शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'अन्न हे पूर्णब्रह्म' हे माहित असूनही आपण अन्नसेवन करताना 'हे' महत्त्वाचे नियम पाळतो का? स्वतःला उत्तर द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 15:24 IST

आपण मुलांना शिस्त लावण्याचा आटोकाट प्रत्यत्न करतो, मात्र अनेक बाबतीत आपल्यालाच शिस्त लावून घेण्याची गरज जाणवते, जसे की हे नियम... 

'हेल्थ इज वेल्थ' अर्थात आरोग्य हीच संपत्ती आहे. आपले मन भगवंताच्या चरणी रुजू करायचे असेल, तर आरोग्याच्या कुरबूरी असून चालणार नाही. आरोग्य सुदृढ असेल, तर मन शांत राहील. यासाठी सर्व संतांनीदेखील आध्यात्माबरोबर आरोग्याला महत्त्व दिले. समर्थ रामदासांनी तर हनुमंताची देवळे उभारून त्याच्या शक्ती, युक्ती आणि भक्तीचा आदर्श घालून दिला. युवकांनी तर बलोपासना केलीच पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. आजचा समाज सशक्त आणि सुसंस्कृत घडवायचा असेल, तर व्यायाम, आध्यात्म याबरोबरच आपण जे अन्नग्रहण करतो, त्याबाबतीत महत्त्वाचे नियम पाळले पाहिजेत.

  • ताजे अन्न खावे.
  • मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू, तुरट या सहाही चवी जेवणात असाव्यात.
  • जेवणात चावून, फोडून खाण्यासारखे पदार्थ, चाटण्यासारखे, पिण्यासारखे पातळ पदार्थ याा समावेश असावा.
  • भूक लागल्यावरच जेवावे.
  • दोन जेवणांमध्ये किंवा खाण्यामध्ये किमान चार तासांचे अंतर असावे.
  • प्रत्येक घास चावून खावा.
  • जेवणात अधून मधून घोट घोट पाणी प्यावे.

 

  • जेवण तिखट, कडू, तुरट चवींनी संपवावे.
  • जेवण आंबट, गोड चवींनी सुरू करावे.
  • योग्य न्याहारी आणि दुपारचे जेवण घ्यावे. रात्रीचे जेवण हलके घ्यावे.
  • जेवताना काटेचमच्यांनी न जेवता हाताने जेवावे.
  • जेवणाआधी ईश्वराचे स्मरण करावे आणि सकस अन्न दिल्याबद्दल त्याचे आभार मानावेत. 
  • जेवण झाल्यावर ताटात एक थेंब सोडून आचमन करून भोजनयज्ञ पूर्ण करावा.
  • गोड आणि पचायला जड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत.
  • खाण्याच्या क्षमतेसनुसार दोन भाग घन द्रव्य, एक भाग पातळ द्रव्य, एक भाग मोकळा असे ताटाचे स्वरूप असावे.
  • शांतचित्ताने, न बोलता, सावकाश जेवून ताटाला नमस्कार करून मगच उठावे.
टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य