्यथा लोक तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत. 

अधर्मी लोकांना थारा देऊ नका : जे चूक आहे, त्याचा निषेध करा. ते असत्य आहे, त्याला विरोध करा. जो गुन्हा आहे, त्याला साम, दाम, दंड, भेद वापरून शिक्षा द्या आणि निरपराध्याला न्याय मिळवून द्या. 

आपल्या कमाईचा दहावा भाग दान द्या : आपल्या हाताला दानाची सवय लागावी आणि आपल्या संपत्तीचे योग्य चयन व्हावे, म्हणून दान करण्याची सवय लावा. जगात घेणारे हात अनेक आहेत, तुम्ही देणारे हात व्हा!