शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

तुळशीची वाळलेली पाने फेकू नका, त्या पानांचा सौभाग्यप्राप्तीसाठी वापर करा ; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:51 IST

तुळशीच्या वाळलेल्या पानांनाही खूप महत्त्व आहे. चला जाणून घेऊया तुळशीच्या वाळलेल्या पानांचे चमत्कारिक फायदे.

तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. भगवान विष्णूंची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही. त्यात लक्ष्मी देवी वास करते असे मानले जाते. दररोज तुळशीला पाणी अर्पण करणे आणि सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावल्याने जीवनात सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते. बहरलेली तुळस आपल्या दारात, अंगणात, खिडकीत, गॅलरीत असणे हे भरभराटीचे लक्षण आहे. मात्र ऋतुमानानुसार तुळशीच्या रोपाची पानगळती झाली किंवा पाने वाळली, तरी काळजी करू नका. तुळशीच्या वाळलेल्या पानांनाही खूप महत्त्व आहे. चला जाणून घेऊया तुळशीच्या वाळलेल्या पानांचे चमत्कारिक फायदे.

वाळलेल्या तुळशीच्या पानांचे फायदे

धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची कोरडी पानेही भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहेत. असे मानले जाते की देवाला नैवेद्य दाखवताना वाळलेल्या तुळशीच्या पानाचाही वापर केला तरी चालतो. पान वाळले तरी तुळशीचे महत्त्व किंवा तिचा औषधी गुणधर्म कमी होत नाही. म्हणून वाळलेल्या पानांचा पुर्नवापर करायला हरकत नाही. 

देवपूजा करताना, देवाला स्नान घालताना तुळशीची वाळलेली पाने त्यात टाकता येतील. ते पाणी तीर्थ म्हणून चमचाभर प्राशन करता येईल. याशिवाय तुम्ही स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यात वाळलेल्या तुळशीची पाने टाकू शकता. असे मानले जाते की यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

मान्यतेनुसार तुळशीची कोरडी पाने लाल कपड्यात ठेवून तिजोरीत किंवा अन्न धान्याच्या कणगीत ठेवल्याने लक्ष्मी मातेची कृपा राहते. यासोबतच आर्थिक प्रगतीही होते.

तुळशीची वाळलेली पाने गंगेच्या पाण्यात टाकून घरात ते पाणी शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्याचबरोबर घरात आनंदाचे वातावरण राहते.

याशिवाय तुळशीची वाळलेली पाने खुडून टाकली तरी ती केराच्या टोपलीत किंवा निर्माल्यात टाकू नका तर तुळशीच्या कुंडीतच टाका. जेणेकरून त्या पानाचे खतामध्ये रूपांतर होईल आणि तुळशीचे बीज मातीत रोवले गेले तर आणखी एखादे तुळशीचे रोप कुंडीत तयार होईल. तसे होणे हे घरात भरभराट होण्याचे लक्षण आहे. 

म्हणून तुळशीच्या वाळलेल्या पानांचे सुनियोजन करून ती पुनर्वापर करण्यावर भर द्या, फेकण्यावर नाही!