शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

नेपोलियनसारखा महान सम्राट तोही उतारवयात दुःखी झाला; कशामुळे? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 16:43 IST

नेपोलियन या महान सम्राटाने शौर्य, अहंभाव, पैसा, सत्ता याद्वारे दृश्य सृष्टीमधील सर्व सुखे मिळवली. एका नशेतच तो जीवन जगला ...

नेपोलियन या महान सम्राटाने शौर्य, अहंभाव, पैसा, सत्ता याद्वारे दृश्य सृष्टीमधील सर्व सुखे मिळवली. एका नशेतच तो जीवन जगला म्हणावयास हरकत नाही. आणि असे बेपर्वाईचे खोटे, सुखी जीवन जगण्यासाठी अनेकदा अनेकांशी शुष्क वाद-विवाद करण्यासाठी तो मागे पुढे पाहत नसे. 

उतारवय लागले आणि या भ्रामक गोष्टींच्या मागे लागून वेड्यासारखी सगळी शक्ती कुठेतरी वापरली याची त्याला जाणीव आणि पश्चात्ताप झाला. मन:शांती बिघडून गेली. स्वाभाविकच अंतर्मुखता आली. या अंतर्मुखतेमधून अध्यात्मिक ग्रंथवाचन सुरू झाले. परिणामी स्वत:चा वेडेपणा अधिकाधिक लक्षात येऊ लागला. बुद्धिमान अशा या माणसाला, शाश्वत समाधान मिळवण्याच्या मार्गी लागलो असतो, प्रयत्न केले असते तर, आंतरिक समाधान मिळाले असते, असे वाटू लागले. 

म्हणजेच शाश्वत समाधानासाठी कामधेनू स्वत:जवळ असताना तीसुद्धा आपणच भिकाऱ्यासारखे अशाश्वत सुख मिळवण्यासाठी दृष्यवस्तू, माणसे यांच्या दारी अशाश्वत सुखाचे ताक मागत फिरलो, याची खंत वाटली. परंतु आता फार उशीर झाला होता. असेच काहीसे आपल्या बाबतीतही घडते. 

अशा वेळी समर्थ रामदास स्वामींच्या ओळी आठवतात, घरी कामधेनू पुढे ताक मागे,हरीबोध सांडूनि वीवाद लागे,करी सार चिंतामणी कांचखडे,तया मागता देत आहे उदंडे। स्वत:मधील चैतन्याची जाणीव करून न घेतल्यामुळे आयुष्यात बहुतेक लोकांना बाह्यसुखाचे नसलेले ऐश्वर्य वाटणारे दारिद्रय भोगावे लागते. यासाठीच संत सांगतात, प्रत्येक क्षण आनंदाने जगून घ्या. आज काम उद्या आराम याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. म्हणून आज आराम करून घ्या असेही योग्य नाही. वेळच्या वेळी प्रत्येक गोष्टीचा समतोल राखला तर पश्चात्तापाचे क्षण वाट्याला येणार नाहीत.