शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

जो नावडतो सर्वांना, तोही आवडे देवाला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 10:00 AM

देवाला साक्ष ठेवून प्रत्येक काम करावे. आपल्याकडे देवाचे लक्ष आहे, हे लक्षात ठेवून सदाचार म्हणजे चांगले काम सोडू नये. चांगल्या कामाची दखल कोणी घेवो न घेवा, भगवंत जरूर घेतो.

आपली सकाळ होते, तीच अलार्मने. डोळे उघडल्यावर दृष्टीस पडतो मोबाईल. जगभरातल्या गोष्टी, रोजची कामे, अनेक तऱ्हेचे व्याप मानगुटीवर येऊन बसतात. मन उद्विग्न होते. झोप पूर्ण होऊनही कामाचा ताण दिवसभर राहतो आणि कामात राम वाटत नाही. यासाठीच समर्थ रामदास स्वामी सांगतात,

प्रभाते मनी राम चिंतीत जावा,पुढे वैखरी राम आधी वदावा,सदाचार हा थोर सोडू नये तो,जनी तोचि तो मानवी धन्य होतो।

हेही वाचा : मनाचा कोपरा दररोज आवरा.

सकाळची वेळ अतिशय शांत असते. त्यातही पहाटे लवकर उठता आले, तर उत्तमच. अशा वेळी मन शांत असते. ती शांतता कायम ठेवण्यासाठी देवाचे नाम घ्यावे. त्याच्या स्मरणाने दिवसाची प्रसन्न सुरुवात करावी. देवाला साक्ष ठेवून प्रत्येक काम करावे. आपल्याकडे देवाचे लक्ष आहे, हे लक्षात ठेवून सदाचार म्हणजे चांगले काम सोडू नये. वाईट कर्माचे फळ वाईट असते. हे लक्षात ठेवून शक्य तेवढ्या चांगल्या गोष्टी करत राहाव्यात. या चांगल्या कामाची दखल कोणी घेवो न घेवा, भगवंत जरूर घेतो. आता हेच उदाहरण बघा ना...

समाजाने धिक्कारलेली एक मामूली स्त्री, राजवाड्यात चंदन उगाळणे हेच तिचे काम होते. इतके सुंदर चंदन उगाळणारी दुसरी कुणी नव्हतीच. कुणा एकासाठी पहाटे उठून भक्तीने नामस्मरण करीत चंदन उगाळणारी ती `कुब्जा' होती. रुपाचा लवलेश नसलेली, ठेंगणी, पोक असलेली काळी, अशी स्री कुणाला प्रिय असणार? तिची निष्ठा, नामस्मरण, सतत परमात्म्याचे चिंतन कोणाला कळणार? जग बाह्य सौंदर्याचे भोक्ते. तिच्या वाट्याला नुसती अवहेलना.

परंतु एका मध्यरात्री, राधेसकट सगळी मथुरा निद्रिस्त. यमुनासुद्धा संथ, अस्तित्व फक्त भणभणणाऱ्या वाऱ्याचे. आता कुब्जेच्या भक्तीला भगवान श्रीकृष्णाचे रूप आठवता आठवता, चिंतन करता करता उधाण आलं होते. तन, मन कशाकशाचे तिला भान राहिले नव्हते. एवढेच काय, अंधारही जणू तिच्या भक्तीला घाबरला.

अचानक डोळे मिटलेली ती भानावर आली. पैलतीरावरून मुकुंदाच्या पाव्याचे मंजूळ सूर कानी पडताच स्वत:ला सावरीत तिने समोर बघितले. क्षणातच तिचे जीवन धन्य झाले. कारण भगवान करुणाद्र्र नजरेने तिला सांगत होते, `हा वेणुनाद तुझ्यासाठी आहे. फक्त तुझ्यासाठी. तुझ्या निष्ठेचे फळ, तू मागितले नाहीस तरीही. आपली ही भेट.'

समाजाने अव्हेरलेली कुब्जा भगवंताना प्रिय होती. तिचे रूप त्याला दिसले नव्हते. दिसली होती, ती केवळ निष्ठा. धन्य ती कुब्जा, धन्य तिची भक्ती! आईला ज्याप्रमाणे आपली सगळी मुले सारखी आवडतात, तशी देवालाही आपली लेकरे प्रिय असतात. 

म्हणून आपणही देवाचे स्मरण मनात ठेवून आनंदाने आणि सदाचाराने सर्व कामे पार पाडावीत. एक ना एक दिवस आपल्यालाही भगवद्कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही.

हेही वाचा : एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण...