शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

तुळशीची वाळलेली पाने फेकू नका, त्या पानांचा सौभाग्यप्राप्तीसाठी वापर करा ; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:51 IST

तुळशीच्या वाळलेल्या पानांनाही खूप महत्त्व आहे. चला जाणून घेऊया तुळशीच्या वाळलेल्या पानांचे चमत्कारिक फायदे.

तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. भगवान विष्णूंची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही. त्यात लक्ष्मी देवी वास करते असे मानले जाते. दररोज तुळशीला पाणी अर्पण करणे आणि सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावल्याने जीवनात सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते. बहरलेली तुळस आपल्या दारात, अंगणात, खिडकीत, गॅलरीत असणे हे भरभराटीचे लक्षण आहे. मात्र ऋतुमानानुसार तुळशीच्या रोपाची पानगळती झाली किंवा पाने वाळली, तरी काळजी करू नका. तुळशीच्या वाळलेल्या पानांनाही खूप महत्त्व आहे. चला जाणून घेऊया तुळशीच्या वाळलेल्या पानांचे चमत्कारिक फायदे.

वाळलेल्या तुळशीच्या पानांचे फायदे

धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची कोरडी पानेही भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहेत. असे मानले जाते की देवाला नैवेद्य दाखवताना वाळलेल्या तुळशीच्या पानाचाही वापर केला तरी चालतो. पान वाळले तरी तुळशीचे महत्त्व किंवा तिचा औषधी गुणधर्म कमी होत नाही. म्हणून वाळलेल्या पानांचा पुर्नवापर करायला हरकत नाही. 

देवपूजा करताना, देवाला स्नान घालताना तुळशीची वाळलेली पाने त्यात टाकता येतील. ते पाणी तीर्थ म्हणून चमचाभर प्राशन करता येईल. याशिवाय तुम्ही स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यात वाळलेल्या तुळशीची पाने टाकू शकता. असे मानले जाते की यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

मान्यतेनुसार तुळशीची कोरडी पाने लाल कपड्यात ठेवून तिजोरीत किंवा अन्न धान्याच्या कणगीत ठेवल्याने लक्ष्मी मातेची कृपा राहते. यासोबतच आर्थिक प्रगतीही होते.

तुळशीची वाळलेली पाने गंगेच्या पाण्यात टाकून घरात ते पाणी शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्याचबरोबर घरात आनंदाचे वातावरण राहते.

याशिवाय तुळशीची वाळलेली पाने खुडून टाकली तरी ती केराच्या टोपलीत किंवा निर्माल्यात टाकू नका तर तुळशीच्या कुंडीतच टाका. जेणेकरून त्या पानाचे खतामध्ये रूपांतर होईल आणि तुळशीचे बीज मातीत रोवले गेले तर आणखी एखादे तुळशीचे रोप कुंडीत तयार होईल. तसे होणे हे घरात भरभराट होण्याचे लक्षण आहे. 

म्हणून तुळशीच्या वाळलेल्या पानांचे सुनियोजन करून ती पुनर्वापर करण्यावर भर द्या, फेकण्यावर नाही!