शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

'अन्न हे पूर्णब्रह्म' हे माहित असूनही आपण अन्नसेवन करताना 'हे' महत्त्वाचे नियम पाळतो का? स्वतःला उत्तर द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 15:24 IST

आपण मुलांना शिस्त लावण्याचा आटोकाट प्रत्यत्न करतो, मात्र अनेक बाबतीत आपल्यालाच शिस्त लावून घेण्याची गरज जाणवते, जसे की हे नियम... 

'हेल्थ इज वेल्थ' अर्थात आरोग्य हीच संपत्ती आहे. आपले मन भगवंताच्या चरणी रुजू करायचे असेल, तर आरोग्याच्या कुरबूरी असून चालणार नाही. आरोग्य सुदृढ असेल, तर मन शांत राहील. यासाठी सर्व संतांनीदेखील आध्यात्माबरोबर आरोग्याला महत्त्व दिले. समर्थ रामदासांनी तर हनुमंताची देवळे उभारून त्याच्या शक्ती, युक्ती आणि भक्तीचा आदर्श घालून दिला. युवकांनी तर बलोपासना केलीच पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. आजचा समाज सशक्त आणि सुसंस्कृत घडवायचा असेल, तर व्यायाम, आध्यात्म याबरोबरच आपण जे अन्नग्रहण करतो, त्याबाबतीत महत्त्वाचे नियम पाळले पाहिजेत.

  • ताजे अन्न खावे.
  • मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू, तुरट या सहाही चवी जेवणात असाव्यात.
  • जेवणात चावून, फोडून खाण्यासारखे पदार्थ, चाटण्यासारखे, पिण्यासारखे पातळ पदार्थ याा समावेश असावा.
  • भूक लागल्यावरच जेवावे.
  • दोन जेवणांमध्ये किंवा खाण्यामध्ये किमान चार तासांचे अंतर असावे.
  • प्रत्येक घास चावून खावा.
  • जेवणात अधून मधून घोट घोट पाणी प्यावे.

 

  • जेवण तिखट, कडू, तुरट चवींनी संपवावे.
  • जेवण आंबट, गोड चवींनी सुरू करावे.
  • योग्य न्याहारी आणि दुपारचे जेवण घ्यावे. रात्रीचे जेवण हलके घ्यावे.
  • जेवताना काटेचमच्यांनी न जेवता हाताने जेवावे.
  • जेवणाआधी ईश्वराचे स्मरण करावे आणि सकस अन्न दिल्याबद्दल त्याचे आभार मानावेत. 
  • जेवण झाल्यावर ताटात एक थेंब सोडून आचमन करून भोजनयज्ञ पूर्ण करावा.
  • गोड आणि पचायला जड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत.
  • खाण्याच्या क्षमतेसनुसार दोन भाग घन द्रव्य, एक भाग पातळ द्रव्य, एक भाग मोकळा असे ताटाचे स्वरूप असावे.
  • शांतचित्ताने, न बोलता, सावकाश जेवून ताटाला नमस्कार करून मगच उठावे.
टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य