शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

नेपोलियनसारखा महान सम्राट तोही उतारवयात दुःखी झाला; कशामुळे? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 16:43 IST

नेपोलियन या महान सम्राटाने शौर्य, अहंभाव, पैसा, सत्ता याद्वारे दृश्य सृष्टीमधील सर्व सुखे मिळवली. एका नशेतच तो जीवन जगला ...

नेपोलियन या महान सम्राटाने शौर्य, अहंभाव, पैसा, सत्ता याद्वारे दृश्य सृष्टीमधील सर्व सुखे मिळवली. एका नशेतच तो जीवन जगला म्हणावयास हरकत नाही. आणि असे बेपर्वाईचे खोटे, सुखी जीवन जगण्यासाठी अनेकदा अनेकांशी शुष्क वाद-विवाद करण्यासाठी तो मागे पुढे पाहत नसे. 

उतारवय लागले आणि या भ्रामक गोष्टींच्या मागे लागून वेड्यासारखी सगळी शक्ती कुठेतरी वापरली याची त्याला जाणीव आणि पश्चात्ताप झाला. मन:शांती बिघडून गेली. स्वाभाविकच अंतर्मुखता आली. या अंतर्मुखतेमधून अध्यात्मिक ग्रंथवाचन सुरू झाले. परिणामी स्वत:चा वेडेपणा अधिकाधिक लक्षात येऊ लागला. बुद्धिमान अशा या माणसाला, शाश्वत समाधान मिळवण्याच्या मार्गी लागलो असतो, प्रयत्न केले असते तर, आंतरिक समाधान मिळाले असते, असे वाटू लागले. 

म्हणजेच शाश्वत समाधानासाठी कामधेनू स्वत:जवळ असताना तीसुद्धा आपणच भिकाऱ्यासारखे अशाश्वत सुख मिळवण्यासाठी दृष्यवस्तू, माणसे यांच्या दारी अशाश्वत सुखाचे ताक मागत फिरलो, याची खंत वाटली. परंतु आता फार उशीर झाला होता. असेच काहीसे आपल्या बाबतीतही घडते. 

अशा वेळी समर्थ रामदास स्वामींच्या ओळी आठवतात, घरी कामधेनू पुढे ताक मागे,हरीबोध सांडूनि वीवाद लागे,करी सार चिंतामणी कांचखडे,तया मागता देत आहे उदंडे। स्वत:मधील चैतन्याची जाणीव करून न घेतल्यामुळे आयुष्यात बहुतेक लोकांना बाह्यसुखाचे नसलेले ऐश्वर्य वाटणारे दारिद्रय भोगावे लागते. यासाठीच संत सांगतात, प्रत्येक क्षण आनंदाने जगून घ्या. आज काम उद्या आराम याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. म्हणून आज आराम करून घ्या असेही योग्य नाही. वेळच्या वेळी प्रत्येक गोष्टीचा समतोल राखला तर पश्चात्तापाचे क्षण वाट्याला येणार नाहीत.